शहरं
Join us  
Trending Stories
1
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
3
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
4
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
5
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
6
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
7
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
8
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
9
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
10
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
11
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
12
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी
13
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
14
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
15
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
16
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
17
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
18
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
19
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
20
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   

जिल्हाकचेरी आंदोलनांनी गजबजली

By admin | Updated: August 10, 2016 00:30 IST

क्रांतीदिनी जिल्हाधिकारी कार्यालय आंदोलनांनी चांगलेच गजबजले. मंगळवारी येथे एक नाही तर चार संघटनांनी आंदोलन पुकारले ....

क्रांतीदिनी विविध संघटना रस्त्यावर : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जेलभरो; आदिवासींचे ढोल-डफ आंदोलन वर्धा : क्रांतीदिनी जिल्हाधिकारी कार्यालय आंदोलनांनी चांगलेच गजबजले. मंगळवारी येथे एक नाही तर चार संघटनांनी आंदोलन पुकारले तर पाचवे आंदोलन अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या मागण्यांकरिता बजाज चौकात जेलभरो केला. यावेळी विविध संघटनांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर करून ते शासनाकडे पाठविण्याची मागणी केली. या आंदोलनांमुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात नागरिकांची एकच गर्दी दिसत होती. हा परीसर प्रत्येकांचे लक्ष वेधून घेत होता. विशेष म्हणजे, आदिवासी गोवारी जमात संघटनेच्यावतीने करण्यात आलेल्या ढोल-डफ आंदोलनाने नागरिकांना आकर्षित केले. याच वेळी सुरू असलेल्या सीटूच्या व गाव बचाव संघर्ष समितीच्या आंदोलकांकडून होत असलेल्या घोषणांमुळे परिसर दणाणला होता. यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांचाही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वर्धेतील ठाकरे मार्केट परिसरातून आयटकच्या बॅनरखाली केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध नोंदविण्याकरिता आशा, गटप्रवर्तक, अंगणवाडी सेवविका, शालेय पोषण आहार कर्मचारी यांनी मोर्चा काढला. हा मोर्चा मुख्य मार्गाने बजाज चौक येथे गेला असता यात सहभागी महिलांना जेलभरो करण्यात आला. आंदोलनादरम्यान काही काळाकरिता वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे दिसून आले आहे. प्रलंबित मागण्याबाबत मुंबई मंत्रालयात चार बैठका झाल्यात. या बैठकीत आशा व गटप्रवर्तकांना किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन देण्याचे मान्य केले. यवतमाळ औद्योगिक न्यायालय निर्णयानुसार अंमलबजावणी करण्यात येईल, असे सांगितले. तसेच शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना केंद्र व राज्य मिळून एकत्रित पाच हजार रुपये मानधन लागू करण्याचे आश्वासन दिले नसल्याने हे आंदोलन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आशा गटप्रवर्तकांच्या मागण्या आशा व गटप्रवर्तकांना किमान वेतन कायद्याप्रमाणे एनआरएचएम मॅन्युअल आणि पीआयपीमध्ये केलेल्या शिफारशीनुसार आशांना १७,२०० तर गटप्रवर्तकांना २५ हजार रुपये एकत्रित वेतन देण्यात यावे. आशा व गटप्रवर्तक यांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे शासन, जि.प. सेवेत रिक्त पदावर सामावून घ्या. आश्वासनाप्रमाणे शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपये मानधन देण्यात यावे. २० जुलै २०१६ रोजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना ५ हजार देण्याचे आश्वासन पूर्ण करा. शालेय पोषण आहार कामगारांना दरमहा मानधन मिळेल याची व्यवस्था करण्यात यावी. शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा तसेच जनश्री विमा योजनेचे अंतर्गत लाभ देण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या. गाव बचाव संघर्ष समितीचे आंदोलन गाव बचाव संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या मागण्यांकरिता आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शासनाकडून शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करीत शासनाने शेतकऱ्यांशी खेळ करून नये गावात येत त्यांच्या हक्कांवर ताबा मिळवू नये, या मागणीकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंंदोलन करण्यात आले.