शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
3
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
4
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
5
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
6
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
7
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
8
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
9
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
10
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
11
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
12
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
13
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
14
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
15
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
16
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...
17
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
18
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
19
“ज्योतीला फसवले जातेय, सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५-२०-२५ हजार कमावते”; वडिलांचा दावा
20
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट

हिंगणघाटला मिळाले जिल्हा व सत्र न्यायालय

By admin | Updated: February 6, 2017 01:04 IST

शहरात जिल्हा व सत्र न्यायालय येत्या ३ एप्रिलपर्यंत सुरू करण्यात यावे असे आदेश, नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती इंदिरा जैन यांनी गुरुवारी पारित केला.

 न्यायालयाचे आदेश : अधिवक्ता संघाची २० वर्षांपासूनची मागणी पूर्णत्वास हिंगणघाट : शहरात जिल्हा व सत्र न्यायालय येत्या ३ एप्रिलपर्यंत सुरू करण्यात यावे असे आदेश, नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती इंदिरा जैन यांनी गुरुवारी पारित केला. न्यायालयीन लढाई नंतर अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली ही मागणी पूर्ण झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. शहरात जिल्हा व सत्र न्यायालय सुरु करावे याकरिता येथील अधिवक्ता संघाकडून गत २० वर्षांपासून मागणी सुरू होती. परंतु दरवेळी येणाऱ्या अडचणीमुळे त्यांची मागणी अपूर्ण राहत होती. यामुळे येथील अधिवक्ता संघाने २०१६ ला नागपूर खंडपीठात एक जनहित याचिका दाखल केली होती. सदर न्यायालय हिंगणघाट शहरात सुरु व्हावे म्हणून अधिवक्ता संघाने १९८४ पासून लढा सुरु केला होता. यापूर्वी या मागणीकरिता अधिवक्ता संघाने साखळी उपोषणही केले. विविध माध्यमातून निवेदन देऊन या मागणीचे गांभीर्य शासनाच्या विधी विभागाच्या नजरेत आणून दिले; परंतु लालफितशाही कारभारामुळे हे न्यायालय येण्यास विलंब झाला. हिंगणघाट आणि समुद्रपूर येथील ग्रामीण भागातील नागरिकांना न्याय मागण्याकरिता वर्धेला हेलपाटे मारावे लागत होते. सामान्य माणसाला होणारा त्रास आणि शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे ही कायद्याची भूमिका पाहून येथील अधिवक्ता संघाने सरळ न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायालयानेही अधिवक्ता संघाची बाजू समजावून घेऊन हिंगणघाट शहरात जिल्हा व सत्र न्यायालय स्थापनेचा आदेश दिला. जिल्हा व सत्र न्यायालय शहरात यावे याकरिता आमदार समीर कुणावार हे सुरवातीपासून प्रयत्नरत होते. त्यांनी या न्यायालयाकरिता तहसील कार्यालयाची इमारत उपलब्ध करून देण्याकरिता प्रयत्न केले. सदर न्यायालय शहरात आवश्यक असल्याचे लेखीपत्रही त्यांनी न्यायालयात दिले. या न्यायालयाची नवीन इमारत बांधण्याकरिता निधी शासनपातळीवर मंजूर झालेला असून लवकरच नवीन इमारतीचे बांधकाम सुरु होणार आहे. जिल्हा व सत्र न्यायालय हिंगणघाट येथे व्हावे याकरिता अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. अशोक काकडे, अ‍ॅड. अर्शी इक्बाल अहमद, अ‍ॅड. चंद्रकांत देशपांडे, अ‍ॅड. आर.एल. सुटे, अ‍ॅड. जवादे, अ‍ॅड. बोंडे, अ‍ॅड. वाशीमकर यांच्यासह जुन्या पिढीतील वकिलांनी केलेल्या परिश्रमाचे हे फळ असल्याची भावना व्यक्त केल्या जात आहे.(तालुका प्रतिनिधी)