शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
4
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
5
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
6
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
7
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
10
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
11
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
12
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
13
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
14
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
15
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
16
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
17
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
18
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
19
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
20
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!

जिल्ह्यात ९८ गावे ‘मिनीडेंजर झोन’मध्ये

By admin | Updated: February 11, 2016 02:22 IST

शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून शासनस्तरावर अनेक प्रयत्न होत आहे; पण जिल्ह्यातील दूषित पाणी पिच्छा सोडत नसल्याचे दिसते.

दूषित पाणी : ९२० गावांतील २ हजार ८७५ स्रोतांची तपासणीगौरव देशमुख वर्धाशुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून शासनस्तरावर अनेक प्रयत्न होत आहे; पण जिल्ह्यातील दूषित पाणी पिच्छा सोडत नसल्याचे दिसते. ब्लिचिंगवर खर्च होत असतानाही जिल्ह्यातील ९८ गावांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे ही गावे ‘मिनीडेंजर झोन’ जाहीर करण्यात आली आहेत.जि. प. आरोग्य विभागाद्वारे स्वच्छता सर्वेक्षण मोहीम राबविली जाते. यात ५१४ ग्रा.पं. अंतर्गत ९२० गावांत २ हजार ८७५ पाण्याचे स्त्रोत तपासले गेले. यातील ९८ गावांतील स्त्रोत दूषित असल्याचे समोर आले. ९८ ग्रा.पं. मिनीडेंजर झोनमध्ये असल्याचे जाहीर झाल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. पाण्याच्या शुद्धतेकरिता ब्लिचिंग पावडरसाठी ग्रा.पं. मोठा खर्च दाखविते. असे असताना जिल्ह्यातील ९२० पैकी ९८ गावांत दूषित पाण्याचे स्त्रोत दिसून आले. यामुळे ५१४ पैकी ८० ग्रा.पं. ला पिवळे कार्ड देण्यात आले आहे. सलग पिवळे कार्ड मिळाल्यास त्यांना डेंजर झोनमध्ये टाकून लाल कार्ड दिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सलग दोन वर्षे लाल कार्ड मिळाल्यास त्या ग्रा.पं. चे अनुदान रोखले जाते. आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात नोंद असलेल्या पाण्याचेच स्त्रोत तपासले जातात. प्रत्येक ग्रा.पं.च्या स्त्रोताची नोंद असेल, असे नाही. यामुळे ग्रामसेवकांनीच लक्ष देणे गरजेचे आहे.८० ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड; जल सुरक्षकांचे दुर्लक्षग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व ग्रा.पं. प्रशासन यांना जलसुरक्षक संबोधले जाते. आपल्या गावात दूषित पाणी तर पुरविले जात नाही ना, याची काळजी, खबरदारी बाळगण्याची जबाबदारी त्यांची असते; पण या कर्मचाऱ्यांना आपल्या जबाबदारीचा विसर पडल्याचेच दिसून येते.जोखीमयुक्त स्रोतांची गावेजोखीमयुक्त जलस्रोत असलेल्या गावांमध्ये वर्धा तालुक्यात ६, सेलू १०, देवळी २२, आर्वी १७, आष्टी १, कारंजा २१, समुद्रपूर ६ आणि हिंगणघाट तालुक्यातील १५ गावांचा समावेश आहे.गतवर्षी जिल्ह्यातील ३ गावांना डेंजर झोनचे संकेत देण्यात आले. आरोग्य विभागाने त्या ग्रा.पं. ला कठोर सूचना दिल्या होत्या. यावरून त्या गावांनी त्वरित व्यवस्था करून हिरवे कार्ड प्राप्त केले. ७० टक्केपेक्षा अधिक वापरातील स्त्रोतांची तपासणीगावातील ७० टक्क्यांपेक्षा अधिक नागरिक ज्या विहिरी व हातपंपातील पाण्याचा पिण्यासाठी वापर करतात, त्या पाण्याचे स्त्रोत तपासले जातात. तपासात तीव्र जोखीम आढळल्यास त्या ग्रामपंचायतीला लाल कार्ड दिले जाते.गावातील असुरक्षित पाणी पुरवण्याची जोखीम ७० टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास तीव्र जोखीम समजली जाते. ती ३० ते ६९ टक्क्यांपर्यंत असल्यास मध्यम जोखीम समजली जाते. स्त्रोताभोवती अस्वच्छता व दुर्गंधीयुक्त वातावरण असल्यास त्या गावांना पिवळे कार्ड दिले जाते. हिरवे कार्ड हे सर्व जलस्त्रोत व्यवस्थित आढळून आल्यास दिले जाते. यासाठी गावाला पाणी पुरवठा होत असलेल्या संपूर्ण जलस्त्रोताची पाहणी केली जाते. यानंतर वर्गवारी करून कार्ड देण्याचे ठरविले जाते. सलग ५ वर्षे हिरवे कार्ड प्राप्त केलेल्या ग्रामपंचायतींना चंदेरी कार्ड दिले जाते. त्या गावांत कुठलाही साथीचा आजार पसरलेला नसणे आवश्यक असते. अशा ग्रामपंचायतींना शासनाद्वारे गौरव पुरस्कार व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले जाते.