शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

जिल्ह्यात २० हजार ८०८ विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

By admin | Updated: March 1, 2016 01:24 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाद्वारे घेण्यात येत असलेली दहावीची परीक्षा मंगळवार (दि.१ मार्च) पासून सुरू होत आहे.

आठ तालुक्यात ७५ केंद्र : परीक्षा कॉपीमुक्त पार पाडण्याचे शिक्षण विभागापुढे आव्हानवर्धा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाद्वारे घेण्यात येत असलेली दहावीची परीक्षा मंगळवार (दि.१ मार्च) पासून सुरू होत आहे. जिल्ह्यात ७५ केंद्रांवरून २० हजार ८०८ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहे. परीक्षा कॉपीमुक्त व शांततापूर्ण वातावरणात पार पडावी यासाठी शिक्षण विभागाच्यावतीने पाच भरारी पथक तयार करण्यात आल्याची माहिती आहे. दहावीची परीक्षा ही जीवनातील पहिली महत्त्वाची परीक्षा आहे. याच परीक्षेतील गुणांवर पुढे कुठल्या शाखेत प्रवेश घ्यावयाचा आहे हे विद्यार्थी ठरवित असतात. त्यामुळे दहावीची परीक्षा ही अत्यंत शांतापूर्ण मार्गाने पार पडावी, तसेच कुठेही कॉपीसारखा प्रकार घडू नये यासाठी पाच भरारी पथके तैनात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील एकूण ७५ केंद्रावर २० हजार ८०८ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहे. यामध्ये २० हजार ६८३ विद्यार्थी हे नियमित तर १२५ विद्यार्थी हे खासगीत परीक्षा देत आहेत. विद्यार्थ्यांनी शांतचित्ताने व कुठल्याही मोहाला बळी न पडता सदर परीक्षा द्यावी, कॉपीचा कसलाही आधार घेऊ नये यासाठी शाळांमध्ये मार्गदर्शन कार्यक्रम घेऊन जनजागृतीही करण्यात आली आहे. तसेच कॉपीमुक्त परीक्षा अभियानही राबविले जात आहे. परीक्षा केंद्रांवर कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी भरारी पथक सज्ज आहे. जिल्ह्यात दोन केंद्र संवेदनशील यादीत टाकण्यात आली आहे. यामध्ये यशवंत हायस्कूल वायगाव(नि), आणि यशवंत हायस्कूल सेलू या केंद्रांचा समावेश आहे. (शहर प्रतिनिधी)पाच भरारी पथकेपरीक्षा केंद्रांवर कुठलीही अनुचित घटना घडू नये, परीक्षा शांततापूर्ण वातावरणात व्हावी, कुण्याही विद्यार्थ्याने कॉपीच्या आहारी जाऊ नये व त्यांना कॉपी करण्यास कुणीही मदत करू नये यासाठी जिल्हा शिक्षण विभागामार्फत पाच भरावी पथके तैनात करण्यात आली आहे. एका पथकात सहा कर्मचारी अश्या प्रकारे ३० कर्मचारी ७५ केंद्रांवर नजर ठेवून असणार आहे.