शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

जिल्ह्यात २० हजार ८०८ विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

By admin | Updated: March 1, 2016 01:24 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाद्वारे घेण्यात येत असलेली दहावीची परीक्षा मंगळवार (दि.१ मार्च) पासून सुरू होत आहे.

आठ तालुक्यात ७५ केंद्र : परीक्षा कॉपीमुक्त पार पाडण्याचे शिक्षण विभागापुढे आव्हानवर्धा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाद्वारे घेण्यात येत असलेली दहावीची परीक्षा मंगळवार (दि.१ मार्च) पासून सुरू होत आहे. जिल्ह्यात ७५ केंद्रांवरून २० हजार ८०८ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहे. परीक्षा कॉपीमुक्त व शांततापूर्ण वातावरणात पार पडावी यासाठी शिक्षण विभागाच्यावतीने पाच भरारी पथक तयार करण्यात आल्याची माहिती आहे. दहावीची परीक्षा ही जीवनातील पहिली महत्त्वाची परीक्षा आहे. याच परीक्षेतील गुणांवर पुढे कुठल्या शाखेत प्रवेश घ्यावयाचा आहे हे विद्यार्थी ठरवित असतात. त्यामुळे दहावीची परीक्षा ही अत्यंत शांतापूर्ण मार्गाने पार पडावी, तसेच कुठेही कॉपीसारखा प्रकार घडू नये यासाठी पाच भरारी पथके तैनात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील एकूण ७५ केंद्रावर २० हजार ८०८ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहे. यामध्ये २० हजार ६८३ विद्यार्थी हे नियमित तर १२५ विद्यार्थी हे खासगीत परीक्षा देत आहेत. विद्यार्थ्यांनी शांतचित्ताने व कुठल्याही मोहाला बळी न पडता सदर परीक्षा द्यावी, कॉपीचा कसलाही आधार घेऊ नये यासाठी शाळांमध्ये मार्गदर्शन कार्यक्रम घेऊन जनजागृतीही करण्यात आली आहे. तसेच कॉपीमुक्त परीक्षा अभियानही राबविले जात आहे. परीक्षा केंद्रांवर कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी भरारी पथक सज्ज आहे. जिल्ह्यात दोन केंद्र संवेदनशील यादीत टाकण्यात आली आहे. यामध्ये यशवंत हायस्कूल वायगाव(नि), आणि यशवंत हायस्कूल सेलू या केंद्रांचा समावेश आहे. (शहर प्रतिनिधी)पाच भरारी पथकेपरीक्षा केंद्रांवर कुठलीही अनुचित घटना घडू नये, परीक्षा शांततापूर्ण वातावरणात व्हावी, कुण्याही विद्यार्थ्याने कॉपीच्या आहारी जाऊ नये व त्यांना कॉपी करण्यास कुणीही मदत करू नये यासाठी जिल्हा शिक्षण विभागामार्फत पाच भरावी पथके तैनात करण्यात आली आहे. एका पथकात सहा कर्मचारी अश्या प्रकारे ३० कर्मचारी ७५ केंद्रांवर नजर ठेवून असणार आहे.