शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २० हजार ८०८ विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

By admin | Updated: March 1, 2016 01:24 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाद्वारे घेण्यात येत असलेली दहावीची परीक्षा मंगळवार (दि.१ मार्च) पासून सुरू होत आहे.

आठ तालुक्यात ७५ केंद्र : परीक्षा कॉपीमुक्त पार पाडण्याचे शिक्षण विभागापुढे आव्हानवर्धा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाद्वारे घेण्यात येत असलेली दहावीची परीक्षा मंगळवार (दि.१ मार्च) पासून सुरू होत आहे. जिल्ह्यात ७५ केंद्रांवरून २० हजार ८०८ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहे. परीक्षा कॉपीमुक्त व शांततापूर्ण वातावरणात पार पडावी यासाठी शिक्षण विभागाच्यावतीने पाच भरारी पथक तयार करण्यात आल्याची माहिती आहे. दहावीची परीक्षा ही जीवनातील पहिली महत्त्वाची परीक्षा आहे. याच परीक्षेतील गुणांवर पुढे कुठल्या शाखेत प्रवेश घ्यावयाचा आहे हे विद्यार्थी ठरवित असतात. त्यामुळे दहावीची परीक्षा ही अत्यंत शांतापूर्ण मार्गाने पार पडावी, तसेच कुठेही कॉपीसारखा प्रकार घडू नये यासाठी पाच भरारी पथके तैनात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील एकूण ७५ केंद्रावर २० हजार ८०८ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहे. यामध्ये २० हजार ६८३ विद्यार्थी हे नियमित तर १२५ विद्यार्थी हे खासगीत परीक्षा देत आहेत. विद्यार्थ्यांनी शांतचित्ताने व कुठल्याही मोहाला बळी न पडता सदर परीक्षा द्यावी, कॉपीचा कसलाही आधार घेऊ नये यासाठी शाळांमध्ये मार्गदर्शन कार्यक्रम घेऊन जनजागृतीही करण्यात आली आहे. तसेच कॉपीमुक्त परीक्षा अभियानही राबविले जात आहे. परीक्षा केंद्रांवर कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी भरारी पथक सज्ज आहे. जिल्ह्यात दोन केंद्र संवेदनशील यादीत टाकण्यात आली आहे. यामध्ये यशवंत हायस्कूल वायगाव(नि), आणि यशवंत हायस्कूल सेलू या केंद्रांचा समावेश आहे. (शहर प्रतिनिधी)पाच भरारी पथकेपरीक्षा केंद्रांवर कुठलीही अनुचित घटना घडू नये, परीक्षा शांततापूर्ण वातावरणात व्हावी, कुण्याही विद्यार्थ्याने कॉपीच्या आहारी जाऊ नये व त्यांना कॉपी करण्यास कुणीही मदत करू नये यासाठी जिल्हा शिक्षण विभागामार्फत पाच भरावी पथके तैनात करण्यात आली आहे. एका पथकात सहा कर्मचारी अश्या प्रकारे ३० कर्मचारी ७५ केंद्रांवर नजर ठेवून असणार आहे.