शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

वर्धेत वीज वितरणचा डोलारा ढासळला

By admin | Updated: June 28, 2014 00:31 IST

शहरातील सुमारे ३० हजार वीज ग्राहकांना सेवा देण्यासाठी महावितरणने वर्धा शहरात सात वितरण केंद्र उघडले आहे़ ...

राजेश भोजेकर वर्धा शहरातील सुमारे ३० हजार वीज ग्राहकांना सेवा देण्यासाठी महावितरणने वर्धा शहरात सात वितरण केंद्र उघडले आहे़ मात्र सातपैकी तब्बल चार केंद्रातील अभियंते नागपूरहून ये-जा करीत असल्यामुळे वर्धा शहरात वीज वितरण कंपनीचा डोलाराच ढासळल्यागत स्थिती निर्माण झाली आहे़पूर्वी या वितरण केंद्रामध्ये स्थानिक अभियंते व कर्मचारी कार्यरत होते. बदल्यांमुळे नवीन अभियंते मुख्यालयी राहत नसल्यामुळे वीज ग्राहकांच्या समस्यांमध्ये अधिकची भर पडत आहे़ शहरात फ्यूज कॉल अटेन्ड करण्याची सुविधा नाही़ नियमानुसार तक्रारींचे निवारण अवघ्या तीन तासात व्हायला पाहिजे़ मात्र या नियमाची महावितरण अधिकाऱ्यांनी सपशेल वाट लावली आहे़ या विभागावर कुणाचाही वचक नसल्यामुळे वीज ग्राहक पूर्णत: वाऱ्यावर आहे़वर्धा शहरातील वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निवारणासाठी प्रत्येक वितरण केंद्रात एक वाहन अपेक्षित आहे़ मात्र एकाच वाहनाच्या बळावर ग्राहकांना सेवा देण्याची कसरत ही विभाग करीत आहे. वरिष्ठांचे दुर्लक्ष आणि अधिकाऱ्यांचे उंटावरून शेळ्या हाकणे हाच प्रकार याला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे़ब्रेक डाऊन झाला व शट-डाऊन झाला तर अधिकारी व कर्मचारी वेळेवर पोहचत नाही़ परिणामी वीज पुरवठा सुरू होण्यास बराच विलंब लागत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत.वितरण केंद्र रात्रीला बंदवर्धा शहरातील वीज वितरण केंद्र तीन पाळीत चालायला पाहिजे़ असा नियम आहे़ मात्र रात्रीला हे केंद्र बंदच असते़ यामुळे वीज ग्राहकांना २४ तास सेवेपासून वंचित राहावे लागत आहे. रात्रीला वीज गेली तर ती परत येण्यासाठी बराच काळ ताटकळत राहावे लागतात.ग्राहक सुविधा केंद्र असुविधेचेवर्धा शहरातील ग्राहक सुविधा केंद्र कार्यरत आहे़ तिथे दोन कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहे़ जुन्या कर्मचाऱ्यांना बदलवून नवीन तीन महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे़ या नवीन कर्मचाऱ्यांना नियमांची जाणीव नसल्यामुळे ग्राहकांना नाहक हेलपाट्या माराव्या लागत आहे़ वास्तविक, कर पावतीवर मालकी हक्काचे कागदपत्र असले तरी वीज कनेक्शन देता येणे शक्य आहे़ मात्र आगाऊ कागदपत्रे मागावून ग्राहकांना कनेक्शन देण्यास दिरंगाई केली जात असल्याचे चित्र आहे़रात्रीची तक्रारच नोंद होत नाहीया वितरण केंद्रामध्ये रात्रीला एखाद्या ग्राहकाने तक्रार नोंदविली तर त्याची नोंदच होत नसल्याची माहिती आहे़ यामुळे ग्राहकांना त्याची दखल होईल वा नाही याचीही शाश्वती राहात नसल्याची विदारक स्थिती आहे.ग्राहक सुविधा केंद्राबाबत ग्राहकच अनभिज्ञभांडुक व पुणे येथे केंद्रीय ग्राहक सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे़ ग्राहकांना १८००२३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर आपली तक्रार नोंदविण्याची सुविधा आहे़ मात्र याबाबत वीज वितरण कंपनीने जनजागृतीच केली नसल्यामुळे ग्राहकांना याची माहितीच नसल्याची माहिती आहे़तक्रारींना केराची टोपलीवीज ग्राहकांकडून असलेल्या तक्रारींचा निपटारा केला जात नसल्याची गंभीर बाबही लोकमतच्या निदर्शनास आली आहे़ तक्रारींना कचराकुंडी दाखविली जात असल्याची गंभीर माहिती असल्यामुळे वीज ग्राहकांना खरच न्याय मिळतो काय हा प्रश्नच आहे़आऊटसोर्सिंगची पदे नसताना ठेकेदारामार्फत कामेआऊट सोर्सिंगची कोणतीच पदे मंजूर नसतानाही अमरावती येथील एका मर्जीतच्या सिक्युरिटी कंपनीच्या केठेकदाराला ३० लोक लावण्याचे काम दिले आहे़ मात्र ही मंडळी ग्राहकांना सेवा देणे दुरच उलट अधिकाऱ्यांचे दलाल बनल्याची आतील गटातील माहिती आहे़ नियमित कर्मचाऱ्यांना डावलून या मंडळीकडून काम करवनू घेतले जात असल्याची धक्कादायक माहिती आहे़