शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेत वीज वितरणचा डोलारा ढासळला

By admin | Updated: June 28, 2014 00:31 IST

शहरातील सुमारे ३० हजार वीज ग्राहकांना सेवा देण्यासाठी महावितरणने वर्धा शहरात सात वितरण केंद्र उघडले आहे़ ...

राजेश भोजेकर वर्धा शहरातील सुमारे ३० हजार वीज ग्राहकांना सेवा देण्यासाठी महावितरणने वर्धा शहरात सात वितरण केंद्र उघडले आहे़ मात्र सातपैकी तब्बल चार केंद्रातील अभियंते नागपूरहून ये-जा करीत असल्यामुळे वर्धा शहरात वीज वितरण कंपनीचा डोलाराच ढासळल्यागत स्थिती निर्माण झाली आहे़पूर्वी या वितरण केंद्रामध्ये स्थानिक अभियंते व कर्मचारी कार्यरत होते. बदल्यांमुळे नवीन अभियंते मुख्यालयी राहत नसल्यामुळे वीज ग्राहकांच्या समस्यांमध्ये अधिकची भर पडत आहे़ शहरात फ्यूज कॉल अटेन्ड करण्याची सुविधा नाही़ नियमानुसार तक्रारींचे निवारण अवघ्या तीन तासात व्हायला पाहिजे़ मात्र या नियमाची महावितरण अधिकाऱ्यांनी सपशेल वाट लावली आहे़ या विभागावर कुणाचाही वचक नसल्यामुळे वीज ग्राहक पूर्णत: वाऱ्यावर आहे़वर्धा शहरातील वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निवारणासाठी प्रत्येक वितरण केंद्रात एक वाहन अपेक्षित आहे़ मात्र एकाच वाहनाच्या बळावर ग्राहकांना सेवा देण्याची कसरत ही विभाग करीत आहे. वरिष्ठांचे दुर्लक्ष आणि अधिकाऱ्यांचे उंटावरून शेळ्या हाकणे हाच प्रकार याला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे़ब्रेक डाऊन झाला व शट-डाऊन झाला तर अधिकारी व कर्मचारी वेळेवर पोहचत नाही़ परिणामी वीज पुरवठा सुरू होण्यास बराच विलंब लागत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत.वितरण केंद्र रात्रीला बंदवर्धा शहरातील वीज वितरण केंद्र तीन पाळीत चालायला पाहिजे़ असा नियम आहे़ मात्र रात्रीला हे केंद्र बंदच असते़ यामुळे वीज ग्राहकांना २४ तास सेवेपासून वंचित राहावे लागत आहे. रात्रीला वीज गेली तर ती परत येण्यासाठी बराच काळ ताटकळत राहावे लागतात.ग्राहक सुविधा केंद्र असुविधेचेवर्धा शहरातील ग्राहक सुविधा केंद्र कार्यरत आहे़ तिथे दोन कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहे़ जुन्या कर्मचाऱ्यांना बदलवून नवीन तीन महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे़ या नवीन कर्मचाऱ्यांना नियमांची जाणीव नसल्यामुळे ग्राहकांना नाहक हेलपाट्या माराव्या लागत आहे़ वास्तविक, कर पावतीवर मालकी हक्काचे कागदपत्र असले तरी वीज कनेक्शन देता येणे शक्य आहे़ मात्र आगाऊ कागदपत्रे मागावून ग्राहकांना कनेक्शन देण्यास दिरंगाई केली जात असल्याचे चित्र आहे़रात्रीची तक्रारच नोंद होत नाहीया वितरण केंद्रामध्ये रात्रीला एखाद्या ग्राहकाने तक्रार नोंदविली तर त्याची नोंदच होत नसल्याची माहिती आहे़ यामुळे ग्राहकांना त्याची दखल होईल वा नाही याचीही शाश्वती राहात नसल्याची विदारक स्थिती आहे.ग्राहक सुविधा केंद्राबाबत ग्राहकच अनभिज्ञभांडुक व पुणे येथे केंद्रीय ग्राहक सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे़ ग्राहकांना १८००२३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर आपली तक्रार नोंदविण्याची सुविधा आहे़ मात्र याबाबत वीज वितरण कंपनीने जनजागृतीच केली नसल्यामुळे ग्राहकांना याची माहितीच नसल्याची माहिती आहे़तक्रारींना केराची टोपलीवीज ग्राहकांकडून असलेल्या तक्रारींचा निपटारा केला जात नसल्याची गंभीर बाबही लोकमतच्या निदर्शनास आली आहे़ तक्रारींना कचराकुंडी दाखविली जात असल्याची गंभीर माहिती असल्यामुळे वीज ग्राहकांना खरच न्याय मिळतो काय हा प्रश्नच आहे़आऊटसोर्सिंगची पदे नसताना ठेकेदारामार्फत कामेआऊट सोर्सिंगची कोणतीच पदे मंजूर नसतानाही अमरावती येथील एका मर्जीतच्या सिक्युरिटी कंपनीच्या केठेकदाराला ३० लोक लावण्याचे काम दिले आहे़ मात्र ही मंडळी ग्राहकांना सेवा देणे दुरच उलट अधिकाऱ्यांचे दलाल बनल्याची आतील गटातील माहिती आहे़ नियमित कर्मचाऱ्यांना डावलून या मंडळीकडून काम करवनू घेतले जात असल्याची धक्कादायक माहिती आहे़