शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

वर्धेत वीज वितरणचा डोलारा ढासळला

By admin | Updated: June 28, 2014 00:31 IST

शहरातील सुमारे ३० हजार वीज ग्राहकांना सेवा देण्यासाठी महावितरणने वर्धा शहरात सात वितरण केंद्र उघडले आहे़ ...

राजेश भोजेकर वर्धा शहरातील सुमारे ३० हजार वीज ग्राहकांना सेवा देण्यासाठी महावितरणने वर्धा शहरात सात वितरण केंद्र उघडले आहे़ मात्र सातपैकी तब्बल चार केंद्रातील अभियंते नागपूरहून ये-जा करीत असल्यामुळे वर्धा शहरात वीज वितरण कंपनीचा डोलाराच ढासळल्यागत स्थिती निर्माण झाली आहे़पूर्वी या वितरण केंद्रामध्ये स्थानिक अभियंते व कर्मचारी कार्यरत होते. बदल्यांमुळे नवीन अभियंते मुख्यालयी राहत नसल्यामुळे वीज ग्राहकांच्या समस्यांमध्ये अधिकची भर पडत आहे़ शहरात फ्यूज कॉल अटेन्ड करण्याची सुविधा नाही़ नियमानुसार तक्रारींचे निवारण अवघ्या तीन तासात व्हायला पाहिजे़ मात्र या नियमाची महावितरण अधिकाऱ्यांनी सपशेल वाट लावली आहे़ या विभागावर कुणाचाही वचक नसल्यामुळे वीज ग्राहक पूर्णत: वाऱ्यावर आहे़वर्धा शहरातील वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निवारणासाठी प्रत्येक वितरण केंद्रात एक वाहन अपेक्षित आहे़ मात्र एकाच वाहनाच्या बळावर ग्राहकांना सेवा देण्याची कसरत ही विभाग करीत आहे. वरिष्ठांचे दुर्लक्ष आणि अधिकाऱ्यांचे उंटावरून शेळ्या हाकणे हाच प्रकार याला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे़ब्रेक डाऊन झाला व शट-डाऊन झाला तर अधिकारी व कर्मचारी वेळेवर पोहचत नाही़ परिणामी वीज पुरवठा सुरू होण्यास बराच विलंब लागत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत.वितरण केंद्र रात्रीला बंदवर्धा शहरातील वीज वितरण केंद्र तीन पाळीत चालायला पाहिजे़ असा नियम आहे़ मात्र रात्रीला हे केंद्र बंदच असते़ यामुळे वीज ग्राहकांना २४ तास सेवेपासून वंचित राहावे लागत आहे. रात्रीला वीज गेली तर ती परत येण्यासाठी बराच काळ ताटकळत राहावे लागतात.ग्राहक सुविधा केंद्र असुविधेचेवर्धा शहरातील ग्राहक सुविधा केंद्र कार्यरत आहे़ तिथे दोन कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहे़ जुन्या कर्मचाऱ्यांना बदलवून नवीन तीन महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे़ या नवीन कर्मचाऱ्यांना नियमांची जाणीव नसल्यामुळे ग्राहकांना नाहक हेलपाट्या माराव्या लागत आहे़ वास्तविक, कर पावतीवर मालकी हक्काचे कागदपत्र असले तरी वीज कनेक्शन देता येणे शक्य आहे़ मात्र आगाऊ कागदपत्रे मागावून ग्राहकांना कनेक्शन देण्यास दिरंगाई केली जात असल्याचे चित्र आहे़रात्रीची तक्रारच नोंद होत नाहीया वितरण केंद्रामध्ये रात्रीला एखाद्या ग्राहकाने तक्रार नोंदविली तर त्याची नोंदच होत नसल्याची माहिती आहे़ यामुळे ग्राहकांना त्याची दखल होईल वा नाही याचीही शाश्वती राहात नसल्याची विदारक स्थिती आहे.ग्राहक सुविधा केंद्राबाबत ग्राहकच अनभिज्ञभांडुक व पुणे येथे केंद्रीय ग्राहक सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे़ ग्राहकांना १८००२३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर आपली तक्रार नोंदविण्याची सुविधा आहे़ मात्र याबाबत वीज वितरण कंपनीने जनजागृतीच केली नसल्यामुळे ग्राहकांना याची माहितीच नसल्याची माहिती आहे़तक्रारींना केराची टोपलीवीज ग्राहकांकडून असलेल्या तक्रारींचा निपटारा केला जात नसल्याची गंभीर बाबही लोकमतच्या निदर्शनास आली आहे़ तक्रारींना कचराकुंडी दाखविली जात असल्याची गंभीर माहिती असल्यामुळे वीज ग्राहकांना खरच न्याय मिळतो काय हा प्रश्नच आहे़आऊटसोर्सिंगची पदे नसताना ठेकेदारामार्फत कामेआऊट सोर्सिंगची कोणतीच पदे मंजूर नसतानाही अमरावती येथील एका मर्जीतच्या सिक्युरिटी कंपनीच्या केठेकदाराला ३० लोक लावण्याचे काम दिले आहे़ मात्र ही मंडळी ग्राहकांना सेवा देणे दुरच उलट अधिकाऱ्यांचे दलाल बनल्याची आतील गटातील माहिती आहे़ नियमित कर्मचाऱ्यांना डावलून या मंडळीकडून काम करवनू घेतले जात असल्याची धक्कादायक माहिती आहे़