शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

३० जूनच्या आत शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 23:13 IST

यावर्षी मान्सून वेळेत सुरू होत असल्याने शेतकऱ्यांना शेतीच्या तयारीसाठी पैशाची आवश्यकता आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वर्धा जिल्ह्यात केवळ ५ टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे.

ठळक मुद्देकिशोर तिवारी : पीक कर्ज वाटप आढावा बैठकीत सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : यावर्षी मान्सून वेळेत सुरू होत असल्याने शेतकऱ्यांना शेतीच्या तयारीसाठी पैशाची आवश्यकता आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वर्धा जिल्ह्यात केवळ ५ टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना ३० जूनच्या आत कर्ज वाटप पूर्ण करावे, अशा सूचना वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिल्या.तहसील कार्यालयात पीक कर्ज वितरण आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, आ. समीर कुणावार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, एसडीओ समाधान शेंडगे उपस्थित होते. तिवारी यांनी बँकेचे अधिकारी शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी आरबीआयच्या नियमापेक्षा अधिक कागदपत्रे मागून शेतकऱ्यांना त्रास देतात. याबाबत बँक अधिकाऱ्यांना खडसावले. जिल्हाधिकारी नवाल यांनी बँक अधिकाऱ्यांना आरबीआयचे नियम सांगितले. नियमाप्रमाणे एक लाख रुपयांपेक्षा कमी कर्जासाठी केवळ सातबारा, ८- अ आणि ६ क एवढेच कागदपत्र घेण्यात यावी, असे निर्देश आहेत. मूल्यांकन, चतु:सीमा यासारखे कागदपत्र मागू नयेत, असे सांगितले. शेतकºयांना सुलभ कर्ज वाटप करण्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि सहायक निबंधक यांना नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात यावे, अशा सूचना तिवारी यांनी दिल्या. कर्जमाफीची रक्कम अद्याप काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नसन्याबाबत आ. कुणावार यांनी बँक अधिकाऱ्यांना विचारणा केली. कर्जमाफीची रक्कम अद्याम जमा न झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात संपूर्ण रक्कम ३० जूनपर्यंत जमा करावी, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीला अनुपस्थित असणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस द्यावी, अशी मागणी त्यांनी याप्रसंगी केली. तूर आणि हरभरा खरेदीबाबत शासनाकडे बैठक लावावी. शेतकऱ्यांकडे अजूनही तूर व हरभरा पडून असल्याचे त्यांनी सांगितले. कर्जमाफी मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांची यादी बँक शाखेत तथा ग्रा.पं. मध्ये लावावी, असे ते म्हणाले.बोंडअळीचे पैसे हे योजनेचे पैसे आहेत, ते शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात वळते करू नये. कर्ज खात्यात वळते केल्याचे आढळल्यास सरकारी निधीचा गैरवापर प्रकरणी बँक अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा नवाल यांनी दिला. ठिबक सिंचन संचाचा बॅकलॉग यंदा पूर्ण केला. यासाठी ११.५० कोटी रुपये दिले असून यांत्रिकीकरणासाठी निधी दिल्याचे नवाल यांनी सांगितले.बैठकीला पं.स. सभापती, लीड बँक मॅनेजर वामन कोहाड, सहा. निबंधक तलमले, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बन्सोड, बँकेचे शाखा व्यवस्थापक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.