शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

३० जूनच्या आत शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 23:13 IST

यावर्षी मान्सून वेळेत सुरू होत असल्याने शेतकऱ्यांना शेतीच्या तयारीसाठी पैशाची आवश्यकता आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वर्धा जिल्ह्यात केवळ ५ टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे.

ठळक मुद्देकिशोर तिवारी : पीक कर्ज वाटप आढावा बैठकीत सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : यावर्षी मान्सून वेळेत सुरू होत असल्याने शेतकऱ्यांना शेतीच्या तयारीसाठी पैशाची आवश्यकता आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वर्धा जिल्ह्यात केवळ ५ टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना ३० जूनच्या आत कर्ज वाटप पूर्ण करावे, अशा सूचना वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिल्या.तहसील कार्यालयात पीक कर्ज वितरण आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, आ. समीर कुणावार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, एसडीओ समाधान शेंडगे उपस्थित होते. तिवारी यांनी बँकेचे अधिकारी शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी आरबीआयच्या नियमापेक्षा अधिक कागदपत्रे मागून शेतकऱ्यांना त्रास देतात. याबाबत बँक अधिकाऱ्यांना खडसावले. जिल्हाधिकारी नवाल यांनी बँक अधिकाऱ्यांना आरबीआयचे नियम सांगितले. नियमाप्रमाणे एक लाख रुपयांपेक्षा कमी कर्जासाठी केवळ सातबारा, ८- अ आणि ६ क एवढेच कागदपत्र घेण्यात यावी, असे निर्देश आहेत. मूल्यांकन, चतु:सीमा यासारखे कागदपत्र मागू नयेत, असे सांगितले. शेतकºयांना सुलभ कर्ज वाटप करण्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि सहायक निबंधक यांना नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात यावे, अशा सूचना तिवारी यांनी दिल्या. कर्जमाफीची रक्कम अद्याप काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नसन्याबाबत आ. कुणावार यांनी बँक अधिकाऱ्यांना विचारणा केली. कर्जमाफीची रक्कम अद्याम जमा न झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात संपूर्ण रक्कम ३० जूनपर्यंत जमा करावी, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीला अनुपस्थित असणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस द्यावी, अशी मागणी त्यांनी याप्रसंगी केली. तूर आणि हरभरा खरेदीबाबत शासनाकडे बैठक लावावी. शेतकऱ्यांकडे अजूनही तूर व हरभरा पडून असल्याचे त्यांनी सांगितले. कर्जमाफी मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांची यादी बँक शाखेत तथा ग्रा.पं. मध्ये लावावी, असे ते म्हणाले.बोंडअळीचे पैसे हे योजनेचे पैसे आहेत, ते शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात वळते करू नये. कर्ज खात्यात वळते केल्याचे आढळल्यास सरकारी निधीचा गैरवापर प्रकरणी बँक अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा नवाल यांनी दिला. ठिबक सिंचन संचाचा बॅकलॉग यंदा पूर्ण केला. यासाठी ११.५० कोटी रुपये दिले असून यांत्रिकीकरणासाठी निधी दिल्याचे नवाल यांनी सांगितले.बैठकीला पं.स. सभापती, लीड बँक मॅनेजर वामन कोहाड, सहा. निबंधक तलमले, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बन्सोड, बँकेचे शाखा व्यवस्थापक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.