शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
5
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
6
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
7
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
8
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
9
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
10
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
11
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
12
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
13
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
14
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
15
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
16
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
17
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
18
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
19
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
20
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ

३० जूनच्या आत शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 23:13 IST

यावर्षी मान्सून वेळेत सुरू होत असल्याने शेतकऱ्यांना शेतीच्या तयारीसाठी पैशाची आवश्यकता आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वर्धा जिल्ह्यात केवळ ५ टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे.

ठळक मुद्देकिशोर तिवारी : पीक कर्ज वाटप आढावा बैठकीत सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : यावर्षी मान्सून वेळेत सुरू होत असल्याने शेतकऱ्यांना शेतीच्या तयारीसाठी पैशाची आवश्यकता आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वर्धा जिल्ह्यात केवळ ५ टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना ३० जूनच्या आत कर्ज वाटप पूर्ण करावे, अशा सूचना वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिल्या.तहसील कार्यालयात पीक कर्ज वितरण आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, आ. समीर कुणावार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, एसडीओ समाधान शेंडगे उपस्थित होते. तिवारी यांनी बँकेचे अधिकारी शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी आरबीआयच्या नियमापेक्षा अधिक कागदपत्रे मागून शेतकऱ्यांना त्रास देतात. याबाबत बँक अधिकाऱ्यांना खडसावले. जिल्हाधिकारी नवाल यांनी बँक अधिकाऱ्यांना आरबीआयचे नियम सांगितले. नियमाप्रमाणे एक लाख रुपयांपेक्षा कमी कर्जासाठी केवळ सातबारा, ८- अ आणि ६ क एवढेच कागदपत्र घेण्यात यावी, असे निर्देश आहेत. मूल्यांकन, चतु:सीमा यासारखे कागदपत्र मागू नयेत, असे सांगितले. शेतकºयांना सुलभ कर्ज वाटप करण्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि सहायक निबंधक यांना नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात यावे, अशा सूचना तिवारी यांनी दिल्या. कर्जमाफीची रक्कम अद्याप काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नसन्याबाबत आ. कुणावार यांनी बँक अधिकाऱ्यांना विचारणा केली. कर्जमाफीची रक्कम अद्याम जमा न झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात संपूर्ण रक्कम ३० जूनपर्यंत जमा करावी, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीला अनुपस्थित असणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस द्यावी, अशी मागणी त्यांनी याप्रसंगी केली. तूर आणि हरभरा खरेदीबाबत शासनाकडे बैठक लावावी. शेतकऱ्यांकडे अजूनही तूर व हरभरा पडून असल्याचे त्यांनी सांगितले. कर्जमाफी मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांची यादी बँक शाखेत तथा ग्रा.पं. मध्ये लावावी, असे ते म्हणाले.बोंडअळीचे पैसे हे योजनेचे पैसे आहेत, ते शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात वळते करू नये. कर्ज खात्यात वळते केल्याचे आढळल्यास सरकारी निधीचा गैरवापर प्रकरणी बँक अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा नवाल यांनी दिला. ठिबक सिंचन संचाचा बॅकलॉग यंदा पूर्ण केला. यासाठी ११.५० कोटी रुपये दिले असून यांत्रिकीकरणासाठी निधी दिल्याचे नवाल यांनी सांगितले.बैठकीला पं.स. सभापती, लीड बँक मॅनेजर वामन कोहाड, सहा. निबंधक तलमले, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बन्सोड, बँकेचे शाखा व्यवस्थापक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.