शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

जिल्हाधिकाऱ्यांनी ऐकल्या नवरगाववासीयांच्या व्यथा

By admin | Updated: June 14, 2014 23:45 IST

शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी एन. नवीन सोना आणि जि.प.मुख्यकार्यपालन अधिकारी उदय चौधरी यंत्रणेसह सेलू तालुक्यातील नवरगाव(हेटी) या दुर्गम शुक्रवारी सायंकाळी दाखल झाले.

शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणीसेलू : शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी एन. नवीन सोना आणि जि.प.मुख्यकार्यपालन अधिकारी उदय चौधरी यंत्रणेसह सेलू तालुक्यातील नवरगाव(हेटी) या दुर्गम शुक्रवारी सायंकाळी दाखल झाले. त्यांनी जनतेत मिसळून त्यांच्या समस्या ऐकूण घेतल्या. या निमित्त शासन आपल्या दारी अवतरल्याचा अनुभव गावकऱ्यांना आला. जिल्हाधिकाऱ्यांसह व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह अप्पर जिल्हाधिकारी संयज भागवत, वर्धेचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, सहाय्यक मुख्य वनसंरक्षक अधिकारी शरद करे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सावंत तसेच सेलूच्या तहसीलदार प्रियदर्शिनी बोरकर, नायब तहसीलदार सुभाष यादव, अजय झिले व बोर अभयारण्याच्या वनपरिक्षेत्र अधिकारी भिंगारे यांचा ताफा शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता गावात दाखल झाला. यावेळी गावातील सरपंच गिता कडूकर, उपसरपंच, पोलीस पाटील तसेच गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. नायब तहसीलदार सुभाष यादव यांनी या मागचा हेतू समजावून सांगितला. जिल्हाधिकारी सोना व सीईओ चौधरी यांनी चर्चा केली. यावेळी ग्रामस्थांनीही विविध समस्या पोटतिडकीने मांडून त्या सोडविण्याची अपेक्षा व्यक्त केली. सीईओ चौधरी यांनी राजीव गांधी जीवनदायी योजनेची माहिती दिली. या योजनेचे कार्ड वाटप करण्याच्या सूचना संबंधीत ग्रामसेवकांना दिल्या. अप्पर जिल्हाधिकारी भागवत यांनी आम आदमी विमा योजनेची माहिती देत अर्ज भरण्याचे आवाहन केले. गावकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण लवकर होईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले.(तालुका प्रतिनिधी)