शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या दुर्लक्षामुळे चौकांत अव्यवस्था

By admin | Updated: July 26, 2015 00:27 IST

शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणे, शहराचे सौंदर्यीकरण अबाधित राखणे, त्यात आणखी भर घालणे, शहाराला बकाल स्परूप येण्यापासून रोखणे आदी कामे स्थानिक...

पुतळ्यांना अतिक्रमणाचा विळखा : तीन चौक सुटसुटीत तर चार ठिकाणी वाहतुकीची कोंडीवर्धा : शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणे, शहराचे सौंदर्यीकरण अबाधित राखणे, त्यात आणखी भर घालणे, शहाराला बकाल स्परूप येण्यापासून रोखणे आदी कामे स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या पालिकेला करावी लागतात; पण वर्धा शहरात यासाठी प्रयत्नच होताना दिसत नाही. यामुळेच शहरातील काही चौक सुटसुटीत तर काही चौकांना बकाल स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसते. यामुळे वाहतुकीची कोंडी झाली असून शहराचे विद्रुपिकरणच होत असल्याचे दिसते. शहरातील बसस्थानक ते विश्राम गृह दरम्यान नेताची चौक, डॉ. आंबडेकर चौक आणि बापूराव देशमुख चौक आहे. यातील डॉ. आंबेडकर चौक सुटसुटीत आणि वाहतुकीच्या दृष्टीने योग्य आहे; पण नेताजी चौक आणि देशमुख चौकात व्यवस्थेचा अभावच आढळून येतो. नेताजी चौकात आॅटो तसेच अन्य वाहनांनी अतिक्रमण केले असून दुकानेही थाटली गेली आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळाही नेहमी दुर्लक्षित राहत असल्याचे दिसते. जि.प. इमारतीसमोर असलेल्या स्व. बापूराव देशमुख यांच्या पुतळ्याकडेही दुर्लक्षच होताना दिसते. या चौकात वाहतुकीची तितकीशी समस्या निर्माण होत नसली तरी हा पुतळा प्रेमी युगलांचा ठिय्या असल्याचे दिसते. महाविद्यालयीन युवक युवती येथे तासनतास बसून असतात.यानंतर महात्मा गांधी चौक सुटसुटीत असून वाहतुकीच्या दृष्टीने योग्य आहे. वर्धा शहरातील महात्मा गांधी चौक, बजाज चौक आणि डॉ. आंबेडकर चौक हे तीनच चौक वाहतुकीच्या दृष्टीने योग्य आहेत. अन्य चौकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसते. शहरातील महत्त्वाचा आणि सतत वर्दळ असलेला दादाजी धुनिवाले चौक वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक झाला आहे. वर्धा ते नागपूर मार्गावरील या चौकातून बॅचलर रोडवर जाण्याकरिता बाहेरील रस्ता आहे; पण सध्या या मार्गावरही वस्ती, महाविद्यालये झाल्याने रहदारी वाढली आहे. शिवाय चौकातच पेट्रोल पंप, रस्त्याच्या कडेला पानटपऱ्या आणि भाजीची दुकाने लावण्यात आली आहेत. यामुळे रहदारीच अडचणीत आल्याचे चित्र आहे. दादाजी धुनिवाले देवस्थान परिसरात नेहमीच वाहनांच्या रांगा लागतात. शिवाय वाहने रहिवाशी भागात वळविताना अपघाताचा धोका असतो. या चौकात बसेस तसेच ट्रॅव्हल्सचा थांबा आहे. प्रवासी निवारा चौकापासून काही अंतरावर असताना प्रवासी चौकातच उभे राहतात. यामुळे बसेस व ट्रॅव्हल्सही तेथेच थांबतात. मोठी वाहने रस्त्यावर उभी झाली की समोरून येणारी वाहने दिसत नाहीत आणि अपघात होतात. या चौकात अनेक मोठे अपघात झाले आहेत. पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देत वाहतुकीचे नियोजन करणे गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)