शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

पालिकेच्या दुर्लक्षामुळे चौकांत अव्यवस्था

By admin | Updated: July 26, 2015 00:27 IST

शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणे, शहराचे सौंदर्यीकरण अबाधित राखणे, त्यात आणखी भर घालणे, शहाराला बकाल स्परूप येण्यापासून रोखणे आदी कामे स्थानिक...

पुतळ्यांना अतिक्रमणाचा विळखा : तीन चौक सुटसुटीत तर चार ठिकाणी वाहतुकीची कोंडीवर्धा : शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणे, शहराचे सौंदर्यीकरण अबाधित राखणे, त्यात आणखी भर घालणे, शहाराला बकाल स्परूप येण्यापासून रोखणे आदी कामे स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या पालिकेला करावी लागतात; पण वर्धा शहरात यासाठी प्रयत्नच होताना दिसत नाही. यामुळेच शहरातील काही चौक सुटसुटीत तर काही चौकांना बकाल स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसते. यामुळे वाहतुकीची कोंडी झाली असून शहराचे विद्रुपिकरणच होत असल्याचे दिसते. शहरातील बसस्थानक ते विश्राम गृह दरम्यान नेताची चौक, डॉ. आंबडेकर चौक आणि बापूराव देशमुख चौक आहे. यातील डॉ. आंबेडकर चौक सुटसुटीत आणि वाहतुकीच्या दृष्टीने योग्य आहे; पण नेताजी चौक आणि देशमुख चौकात व्यवस्थेचा अभावच आढळून येतो. नेताजी चौकात आॅटो तसेच अन्य वाहनांनी अतिक्रमण केले असून दुकानेही थाटली गेली आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळाही नेहमी दुर्लक्षित राहत असल्याचे दिसते. जि.प. इमारतीसमोर असलेल्या स्व. बापूराव देशमुख यांच्या पुतळ्याकडेही दुर्लक्षच होताना दिसते. या चौकात वाहतुकीची तितकीशी समस्या निर्माण होत नसली तरी हा पुतळा प्रेमी युगलांचा ठिय्या असल्याचे दिसते. महाविद्यालयीन युवक युवती येथे तासनतास बसून असतात.यानंतर महात्मा गांधी चौक सुटसुटीत असून वाहतुकीच्या दृष्टीने योग्य आहे. वर्धा शहरातील महात्मा गांधी चौक, बजाज चौक आणि डॉ. आंबेडकर चौक हे तीनच चौक वाहतुकीच्या दृष्टीने योग्य आहेत. अन्य चौकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसते. शहरातील महत्त्वाचा आणि सतत वर्दळ असलेला दादाजी धुनिवाले चौक वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक झाला आहे. वर्धा ते नागपूर मार्गावरील या चौकातून बॅचलर रोडवर जाण्याकरिता बाहेरील रस्ता आहे; पण सध्या या मार्गावरही वस्ती, महाविद्यालये झाल्याने रहदारी वाढली आहे. शिवाय चौकातच पेट्रोल पंप, रस्त्याच्या कडेला पानटपऱ्या आणि भाजीची दुकाने लावण्यात आली आहेत. यामुळे रहदारीच अडचणीत आल्याचे चित्र आहे. दादाजी धुनिवाले देवस्थान परिसरात नेहमीच वाहनांच्या रांगा लागतात. शिवाय वाहने रहिवाशी भागात वळविताना अपघाताचा धोका असतो. या चौकात बसेस तसेच ट्रॅव्हल्सचा थांबा आहे. प्रवासी निवारा चौकापासून काही अंतरावर असताना प्रवासी चौकातच उभे राहतात. यामुळे बसेस व ट्रॅव्हल्सही तेथेच थांबतात. मोठी वाहने रस्त्यावर उभी झाली की समोरून येणारी वाहने दिसत नाहीत आणि अपघात होतात. या चौकात अनेक मोठे अपघात झाले आहेत. पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देत वाहतुकीचे नियोजन करणे गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)