शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

पालिकेच्या दुर्लक्षामुळे चौकांत अव्यवस्था

By admin | Updated: July 26, 2015 00:27 IST

शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणे, शहराचे सौंदर्यीकरण अबाधित राखणे, त्यात आणखी भर घालणे, शहाराला बकाल स्परूप येण्यापासून रोखणे आदी कामे स्थानिक...

पुतळ्यांना अतिक्रमणाचा विळखा : तीन चौक सुटसुटीत तर चार ठिकाणी वाहतुकीची कोंडीवर्धा : शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणे, शहराचे सौंदर्यीकरण अबाधित राखणे, त्यात आणखी भर घालणे, शहाराला बकाल स्परूप येण्यापासून रोखणे आदी कामे स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या पालिकेला करावी लागतात; पण वर्धा शहरात यासाठी प्रयत्नच होताना दिसत नाही. यामुळेच शहरातील काही चौक सुटसुटीत तर काही चौकांना बकाल स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसते. यामुळे वाहतुकीची कोंडी झाली असून शहराचे विद्रुपिकरणच होत असल्याचे दिसते. शहरातील बसस्थानक ते विश्राम गृह दरम्यान नेताची चौक, डॉ. आंबडेकर चौक आणि बापूराव देशमुख चौक आहे. यातील डॉ. आंबेडकर चौक सुटसुटीत आणि वाहतुकीच्या दृष्टीने योग्य आहे; पण नेताजी चौक आणि देशमुख चौकात व्यवस्थेचा अभावच आढळून येतो. नेताजी चौकात आॅटो तसेच अन्य वाहनांनी अतिक्रमण केले असून दुकानेही थाटली गेली आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळाही नेहमी दुर्लक्षित राहत असल्याचे दिसते. जि.प. इमारतीसमोर असलेल्या स्व. बापूराव देशमुख यांच्या पुतळ्याकडेही दुर्लक्षच होताना दिसते. या चौकात वाहतुकीची तितकीशी समस्या निर्माण होत नसली तरी हा पुतळा प्रेमी युगलांचा ठिय्या असल्याचे दिसते. महाविद्यालयीन युवक युवती येथे तासनतास बसून असतात.यानंतर महात्मा गांधी चौक सुटसुटीत असून वाहतुकीच्या दृष्टीने योग्य आहे. वर्धा शहरातील महात्मा गांधी चौक, बजाज चौक आणि डॉ. आंबेडकर चौक हे तीनच चौक वाहतुकीच्या दृष्टीने योग्य आहेत. अन्य चौकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसते. शहरातील महत्त्वाचा आणि सतत वर्दळ असलेला दादाजी धुनिवाले चौक वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक झाला आहे. वर्धा ते नागपूर मार्गावरील या चौकातून बॅचलर रोडवर जाण्याकरिता बाहेरील रस्ता आहे; पण सध्या या मार्गावरही वस्ती, महाविद्यालये झाल्याने रहदारी वाढली आहे. शिवाय चौकातच पेट्रोल पंप, रस्त्याच्या कडेला पानटपऱ्या आणि भाजीची दुकाने लावण्यात आली आहेत. यामुळे रहदारीच अडचणीत आल्याचे चित्र आहे. दादाजी धुनिवाले देवस्थान परिसरात नेहमीच वाहनांच्या रांगा लागतात. शिवाय वाहने रहिवाशी भागात वळविताना अपघाताचा धोका असतो. या चौकात बसेस तसेच ट्रॅव्हल्सचा थांबा आहे. प्रवासी निवारा चौकापासून काही अंतरावर असताना प्रवासी चौकातच उभे राहतात. यामुळे बसेस व ट्रॅव्हल्सही तेथेच थांबतात. मोठी वाहने रस्त्यावर उभी झाली की समोरून येणारी वाहने दिसत नाहीत आणि अपघात होतात. या चौकात अनेक मोठे अपघात झाले आहेत. पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देत वाहतुकीचे नियोजन करणे गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)