शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दुभाजक सौंदर्यीकरणाचेच विद्रुपीकरण

By admin | Updated: March 12, 2015 01:36 IST

शहरातील बजाज चौक ते शिवाजी पुतळा या मुख्य मार्गावरील रस्ता दुभाजकाचे सौदर्यीकरण करण्याची योजना तत्कालीन नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्या कार्यकाळात आखण्यात आली.

वर्धा : शहरातील बजाज चौक ते शिवाजी पुतळा या मुख्य मार्गावरील रस्ता दुभाजकाचे सौदर्यीकरण करण्याची योजना तत्कालीन नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्या कार्यकाळात आखण्यात आली. याचे ‘रोल मॉडेल’ सोशालिस्ट चौकात तयार करण्यात आले. सिमेंटचे आकर्षक टाके बसवून त्यात झाडे लावण्यात आली. तसेच जाहिराती लावण्याचीही सोय करण्यात आली. परंतु सध्या यातील बरीच झाडे वाळून केवळ माती उरली आहे. त्यामुळे हे सौंदर्यीकरणच शहरासाठी विद्रुपीकरण ठरत आहे. सामाजिक संस्था आणि व्यावसायिकांच्या सहकार्याने इतर चौकात नंतर असेच सौंदर्यीकरण केले जाणार होते. परंतु नवनिर्वाचित नगराध्यक्ष याकडे दुर्लक्ष करीत असल्याने या दुभाजकाची स्थिती अधीकच वाईट झाली आहे. शहरातील बजाज चौक ते शिवाजी पुतळा हा मुख्य मार्ग आहे. या मार्गावर छोटे छोटे चौक असून दोन्ही बाजूला असलेल्या मार्केटमध्ये जाणे सोयीस्कर होते. मुख्य मार्ग असल्याने तो आकर्षक आणि हिरवळीचा असावा अशी शहरवासीयांची स्वाभाविक इच्छा आहे. यासाठी म्हणून काही वर्षापूर्वी दुभाजकांवर लोखंडी कठडे बसवून झाडे लावण्यात आली. पण यातील झाडांकडे लक्ष न दिल्याने दुभाजकांवर रान तयार झाले. तसेच कठडेही अपघातांमुळे तुटून बाहेरच्या बाजूला वाकले. त्यामुळे अपघातही वाढले. मोठ्या झाडांच्या सावलीत मोकाट जनावरे बसण्याचा प्रकार सुरू झाला. आजही हा प्रकार सुरू आहे. या सर्व बाबींना आळा बसावा यासाठी म्हणून नगरपालिकेच्या वतीने तत्कालीन नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्या कार्यकाळात दुभाजक सौदर्यीकरणाचे एक नये रोल मॉडेल तयार करण्यात आले. याचा डेमो सोशालिस्ट चौकात तयार करण्यात आला. दुभाजकांवर त्रिकोणी आकाराचे सिमेंटचे टाके बसवून त्यात झाडे लावण्यात आली. तसेच त्यावर छोटे बॅनर लावण्याची सोयही करण्यात आली. नगर परिषदेच्या योजना तिथे बॅनरच्या सहाय्याने लावण्यात आल्या. पुढे जाऊन असेच सौदर्यीकरण इतरही चौकातील दुभाजकांवर सामाजिक संस्था आणि इतर व्यावसायिकांच्या मदतीने करण्याचा मानस होता. येथे आपल्या जाहिराती लावण्याची मुभा देण्यात येणार होती. पालिकेचे उत्पन्न वाढावे हा यामागील मानस होता. पण सध्या या सौदर्यीकरणाचेच तीनतेरा वाजले आहे.सध्या या टाक्यांमधील बरीच झाडे वाळली असून त्यात केवळ माती उरली आहे. नियमित स्वच्छता होत नसल्याने परिसरातील कागदाचा कचरा, प्लास्टिक पाणी पाऊच, खर्रा पन्नी, गुटखा पुड्या अशा प्रकारचा कचरा या कुंड्यांमध्ये आढळून येतो. नवे नगराध्यक्ष याकडे लक्षच द्यायला तयार नसल्याने विदृपीकरण वाढत आहेत. यामुळे दुभाजक सौंदर्यीकरणाचे ‘रोल मॉडेल’ केवळ ‘मॉडेल’ पुरतेच उरल्याचा प्रत्यय येत आहे.(शहर प्रतिनिधी)