शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

गढूळ पाण्यामुळे आजारांचा धोका

By admin | Updated: August 4, 2016 00:38 IST

शहरालगतच्या सावंगी (मेघे) ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मास्टर कॉलनी आणि गौरीनगर परिसरात गत काही दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे.

मास्टर कॉलनी, गौरी नगरातील प्रकार : पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन नालीतून वर्धा : शहरालगतच्या सावंगी (मेघे) ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मास्टर कॉलनी आणि गौरीनगर परिसरात गत काही दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. परिणामी, परिसरात विविध आजारांचा फैलाव होत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत अनेकदा जीवन प्राधिकरण व ग्रा.पं. प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या; पण अद्याप कार्यवाही झाली नाही. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. वर्धा ते यवतमाळ मार्गावर असलेल्या व सावंगी (मेघे) ग्रा.पं. अंतर्गत येणाऱ्या मास्टर कॉलनी आणि गौरी नगर परिसराला जीवन प्राधिकरणकडून पाणीपुरवठा केला जातो. किमान पिण्याचे पाणी शुद्ध मिळावे, अशी नागरिकांची अपेक्षा असते; पण गत काही दिवसांपासून या भागात गढूळ पाण्याचा पुरवठा केला जात आहे. मास्टर कॉलनीमध्ये असलेली पाईपलाईन अनेक दिवसांपूर्वी फुटली होती. याबाबत नागरिकांनी जीवन प्राधिकरण तसेच सावंगी (मेघे) ग्रा.पं. प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या; पण यावर अद्याप कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. परिणामी, नागरिकांना पावसाळ्यात गढूळ व अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. मॉस्टर कॉलनीमध्ये फुटलेली पाईपलाईन सांडपाणी वाहून नेणाऱ्या नालीमध्ये असल्याने अक्षरश: नालीतील सांडपाणीच नळाद्वारे नागरिकांना पुरविले जात असल्याचे प्रत्यक्ष पाहणीमध्ये आढळून आले. या प्रकारामुळे परिसरात अनेक आजारांचा फैलाव होत असून चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय या भागातील नागरिकांना सुविधा पुरविण्यातही ग्रा.पं. प्रशासन अपयशी ठरत आहे. या भागात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. खड्डेमय रस्त्यामुळे नागरिकांना ये-जा करतानाही प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून आले. ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी) ‘त्या’ घरातील महिलेचे दोन महिन्यांसाठी मुलीकडे वास्तव्य ४वर्धा ते यवतमाळ मार्गाला लागूनच साधू नगराळे यांचे घर आहे. या घरात त्यांच्या पत्नीच वास्तव्य करतात. घराच्या आजूबाजूला असलेले रस्ते आणि नाल्यांची उंची अधिक झाल्याने पावसाचे तसेच सांडपाणी या घरामध्ये शिरते. परिणामी, या महिलेला पावसाळ्याचे दोन महिने आपल्या मुलीकडे राहायला जावे लागते. याबाबत अनेकदा निवेदने देण्यात आलीत; पण अद्यापही कार्यवाही करण्यात आलेली नाही. पावसाचे पाणी थेट घरात शिरत असल्याने तेथे राहणेच कठीण झाले आहे. शिवाय सरपटणाऱ्या प्राण्यांचाही धोका राहत असल्याने एकटी महिला त्या घरात राहणार कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.