शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
3
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
6
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
7
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
8
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
9
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
10
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
11
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
12
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
13
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
14
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
15
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
17
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
18
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
19
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
20
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार

गढूळ पाण्यामुळे आजारांचा धोका

By admin | Updated: August 4, 2016 00:38 IST

शहरालगतच्या सावंगी (मेघे) ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मास्टर कॉलनी आणि गौरीनगर परिसरात गत काही दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे.

मास्टर कॉलनी, गौरी नगरातील प्रकार : पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन नालीतून वर्धा : शहरालगतच्या सावंगी (मेघे) ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मास्टर कॉलनी आणि गौरीनगर परिसरात गत काही दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. परिणामी, परिसरात विविध आजारांचा फैलाव होत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत अनेकदा जीवन प्राधिकरण व ग्रा.पं. प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या; पण अद्याप कार्यवाही झाली नाही. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. वर्धा ते यवतमाळ मार्गावर असलेल्या व सावंगी (मेघे) ग्रा.पं. अंतर्गत येणाऱ्या मास्टर कॉलनी आणि गौरी नगर परिसराला जीवन प्राधिकरणकडून पाणीपुरवठा केला जातो. किमान पिण्याचे पाणी शुद्ध मिळावे, अशी नागरिकांची अपेक्षा असते; पण गत काही दिवसांपासून या भागात गढूळ पाण्याचा पुरवठा केला जात आहे. मास्टर कॉलनीमध्ये असलेली पाईपलाईन अनेक दिवसांपूर्वी फुटली होती. याबाबत नागरिकांनी जीवन प्राधिकरण तसेच सावंगी (मेघे) ग्रा.पं. प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या; पण यावर अद्याप कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. परिणामी, नागरिकांना पावसाळ्यात गढूळ व अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. मॉस्टर कॉलनीमध्ये फुटलेली पाईपलाईन सांडपाणी वाहून नेणाऱ्या नालीमध्ये असल्याने अक्षरश: नालीतील सांडपाणीच नळाद्वारे नागरिकांना पुरविले जात असल्याचे प्रत्यक्ष पाहणीमध्ये आढळून आले. या प्रकारामुळे परिसरात अनेक आजारांचा फैलाव होत असून चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय या भागातील नागरिकांना सुविधा पुरविण्यातही ग्रा.पं. प्रशासन अपयशी ठरत आहे. या भागात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. खड्डेमय रस्त्यामुळे नागरिकांना ये-जा करतानाही प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून आले. ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी) ‘त्या’ घरातील महिलेचे दोन महिन्यांसाठी मुलीकडे वास्तव्य ४वर्धा ते यवतमाळ मार्गाला लागूनच साधू नगराळे यांचे घर आहे. या घरात त्यांच्या पत्नीच वास्तव्य करतात. घराच्या आजूबाजूला असलेले रस्ते आणि नाल्यांची उंची अधिक झाल्याने पावसाचे तसेच सांडपाणी या घरामध्ये शिरते. परिणामी, या महिलेला पावसाळ्याचे दोन महिने आपल्या मुलीकडे राहायला जावे लागते. याबाबत अनेकदा निवेदने देण्यात आलीत; पण अद्यापही कार्यवाही करण्यात आलेली नाही. पावसाचे पाणी थेट घरात शिरत असल्याने तेथे राहणेच कठीण झाले आहे. शिवाय सरपटणाऱ्या प्राण्यांचाही धोका राहत असल्याने एकटी महिला त्या घरात राहणार कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.