शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मानवाधिकार सभेत सुरक्षा कर्मचार्‍यांच्या व्यथांवर चर्चा

By admin | Updated: May 30, 2014 00:18 IST

मानवाधिकार परिषद जिल्हा शाखेच्यावतीने राजेश झोरे, दामू अन्ना उघडे यांच्या उपस्थितीत रमेश खैरे यांच्या अध्यक्षतेत जिल्हा कार्यालयात सभा घेण्यात आली. या सभेत वर्धा शहर व जिल्ह्यातील विविध ठिकाणी,

वर्धा : मानवाधिकार परिषद जिल्हा शाखेच्यावतीने राजेश झोरे, दामू अन्ना उघडे यांच्या उपस्थितीत रमेश खैरे यांच्या अध्यक्षतेत जिल्हा कार्यालयात सभा घेण्यात आली. या सभेत वर्धा शहर व जिल्ह्यातील विविध ठिकाणी, कारखाने, प्रतिष्ठान, महाविद्यालये, शाळांत कार्यरत सुरक्षा कर्मचार्‍यांच्या व्यथांवर चर्चा करण्यात आली.विविध ठिकाणी सुरक्षा कर्मचारी कंत्राटदारांतर्गत कार्यरत आहेत. या कर्मचार्‍यांनी सभेत आपल्या व्यथा तक्रारीच्या माध्यमातून मांडल्या. यात सुरक्षा कर्मचार्‍यांचे वेतन नियमानुसार नाही, रोजंदारीचे न्यूनतम वेतन मिळत नाही, अल्प वेतनात काम करावे लागते, जबाबदारी मात्र मोठी असते, साप्ताहिक सुटी दिली जात नाही आदींचा समावेश आहे. यात साप्ताहिक सुटी नियमाप्रमाणे देण्यात यावी, ठेकेदार सुरक्षा कर्मचार्‍यांचा निर्वाहभत्ता, भविष्य निर्वाह निधीत जमा करीत नसल्याने पेन्शन मिळत नाही, सुरक्षा कर्मचारी कामावर असताना सुरक्षित नसतो, त्याला अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. कदाचित एखाद्या प्रसंगात कामावर असताना जखमी झाला तर त्याचा उपचार कंत्राटदार करीत नाही. राज्य कर्मचारी विम्याच्या दवाखान्यातून उपचार केले जातात; पण त्यासाठी कंत्राटदाराने सुरक्षा कर्मचार्‍यांचा विमा उतरविणे गरजेचे आहे. सुरक्षा कर्मचारी कर्तव्यावर रूजू होताच ही प्रक्रिया करणे गरजेचे आहे. आगाऊ कर्तव्य बजावल्यास ओव्हरटाईम दिला जात नाही. सुरक्षा कर्मचार्‍यांना पूर्ण ड्रेस दिला जात नाही. यात जोडे, बेल्ट, मोजे, कॅप, शिटी आदी वस्तू दिल्याच जात नाहीत. काही सुरक्षा रक्षक कंपन्यांमध्ये शर्टच दिले जातात. फुलपॅन्ट तुमचाच वापरा, असे सांगतले जाते. ओळखपत्रही दिले जात नसल्याचे यावेळी कर्मचार्‍यांद्वारे सांगण्यात आले. कंत्राटदार सुरक्षेच्या नावावर अमाप पैसा कमवितात; पण सुरक्षा कर्मचार्‍यांना किमान वेतन कायद्यानुसारही वेतन देत नसल्याने अनेक कर्मचार्‍यांची ओढताण होते. बहुतांश कंत्राटदारांजवळ सुरक्षा रक्षक एजेंसी चालविण्याचा परवाना नाही. सुरक्षा कर्मचारी याबाबत अनभिज्ञ आहे. नाईलाज म्हणून कंत्राटदार देतील त्या वेतनावर सुरक्षा रक्षक काम करतात. सुरक्षा कर्मचारीच सुरक्षित नसेल तर तो संबंधित कंपनी वा प्रतिष्ठानाला काय सुरक्षा देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सुरक्षा कर्मचार्‍यांना न्याय मिळाला, त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी संबंधित अधिकार्‍यांना निवेदन सादर करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. सभेचे संचालन मित्रजित मेंढे यांनी केले तर आभार लता बोबडे यांनी मानले. सभेला हमीद शेख, चांद शेख, शेख बापुमीया मालाधरी, अँड. नवनीत पवार, अँड. स्वाती नामदेव बोकडे, नरेंद्र इंगोले, भाऊराव बांगडे, मदन दांडेकर, सचिन क्षीरसागर, अँड. शिरीष दामले, अँड. मेश्रामकर, अँड. पाटील, आशा सूर्यवंशी, सखाराम फुलझेले, प्रसाद गुप्ता आदींनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)