शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मानवाधिकार सभेत सुरक्षा कर्मचार्‍यांच्या व्यथांवर चर्चा

By admin | Updated: May 30, 2014 00:18 IST

मानवाधिकार परिषद जिल्हा शाखेच्यावतीने राजेश झोरे, दामू अन्ना उघडे यांच्या उपस्थितीत रमेश खैरे यांच्या अध्यक्षतेत जिल्हा कार्यालयात सभा घेण्यात आली. या सभेत वर्धा शहर व जिल्ह्यातील विविध ठिकाणी,

वर्धा : मानवाधिकार परिषद जिल्हा शाखेच्यावतीने राजेश झोरे, दामू अन्ना उघडे यांच्या उपस्थितीत रमेश खैरे यांच्या अध्यक्षतेत जिल्हा कार्यालयात सभा घेण्यात आली. या सभेत वर्धा शहर व जिल्ह्यातील विविध ठिकाणी, कारखाने, प्रतिष्ठान, महाविद्यालये, शाळांत कार्यरत सुरक्षा कर्मचार्‍यांच्या व्यथांवर चर्चा करण्यात आली.विविध ठिकाणी सुरक्षा कर्मचारी कंत्राटदारांतर्गत कार्यरत आहेत. या कर्मचार्‍यांनी सभेत आपल्या व्यथा तक्रारीच्या माध्यमातून मांडल्या. यात सुरक्षा कर्मचार्‍यांचे वेतन नियमानुसार नाही, रोजंदारीचे न्यूनतम वेतन मिळत नाही, अल्प वेतनात काम करावे लागते, जबाबदारी मात्र मोठी असते, साप्ताहिक सुटी दिली जात नाही आदींचा समावेश आहे. यात साप्ताहिक सुटी नियमाप्रमाणे देण्यात यावी, ठेकेदार सुरक्षा कर्मचार्‍यांचा निर्वाहभत्ता, भविष्य निर्वाह निधीत जमा करीत नसल्याने पेन्शन मिळत नाही, सुरक्षा कर्मचारी कामावर असताना सुरक्षित नसतो, त्याला अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. कदाचित एखाद्या प्रसंगात कामावर असताना जखमी झाला तर त्याचा उपचार कंत्राटदार करीत नाही. राज्य कर्मचारी विम्याच्या दवाखान्यातून उपचार केले जातात; पण त्यासाठी कंत्राटदाराने सुरक्षा कर्मचार्‍यांचा विमा उतरविणे गरजेचे आहे. सुरक्षा कर्मचारी कर्तव्यावर रूजू होताच ही प्रक्रिया करणे गरजेचे आहे. आगाऊ कर्तव्य बजावल्यास ओव्हरटाईम दिला जात नाही. सुरक्षा कर्मचार्‍यांना पूर्ण ड्रेस दिला जात नाही. यात जोडे, बेल्ट, मोजे, कॅप, शिटी आदी वस्तू दिल्याच जात नाहीत. काही सुरक्षा रक्षक कंपन्यांमध्ये शर्टच दिले जातात. फुलपॅन्ट तुमचाच वापरा, असे सांगतले जाते. ओळखपत्रही दिले जात नसल्याचे यावेळी कर्मचार्‍यांद्वारे सांगण्यात आले. कंत्राटदार सुरक्षेच्या नावावर अमाप पैसा कमवितात; पण सुरक्षा कर्मचार्‍यांना किमान वेतन कायद्यानुसारही वेतन देत नसल्याने अनेक कर्मचार्‍यांची ओढताण होते. बहुतांश कंत्राटदारांजवळ सुरक्षा रक्षक एजेंसी चालविण्याचा परवाना नाही. सुरक्षा कर्मचारी याबाबत अनभिज्ञ आहे. नाईलाज म्हणून कंत्राटदार देतील त्या वेतनावर सुरक्षा रक्षक काम करतात. सुरक्षा कर्मचारीच सुरक्षित नसेल तर तो संबंधित कंपनी वा प्रतिष्ठानाला काय सुरक्षा देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सुरक्षा कर्मचार्‍यांना न्याय मिळाला, त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी संबंधित अधिकार्‍यांना निवेदन सादर करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. सभेचे संचालन मित्रजित मेंढे यांनी केले तर आभार लता बोबडे यांनी मानले. सभेला हमीद शेख, चांद शेख, शेख बापुमीया मालाधरी, अँड. नवनीत पवार, अँड. स्वाती नामदेव बोकडे, नरेंद्र इंगोले, भाऊराव बांगडे, मदन दांडेकर, सचिन क्षीरसागर, अँड. शिरीष दामले, अँड. मेश्रामकर, अँड. पाटील, आशा सूर्यवंशी, सखाराम फुलझेले, प्रसाद गुप्ता आदींनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)