शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे पासधारकांच्या समस्यांवर रेल्वेमंत्र्यांशी चर्चा

By admin | Updated: March 18, 2017 01:09 IST

अनेक दिवसांपासून प्रवासी संघटना व दैनंदिनी प्रवास करणारे पासधारक, मासिक पासधारक प्रवाशांना अमरावती-नागपूर

 रामदास तडस यांचे निवदेन : अमरावती-अजनी इंटरसिटीची वेळ बदलण्याची मागणी वर्धा : अनेक दिवसांपासून प्रवासी संघटना व दैनंदिनी प्रवास करणारे पासधारक, मासिक पासधारक प्रवाशांना अमरावती-नागपूर व नागपूर बल्लारशाह दरम्यान अनेक समस्याचा सामना करावा लागतो. याला अनुसरून खा. रामदास तडस यांनी शुक्रवारी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली. वर्धा रेल्वे स्थानकावर काही दिवसांपूर्वी उत्स्फूर्तपणे रेल्वे रोको करून पासधारकांनी ऐक्याचे दर्शन घडविले. यानंतर रेल्वे स्थानकावरच सभा झाली. या सभेकरिता वर्धेतील आमदार खासदारासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. त्यावेळी दिलेले प्रमुख मागण्याचे निवेदन आज त्यांनी रेल्वेमंत्र्यांकडे सादर करून चर्चा केली. रेल्वेमंत्री यांनी संपूर्ण निवेदन समजून घेत त्वरित कार्यवाहीकरिता संबंधित विभागाला पाठविले. तसेच या निवेदनातील प्रमुख मागण्यापैकी एक असलेल्या अमरावती-अजनी (नागपूर) इंटरसिटी एक्स्प्रेस सकाळी ५.३० वाजता ऐवजी ७ करण्याकरिता सकारात्मक प्रतिसाद दिला. लवकरच ही मागणी पूर्ण करण्याविषयी सकारात्मक आवश्वासन त्यांनी दिल्याचे खा. तडस यांनी कळविले आहे. रेल्वे पासधारकांच्या समस्या मार्गी लागण्याकरिता व त्यांना दिलासा देण्याकरिता रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांच्या सुचनेनुसार महाप्रबंधक मध्य रेल्वे मुंबई, विभागीय रेल्वे प्रबंधक, नागपूर यांच्याकडे विशेष बैठक होणार असल्याचे खासदारांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.(प्रतिनिधी) हिंगणघाट येथील रेल्वे उड्डाणपुलाचा मुद्दा संसदेत नागपूर- हैदराबाद मार्गावर असलेल्या हिंगणघाट येथील रेल्वे गेटवर गत अनेक वर्षांपासून पुलाचे बांधकाम सुरू आहे. तो पूर्णत्त्वास येत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याची जाणीव लक्षात घेऊन खा. रामदास तडस यांनी लोकसभेत अतारांकित प्रश्न उपस्थित केला. अनेक वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वर अस्तित्वात असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे कार्य सुरू आहे. दरम्यानच्या काळात खा. तडस यांनी भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण व भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेत या कार्याला गती देण्याच्या सूचना केल्या होत्या. रेल्वे विभागातर्फे मेगा ब्लॉक उपलब्ध करून दिला जात नसल्याने हे उड्डाणपुलाचे कार्य संथगतीने सुरू असल्याचे कारण अधिकाऱ्यांनी दिले होते. या समस्येला अनुसरून व संसदेत उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या आधारे खासदारांनी रेल्वे मंत्री यांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेअंती पूल लवकरच पूर्ण होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.