शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

‘लोकतंत्र आणि महात्मा’ व ‘मिटती खेती उजडता किसान’वर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 22:29 IST

येथील सेवाग्राम आश्रम परिसरात राष्ट्रीयस्तरावर होणारे तीन दिवसीय संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या ४७ व्या संमेलनात देशभरातून सुमारे ३,५०० ते ४,००० हजार गांधी विचार, आदर्श आणि समस्येवर विकल्प शोधणारे विचारवंत यात सहभागी होणार आहेत.

ठळक मुद्देसर्वोदयींचे तीन दिवसीय संमेलन : देशभरातून चार हजार गांधी विचारवंत होणार सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : येथील सेवाग्राम आश्रम परिसरात राष्ट्रीयस्तरावर होणारे तीन दिवसीय संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या ४७ व्या संमेलनात देशभरातून सुमारे ३,५०० ते ४,००० हजार गांधी विचार, आदर्श आणि समस्येवर विकल्प शोधणारे विचारवंत यात सहभागी होणार आहेत. शिवाय या संमेलनात ‘लोकतंत्र आणि महात्मा’ तसेच ’मिटती खेती उजडता किसान’ या विषयावर चर्चा होणार असल्याची माहिती संमेलन संयोजक आदित्य पटनायक यांनी दिली.पटनायक म्हणाले २०१९ मध्ये गांधीजींची १५० वी जयंती असल्याने या संमेलनाचे महत्त्व काही वेगळे आहे. संमेलनाचे प्रमुख आयोजक सर्वोदय समाज सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान, सर्व सेवा संघ आहेत. देश व जगात आज सत्य, प्रेम, करूणा, बंधुभाव यावर चालण्याचा मार्ग गांधी विचारातून जातो. त्यामुळे संमेलनाचा विषय वैश्विक आव्हाने व गांधीवादी विकल्प हा ठेवला आहे. समस्येचा विचार करता समाधान गांधी विचार व कार्यातूनच दिसते. त्यामुळे गांधी विचार मानणाºयांची संख्या वाढली. गांधी जयंती जगात यादगार ठरावी याची ही पूर्व तयारी समजायला हरकत नाही. संमेलनात सहभागींची संख्या जास्त असल्याने व्यवस्थेची तयारी जोरात असल्याचे आदित्य भाई यांनी सांगितले. आश्रम परिसरात भव्य सभा मंडप, निवास व्यवस्था आणि भोजन व्यवस्था करण्यात येत आहे. स्थानिक, वर्धा आणि विद्यापीठातील स्वयंसेवक यासाठी मदत करणार आहे.२३ फेबु्रवारी रोजी सकाळी १०.३० वाजता सुप्रसिद्ध गांधीवादी डॉ. एस. एन. सुब्बाराव यांच्या अध्यक्षतेखाली, गांधीजींचे नातू राजमोहन गांधी यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी व आयोजक समितीचे पदाधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे. या संमेलनात मेधा पाटकर विचार व्यक्त करणार असल्याची माहिती आदित्य पटनायक यांनी बोलताना दिली.सेवाग्राम येथे होणाऱ्या या संमेलनात देशभरातील गांधी विचारवंत सहभागी होणार आहे. या विचारवंतांना चर्चेदरम्यान कुठलीही अडचण जाणवणार नाही याची खबरदारी घेण्याकरिता आयोजन समितीकडून पूरेपुर तयारी करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे.