शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

‘लोकतंत्र आणि महात्मा’ व ‘मिटती खेती उजडता किसान’वर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 22:29 IST

येथील सेवाग्राम आश्रम परिसरात राष्ट्रीयस्तरावर होणारे तीन दिवसीय संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या ४७ व्या संमेलनात देशभरातून सुमारे ३,५०० ते ४,००० हजार गांधी विचार, आदर्श आणि समस्येवर विकल्प शोधणारे विचारवंत यात सहभागी होणार आहेत.

ठळक मुद्देसर्वोदयींचे तीन दिवसीय संमेलन : देशभरातून चार हजार गांधी विचारवंत होणार सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : येथील सेवाग्राम आश्रम परिसरात राष्ट्रीयस्तरावर होणारे तीन दिवसीय संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या ४७ व्या संमेलनात देशभरातून सुमारे ३,५०० ते ४,००० हजार गांधी विचार, आदर्श आणि समस्येवर विकल्प शोधणारे विचारवंत यात सहभागी होणार आहेत. शिवाय या संमेलनात ‘लोकतंत्र आणि महात्मा’ तसेच ’मिटती खेती उजडता किसान’ या विषयावर चर्चा होणार असल्याची माहिती संमेलन संयोजक आदित्य पटनायक यांनी दिली.पटनायक म्हणाले २०१९ मध्ये गांधीजींची १५० वी जयंती असल्याने या संमेलनाचे महत्त्व काही वेगळे आहे. संमेलनाचे प्रमुख आयोजक सर्वोदय समाज सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान, सर्व सेवा संघ आहेत. देश व जगात आज सत्य, प्रेम, करूणा, बंधुभाव यावर चालण्याचा मार्ग गांधी विचारातून जातो. त्यामुळे संमेलनाचा विषय वैश्विक आव्हाने व गांधीवादी विकल्प हा ठेवला आहे. समस्येचा विचार करता समाधान गांधी विचार व कार्यातूनच दिसते. त्यामुळे गांधी विचार मानणाºयांची संख्या वाढली. गांधी जयंती जगात यादगार ठरावी याची ही पूर्व तयारी समजायला हरकत नाही. संमेलनात सहभागींची संख्या जास्त असल्याने व्यवस्थेची तयारी जोरात असल्याचे आदित्य भाई यांनी सांगितले. आश्रम परिसरात भव्य सभा मंडप, निवास व्यवस्था आणि भोजन व्यवस्था करण्यात येत आहे. स्थानिक, वर्धा आणि विद्यापीठातील स्वयंसेवक यासाठी मदत करणार आहे.२३ फेबु्रवारी रोजी सकाळी १०.३० वाजता सुप्रसिद्ध गांधीवादी डॉ. एस. एन. सुब्बाराव यांच्या अध्यक्षतेखाली, गांधीजींचे नातू राजमोहन गांधी यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी व आयोजक समितीचे पदाधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे. या संमेलनात मेधा पाटकर विचार व्यक्त करणार असल्याची माहिती आदित्य पटनायक यांनी बोलताना दिली.सेवाग्राम येथे होणाऱ्या या संमेलनात देशभरातील गांधी विचारवंत सहभागी होणार आहे. या विचारवंतांना चर्चेदरम्यान कुठलीही अडचण जाणवणार नाही याची खबरदारी घेण्याकरिता आयोजन समितीकडून पूरेपुर तयारी करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे.