शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना फीमध्ये सवलत द्या

By admin | Updated: April 1, 2017 01:08 IST

कृषीप्रधान देश असलेल्या भारतात शेतकरी आत्महत्येसारखा कठोर निर्णय घेत आहे.

मुख्यमंत्र्यांना निवेदनातून वर्धेतील तरुण-तरुणींचे साकडे वर्धा : कृषीप्रधान देश असलेल्या भारतात शेतकरी आत्महत्येसारखा कठोर निर्णय घेत आहे. वर्धेसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या झाल्या. शेतकरी आत्महत्येचे सत्र अद्यापही सुरू असून आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी शासनाने उचलावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून वर्धेतील तरुण-तरूणींनी केली आहे. निवेदनातून, घरातील कर्त्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्यास त्याचा संपूर्ण परिवार उघड्यावर येतो. कर्ज बाजारीपणा, सततची नापिकी, निसर्गाचा लहरीपणा, शेतमालाला न मिळणारा योग्य भाव आदी करणांमुळे शेतकरी हतबल होत आत्महत्येचा निर्णय घेत आहे. त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली त्याच्या पाल्याच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरविले आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्याला आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्यावरील कर्ज तात्काळ माफ करण्यात यावे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलाच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च शासनाने उचलावा, अशी मागणी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना निरज बुटे, अजिंक्य मकेश्वर, शंतनु भोयर, अमर बेलगे, धीरज चव्हाण, दुष्यंत ठाकरे, अमेय देवगडकर, अमोल थोटे, निखील ठाकरे, लोकेश साहु, सुमेध हजबे, आशीष वासनिक, शुभम बानोडे, वैष्णवी डाफ, कृतिका भोयर, पलक रोहनकर, श्रद्धा बारोकर आदींची उपस्थिती होती.(शहर प्रतिनिधी)