शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना फीमध्ये सवलत द्या

By admin | Updated: April 1, 2017 01:08 IST

कृषीप्रधान देश असलेल्या भारतात शेतकरी आत्महत्येसारखा कठोर निर्णय घेत आहे.

मुख्यमंत्र्यांना निवेदनातून वर्धेतील तरुण-तरुणींचे साकडे वर्धा : कृषीप्रधान देश असलेल्या भारतात शेतकरी आत्महत्येसारखा कठोर निर्णय घेत आहे. वर्धेसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या झाल्या. शेतकरी आत्महत्येचे सत्र अद्यापही सुरू असून आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी शासनाने उचलावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून वर्धेतील तरुण-तरूणींनी केली आहे. निवेदनातून, घरातील कर्त्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्यास त्याचा संपूर्ण परिवार उघड्यावर येतो. कर्ज बाजारीपणा, सततची नापिकी, निसर्गाचा लहरीपणा, शेतमालाला न मिळणारा योग्य भाव आदी करणांमुळे शेतकरी हतबल होत आत्महत्येचा निर्णय घेत आहे. त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली त्याच्या पाल्याच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरविले आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्याला आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्यावरील कर्ज तात्काळ माफ करण्यात यावे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलाच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च शासनाने उचलावा, अशी मागणी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना निरज बुटे, अजिंक्य मकेश्वर, शंतनु भोयर, अमर बेलगे, धीरज चव्हाण, दुष्यंत ठाकरे, अमेय देवगडकर, अमोल थोटे, निखील ठाकरे, लोकेश साहु, सुमेध हजबे, आशीष वासनिक, शुभम बानोडे, वैष्णवी डाफ, कृतिका भोयर, पलक रोहनकर, श्रद्धा बारोकर आदींची उपस्थिती होती.(शहर प्रतिनिधी)