शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

एकाच राष्ट्रीयकृत बँकेमुळे खातेदारांची गैरसोय

By admin | Updated: December 2, 2015 02:23 IST

येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेला गावातील खातेदारासह परिसरातील गावेही जोडण्यात आली आहे.

शाखा विस्ताराची मागणी : आर्थिक व्यवहारासाठी लागतात ग्राहकांच्या रांगावायगाव (नि.) : येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेला गावातील खातेदारासह परिसरातील गावेही जोडण्यात आली आहे. यामुळे खातेदारांच्या संख्येत वाढ झाली असल्याने आर्थिक व्यवहार करताना ही बाब अडचणीची ठरत आहे. येथील शाखेचा विस्तार करण्याची मागणी असून येथे अन्य राष्ट्रीयकृत बँकेची शाखा देण्याची मागणी होत आहे.वायगाव ही बाजारपेठ असल्याने परिसरातील १८ ते २० गावातील ग्रामस्थ येथे खरेदीकरिता येतात. शिवाय बँकेचे व्यवहार करण्याकरिता ग्रामस्थांना येथे यावे लागते. मात्र येथील शाखेचा विस्तार केला नसल्याने ग्रामस्थांही गैरसोय होत आहे. येथील शाखेतून परिसरातील २० गावांचे कामकाज होत आहे. गावात एकच बँक असल्याने ग्राहकांना १२ किमी अंतराचा पल्ला पूर्ण करुन व्यवहार पूर्ण करावे लागतात. यामुळे वयोवृद्ध खातेदारासह व्यावसायिक व शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. वायगाव येथेच अन्य राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.वर्धा तालुक्यातील वायगाव येथे शाळा, पोलीस चौकी, महसूल मंडळ, तलाठी, पशु वैद्यकीय रूग्णालय, खासगी दवाखाने, आठवडी बाजार अशा सुविधा असल्याने परिसरातील ग्रामस्थ येथेच येतात. येथे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वास्तव्य आहे. येथे राष्ट्रीयकृत बँक एकच असल्याने ग्राहकांची संख्या वाढली आहे. या एकमेव शाखेमुळे व्यापारी व नागरिकांना ताटकळत राहावे लागते. कधीकधी तर बँकेचे व्यवहार करण्यासाठी वर्धा येथे जावे लागते. परिसरातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी वायगाव येथे दुसरी राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करणे गरजेचे ठरत आहे. अन्यथा येथील राष्ट्रीयकृत बँक शाखेचा विस्तार करण्याची मागणी आहे. येथील कार्यालयासमोर आर्थिक व्यवहार करताना रांगा लागतात. यात लिंक फेल झाल्यास बराच वेळ ताटकळावे लागते. पैसे काढण्यासाठी संप्प्रण दिवस खर्ची घालावा लागतो. यामुळे ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. येथे शाखा देणे गरजेचे ठरत आहे.(वार्ताहर)