शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

एकाच राष्ट्रीयकृत बँकेमुळे खातेदारांची गैरसोय

By admin | Updated: December 2, 2015 02:23 IST

येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेला गावातील खातेदारासह परिसरातील गावेही जोडण्यात आली आहे.

शाखा विस्ताराची मागणी : आर्थिक व्यवहारासाठी लागतात ग्राहकांच्या रांगावायगाव (नि.) : येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेला गावातील खातेदारासह परिसरातील गावेही जोडण्यात आली आहे. यामुळे खातेदारांच्या संख्येत वाढ झाली असल्याने आर्थिक व्यवहार करताना ही बाब अडचणीची ठरत आहे. येथील शाखेचा विस्तार करण्याची मागणी असून येथे अन्य राष्ट्रीयकृत बँकेची शाखा देण्याची मागणी होत आहे.वायगाव ही बाजारपेठ असल्याने परिसरातील १८ ते २० गावातील ग्रामस्थ येथे खरेदीकरिता येतात. शिवाय बँकेचे व्यवहार करण्याकरिता ग्रामस्थांना येथे यावे लागते. मात्र येथील शाखेचा विस्तार केला नसल्याने ग्रामस्थांही गैरसोय होत आहे. येथील शाखेतून परिसरातील २० गावांचे कामकाज होत आहे. गावात एकच बँक असल्याने ग्राहकांना १२ किमी अंतराचा पल्ला पूर्ण करुन व्यवहार पूर्ण करावे लागतात. यामुळे वयोवृद्ध खातेदारासह व्यावसायिक व शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. वायगाव येथेच अन्य राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.वर्धा तालुक्यातील वायगाव येथे शाळा, पोलीस चौकी, महसूल मंडळ, तलाठी, पशु वैद्यकीय रूग्णालय, खासगी दवाखाने, आठवडी बाजार अशा सुविधा असल्याने परिसरातील ग्रामस्थ येथेच येतात. येथे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वास्तव्य आहे. येथे राष्ट्रीयकृत बँक एकच असल्याने ग्राहकांची संख्या वाढली आहे. या एकमेव शाखेमुळे व्यापारी व नागरिकांना ताटकळत राहावे लागते. कधीकधी तर बँकेचे व्यवहार करण्यासाठी वर्धा येथे जावे लागते. परिसरातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी वायगाव येथे दुसरी राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करणे गरजेचे ठरत आहे. अन्यथा येथील राष्ट्रीयकृत बँक शाखेचा विस्तार करण्याची मागणी आहे. येथील कार्यालयासमोर आर्थिक व्यवहार करताना रांगा लागतात. यात लिंक फेल झाल्यास बराच वेळ ताटकळावे लागते. पैसे काढण्यासाठी संप्प्रण दिवस खर्ची घालावा लागतो. यामुळे ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. येथे शाखा देणे गरजेचे ठरत आहे.(वार्ताहर)