शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

पालिकेत अपंगांचा सात तास ठिय्या

By admin | Updated: March 16, 2017 00:38 IST

अपंगांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी प्रहार अपंग बेरोजगार व कर्मचारी क्रांती संघटनेने वर्धा नगर पालिकेत ठिय्या आंदोलन केले.

तीन टक्के निधीसाठी आंदोलन : प्रहार अपंग क्रांती संघटनेचा एल्गार वर्धा : अपंगांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी प्रहार अपंग बेरोजगार व कर्मचारी क्रांती संघटनेने वर्धा नगर पालिकेत ठिय्या आंदोलन केले. यावेळी नोंदणीकृत १७२ दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्या पालिका प्रशासनाकडे रेटून धरण्यात आल्या. दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास न. प. मुख्याधिकाऱ्यांशी आंदोलकांच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली; पण तोडगा न निघाल्याने सायंकाळी ६ वाजेपर्यंत आंदोलन सुरूच होते. अखेर सायंकाळी ६ वाजता अपंगांचा राखीव तीन टक्के निधी १५ दिवसांत खात्यांत जमा केला जाईल. नोंदणी पूर्ण केली जाईल व गाळ्यांमध्ये अपंगांना तीन टक्के आरक्षण दिले जाईल, असे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. वर्धा नगर पालिका कार्यक्षेत्रात सुमारे १७२ दिव्यांग असल्याची नोंद आहे. ३ टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करणे क्रमप्राप्त असताना तो २०११ पासून खर्च करण्यात आला नाही. सदर ३ टक्के निधी त्वरित खर्च करावा. वर्धा न.प. हद्दीतील सर्व दिव्यांगांची नोंद घ्यावी. दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी २०० चौरस फुट जागा उपलब्ध करून द्यावी. दिव्यांगांना मालमत्ता करात सुट देण्यात यावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्या निकाली निघाव्या म्हणून पालिका प्रशासनाला वेळोवेळी निवेदने देण्यात आली; पण पालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. आंदोलनादरम्यान शिष्टमंडळासोबत न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी चर्चा केली; पण कुठलीही ठोस भूमिका न घेतल्याने सकाळी ११ वाजता सुरू झालेले आंदोलन सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू होते. यात प्रहार अपंग बेरोजगार व कर्मचारी क्रांती संघटनेचे विदर्भ प्रमुख हनुमंत झोटींग, प्रमोद कुराटकर, विकास दांडगे, नितेश चातुरकर, स्रेहल खोडे, विठ्ठल नेहारे, लता मिठे यासह महिला-पुरुष दिव्यांग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.(शहर प्रतिनिधी) जि.प.मध्ये लेखा कर्मचाऱ्यांचे कामबंद राज्यातील जि.प. मधील लेखा संवर्गातील कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप करीत प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेतील लेखा कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून काळी फित लावून निषेध आंदोलन केले; पण तोडगा न निघाल्याने बुधवारपासून लेखणीबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. २७ वर्षांपासून न्याय मागण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्याचा निकाल संघटनेच्या बाजूने लागला. यानंतर शासकीय स्तरावर मागण्या निकाली निघाव्या म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदने दिली; पण दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे. लेखा कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे मार्च महिन्यातील जिल्हा परिषदेचे वित्तीय व्यवहार ठप्प झाले आहेत. संपूर्ण राज्यात आंदोलन असल्याने सर्वच जि.प. चे कामकाज ठप्प झाले आहे.