शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेत अपंगांचा सात तास ठिय्या

By admin | Updated: March 16, 2017 00:38 IST

अपंगांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी प्रहार अपंग बेरोजगार व कर्मचारी क्रांती संघटनेने वर्धा नगर पालिकेत ठिय्या आंदोलन केले.

तीन टक्के निधीसाठी आंदोलन : प्रहार अपंग क्रांती संघटनेचा एल्गार वर्धा : अपंगांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी प्रहार अपंग बेरोजगार व कर्मचारी क्रांती संघटनेने वर्धा नगर पालिकेत ठिय्या आंदोलन केले. यावेळी नोंदणीकृत १७२ दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्या पालिका प्रशासनाकडे रेटून धरण्यात आल्या. दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास न. प. मुख्याधिकाऱ्यांशी आंदोलकांच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली; पण तोडगा न निघाल्याने सायंकाळी ६ वाजेपर्यंत आंदोलन सुरूच होते. अखेर सायंकाळी ६ वाजता अपंगांचा राखीव तीन टक्के निधी १५ दिवसांत खात्यांत जमा केला जाईल. नोंदणी पूर्ण केली जाईल व गाळ्यांमध्ये अपंगांना तीन टक्के आरक्षण दिले जाईल, असे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. वर्धा नगर पालिका कार्यक्षेत्रात सुमारे १७२ दिव्यांग असल्याची नोंद आहे. ३ टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करणे क्रमप्राप्त असताना तो २०११ पासून खर्च करण्यात आला नाही. सदर ३ टक्के निधी त्वरित खर्च करावा. वर्धा न.प. हद्दीतील सर्व दिव्यांगांची नोंद घ्यावी. दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी २०० चौरस फुट जागा उपलब्ध करून द्यावी. दिव्यांगांना मालमत्ता करात सुट देण्यात यावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्या निकाली निघाव्या म्हणून पालिका प्रशासनाला वेळोवेळी निवेदने देण्यात आली; पण पालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. आंदोलनादरम्यान शिष्टमंडळासोबत न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी चर्चा केली; पण कुठलीही ठोस भूमिका न घेतल्याने सकाळी ११ वाजता सुरू झालेले आंदोलन सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू होते. यात प्रहार अपंग बेरोजगार व कर्मचारी क्रांती संघटनेचे विदर्भ प्रमुख हनुमंत झोटींग, प्रमोद कुराटकर, विकास दांडगे, नितेश चातुरकर, स्रेहल खोडे, विठ्ठल नेहारे, लता मिठे यासह महिला-पुरुष दिव्यांग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.(शहर प्रतिनिधी) जि.प.मध्ये लेखा कर्मचाऱ्यांचे कामबंद राज्यातील जि.प. मधील लेखा संवर्गातील कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप करीत प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेतील लेखा कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून काळी फित लावून निषेध आंदोलन केले; पण तोडगा न निघाल्याने बुधवारपासून लेखणीबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. २७ वर्षांपासून न्याय मागण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्याचा निकाल संघटनेच्या बाजूने लागला. यानंतर शासकीय स्तरावर मागण्या निकाली निघाव्या म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदने दिली; पण दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे. लेखा कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे मार्च महिन्यातील जिल्हा परिषदेचे वित्तीय व्यवहार ठप्प झाले आहेत. संपूर्ण राज्यात आंदोलन असल्याने सर्वच जि.प. चे कामकाज ठप्प झाले आहे.