शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

पालिकेत अपंगांचा सात तास ठिय्या

By admin | Updated: March 16, 2017 00:38 IST

अपंगांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी प्रहार अपंग बेरोजगार व कर्मचारी क्रांती संघटनेने वर्धा नगर पालिकेत ठिय्या आंदोलन केले.

तीन टक्के निधीसाठी आंदोलन : प्रहार अपंग क्रांती संघटनेचा एल्गार वर्धा : अपंगांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी प्रहार अपंग बेरोजगार व कर्मचारी क्रांती संघटनेने वर्धा नगर पालिकेत ठिय्या आंदोलन केले. यावेळी नोंदणीकृत १७२ दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्या पालिका प्रशासनाकडे रेटून धरण्यात आल्या. दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास न. प. मुख्याधिकाऱ्यांशी आंदोलकांच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली; पण तोडगा न निघाल्याने सायंकाळी ६ वाजेपर्यंत आंदोलन सुरूच होते. अखेर सायंकाळी ६ वाजता अपंगांचा राखीव तीन टक्के निधी १५ दिवसांत खात्यांत जमा केला जाईल. नोंदणी पूर्ण केली जाईल व गाळ्यांमध्ये अपंगांना तीन टक्के आरक्षण दिले जाईल, असे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. वर्धा नगर पालिका कार्यक्षेत्रात सुमारे १७२ दिव्यांग असल्याची नोंद आहे. ३ टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करणे क्रमप्राप्त असताना तो २०११ पासून खर्च करण्यात आला नाही. सदर ३ टक्के निधी त्वरित खर्च करावा. वर्धा न.प. हद्दीतील सर्व दिव्यांगांची नोंद घ्यावी. दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी २०० चौरस फुट जागा उपलब्ध करून द्यावी. दिव्यांगांना मालमत्ता करात सुट देण्यात यावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्या निकाली निघाव्या म्हणून पालिका प्रशासनाला वेळोवेळी निवेदने देण्यात आली; पण पालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. आंदोलनादरम्यान शिष्टमंडळासोबत न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी चर्चा केली; पण कुठलीही ठोस भूमिका न घेतल्याने सकाळी ११ वाजता सुरू झालेले आंदोलन सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू होते. यात प्रहार अपंग बेरोजगार व कर्मचारी क्रांती संघटनेचे विदर्भ प्रमुख हनुमंत झोटींग, प्रमोद कुराटकर, विकास दांडगे, नितेश चातुरकर, स्रेहल खोडे, विठ्ठल नेहारे, लता मिठे यासह महिला-पुरुष दिव्यांग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.(शहर प्रतिनिधी) जि.प.मध्ये लेखा कर्मचाऱ्यांचे कामबंद राज्यातील जि.प. मधील लेखा संवर्गातील कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप करीत प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेतील लेखा कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून काळी फित लावून निषेध आंदोलन केले; पण तोडगा न निघाल्याने बुधवारपासून लेखणीबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. २७ वर्षांपासून न्याय मागण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्याचा निकाल संघटनेच्या बाजूने लागला. यानंतर शासकीय स्तरावर मागण्या निकाली निघाव्या म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदने दिली; पण दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे. लेखा कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे मार्च महिन्यातील जिल्हा परिषदेचे वित्तीय व्यवहार ठप्प झाले आहेत. संपूर्ण राज्यात आंदोलन असल्याने सर्वच जि.प. चे कामकाज ठप्प झाले आहे.