शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

वर्धा कृउबाच्या संचालकांनी केला राज्यातील सात बाजार समित्यांचा दौरा

By admin | Updated: January 12, 2017 00:37 IST

स्थानिक कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी राज्यातील सात कृषि उत्पन्न बाजार समितींना नुकतीच भेट देऊन

नवीन भाजीबाजारामुळे शेतकऱ्यांना मिळणार प्राथमिक सुविधा वर्धा : स्थानिक कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी राज्यातील सात कृषि उत्पन्न बाजार समितींना नुकतीच भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती जाणून घेतली. सातही कृषि उत्पन्न बाजार समितींमधील सकारात्मक बदल व शेतकरी हितार्थ घेण्यात आलेले निर्णय यावेळी संचालकांनी जाणून घेतले. वर्धेत अत्याधूनिक असा वर्धेत नवीन भाजीबाजार तयार करण्यात येणार आहे. भेट देण्यात आलेल्या कृउबांनी शेतकऱ्यांना दिलेल्या सुविधेचे येथे अनुकरण करण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नवीन भाजीबाजारामुळे चांगल्या प्रतीच्या प्राथमिक सुविधा लवकरच मिळणार आहे. वर्धा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी नगर, बारामती, जळोची (उपबाजार), इंदापूर, फलटन, राजगुरुनगर (खेड), चाकण (उपबाजार) या ठिकाणी भेट देऊन येथील कामकाजाची माहिती जाणून घेतली. संचालकांनी अत्याधुनिक पद्धतीने बांधलेल्या भाजीबाजार, धान्य बाजार, गुरांचा बाजार, शितगृहे, प्रक्रिया केंद्रे आदींचीही माहिती जाणून घेतली. यावेळी संचालकांनी त्या-त्या कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती व संचालकांशी विविध विषयावर चर्चा केली. याप्रसंगी अडत खरेदीदाराकडे गेल्यावर बाजार समितीच्या व्यवहारावर काय परिणाम झाला तसेच भाजीबाजार नियमन मुक्तीबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. सदर उपक्रमात वर्धा कृउबाचे सभापती श्याम कार्लेकर, संचालक विजय बंडेवार, अरविंद भुसारी, प्रकाश पाटील, दत्ता महाजन, शरद झोड, मुकेश अळसपुरे, भुषण झाडे, दिनेश गायकवाड, गंगाधर डाखोळे, सुरेशसिंग मेहेर, शामल मरोठी, सचिव समीर पेंडके आदींचा सहभाग होता.(प्रतिनिधी) दोन कृउबाचे अवलोकन करून तयार होईल नवीन भाजीबाजार नुकतीच राज्यातील सात कृउबांना वर्धा कृउबाच्या संचालकांनी भेट दिली. सातही कृउबांमधील सुविधांचा तुलनात्मक विचार केला असता बारामती कृउबाला संचालकांनी प्रथम पसंती दर्शविली. तर द्वितीय पसंती नगर कृउबाला संचालकांनी दिली. दोन्ही कृउबाचे अवलोकन करून वर्धेतील नवीन भाजी बाजार तयार करण्यात येणार आहे. सदर अत्याधुनिक पद्धतीच्या भाजीबाजारामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे वर्धा कृउबाचे सभापती श्याम कार्लेकर यांनी कळविले आहे.