शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

देशाची वाटचाल महासत्ता बनण्याच्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:11 IST

गत तीन वर्षांत देशभरातील पाच कोटी लाभार्थ्यांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गॅस सिलिंडर वितरित करण्यात आले आहे. यंदा नव्याने तीन कोटी लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

ठळक मुद्देरामदास तडस : उज्ज्वला दिवसानिमित्त गरजुंना गॅस सिलिंडरचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : गत तीन वर्षांत देशभरातील पाच कोटी लाभार्थ्यांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गॅस सिलिंडर वितरित करण्यात आले आहे. यंदा नव्याने तीन कोटी लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. समाजातील दुर्बल घटकाला सन्मानाने जगता यावे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विविध उपक्रम राबवित आहेत. सध्या देशाची वाटचाल महासत्ता बनण्याच्या दिशेने सुरू आहे, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.उज्वला दिवसानिमित्त आयोजित गॅस सिलिंडर वितरण समारंभात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर इंडियन गॅस एजन्सीचे डीजीएम ए.पी. संकलेचा, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, पं. स. उपसभापती किशोर गव्हाळकर, न. प. उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, नगरसेवक नंदू वैद्य, एजन्सीचे संचालक रमेश जुगनाके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.स्थानिक आर. गॅस इंडियनच्यावतीनेआयोजित कार्यक्रमात खा. तडस पुढे म्हणाले, उज्ज्वला गॅस सोबतच प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून समाजातील बेघरांना न्याय दिला जात आहे. या योजनेतून देवळीत ८५० लाभार्थ्यांची घरे मंजूर करण्यात आली आहे. ज्यांच्याकडे जागा उपलब्ध नाही अशांना जागा विकत घेण्यासाठी ५० हजार रूपये किंवा अशांची निवासी कॉलनी उभारून घरे बांधून दिली जाणार आहे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.भाजपाचे जिल्हाध्यक्ष बकाने म्हणाले की, सरकारच्या ग्राम स्वराज्य योजनेंतर्गत येत्या पंधरा दिवसात आठ कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. उज्ज्वला दिवस हा त्याच कार्यक्रमाचा एक भाग आहे, असे सांगितले. या योजनेंतर्गत मिळणारी गॅस कर्ज स्वरूपात असून या पैशाचा भरणा लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सबसीडीतून कपात केला जाणार आहे. सहा कनेक्शन नंतर सातव्या कनेक्शनपासून पैशाची कपात केली जाणार असल्याचेही यावेळी बकाने यांनी स्पष्ट केले. ही योजना जागतिक स्तरावर क्रांतीकारक ठरली असल्याचे सकलेचा यांनी सांगितले.येथील आर गॅस एजन्सीच्यावतीने यापूर्वी ५२७ व कार्यक्रमाचे दिवशी १० लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरचे वितरण करण्यात आले. यामध्ये पळसगाव येथील चिंधा उईके, वेणू साखरकर, अंजना फुपटे, बाभुळगावकर (खोसे) येथील सुनंदा बोबडे व संगीता बोबडे, देवळी येथील मैना पचारे व सुवर्णा जयपूरकर तसेच दुर्गा राऊत (रत्नापूर) व वच्छला शिंदे (आपटी) व बेबी आत्राम (फत्तेपूर) याचा समावेश आहे. कार्यक्रमाचे संचालन भाजपाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राहुल चोपडा यांनी केले.