शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

दिंदोडा प्रकल्पग्रस्तांचे धरणे आंदोलन

By admin | Updated: April 24, 2017 00:22 IST

दिंदोडा प्रकल्पाकरिता संपादित केलेली जमीन परत करण्याच्या मागणीसाठी दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्यावतीने प्रकल्पस्थळी धरणे आंदोलन करण्यात आले.

जमिनी परत करण्याची मागणी : जिल्हा प्रशासनाला निवेदनातून साकडेवर्धा : दिंदोडा प्रकल्पाकरिता संपादित केलेली जमीन परत करण्याच्या मागणीसाठी दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्यावतीने प्रकल्पस्थळी धरणे आंदोलन करण्यात आले. यात प्रकल्पग्रस्तांनी मोठा सहभाग नोंदवित मागण्या मान्य केल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे जाहीर केले. यावेळी जिल्हा प्रशासनाला निवेदनही देण्यात आले.वारंवार आंदोलन करूनही दखल घेतली जात नसल्याने आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार यावेळी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने केला. प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष पुंडलिक तिजारे, उपाध्यक्ष अभिजीत मांडेकर, सचिव चंपतराव साळवे, कोषाध्यक्ष पी.जी. भिडकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. अनेक वर्षे उलटली तरीही दिंदोडा बॅरेज प्रकल्पाला शासकीय मान्यता मिळत नाही. शिवाय प्रकल्पाच्या उभारणीकरिता निधीचीही तरतूद केली जात नाही. अलीकडेच राज्य शासनाने २१ प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता दिली; पण त्यात दिंदोडा बॅरेज प्रकल्पाचा समावेश नाही. वर्धा, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सुपिक जमीन या प्रकल्पासाठी अनेक वर्षांपूर्वी शासनाने अल्प मोबदला देत संपादित केली; पण त्यानंतर शासनाने मान्य केल्याप्रमाणे अद्याप प्रती एकर एक लाख रुपये अनुदान दिले नाही. प्रकल्पग्रस्त कुटुंबातील बेरोजगाराला नोकरी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. सर्व बाजूने प्रकल्पग्रस्तांची शासनाने कोंडी केली आहे. यामुळेच आमची संपादित केलेली २ हजार ८०६ हेक्टर ७८ आर शेतजमीन आम्हाला परत द्यावी, अशी मागणी दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने केली आहे. आमचे म्हणणे शासन समजून घ्यायला तयार नसेल व मान्य केल्याप्रमाणे अनुदानस्वरुप मोबदला देत नसेल तर आमची जमीन परत मागण्याशिवाय पर्यायच नसल्याचेही शेतकऱ्यांनी स्पष्ट केले. संपादित जमिनीचा जेमतेमच मोबदला सन २००० मध्ये शेतकऱ्यांना देण्यात आला होता. शेतकऱ्यांनी मोबदला कमी मिळाल्याचा आक्षेप घेतला असता प्रती एकर एक लाख रुपये अनुदान देण्याचे मान्य करण्यात आले होते; पण शासनाने एक रुपयाही न दिल्याने शेतकऱ्यांत असंतोष पसरला आहे. शासनाने प्रती एकर एक लाख रुपये व १७ वर्षांचे व्याज द्यावे वा जमिनी परत करीत शासनाच्या मालकीची नोंद काढावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)सुपीक जमिनी पडिक २०१५ व १६ मध्ये शासनाने संपादित जमिनीवर आपला ताबा दाखविण्याकरिता सातबारावर नोंद करून घेतली. प्रकल्प होत नाही, अनुदान दिले जात नाही व जमिनीही परत केल्या जात नसल्याने सुपीक जमिनी पडिक आहेत. यामुळे जमिनी परत कराव्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कायदाही बासनात२०१४ च्या शासकीय परिपत्रकात सलग पाच वर्षांच्या कालवधीत संपादित जमिनीवर प्रकल्प न उभारल्यास ती जमीन संबंधित शेतकऱ्याला परत करण्यात यावी, असे स्पष्ट नमूद केले आहे. असे असताना शासनाचाच कायदा शासकीय अधिकाऱ्यांनी बासनात गुंडाळून ठेवल्याचे प्रकल्पग्रस्तांनी निवेदनात नमूद केले आहे.