शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

दिघेंच्या राजीनाम्याचे कनेक्शन जि.प.तील भ्रष्टाचाराशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 21:34 IST

भारतीय जनता पक्षाच्या सुरूवातीच्या काळातील निष्ठावंत शिलेदार अशी ज्यांची ओळख आहे, त्या किशोर दिघे यांनी पक्षाच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे. दिघे यांच्या या राजीनाम्याचे कनेक्शन भारतीय पक्षाची सत्ता असलेल्या वर्धा जिल्हा परिषदेच्या गैरकारभाराशी असल्याचे जवळपास उघड झाले आहे.

ठळक मुद्देहिंगणघाट क्षेत्रावर प्रभाव पडण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भारतीय जनता पक्षाच्या सुरूवातीच्या काळातील निष्ठावंत शिलेदार अशी ज्यांची ओळख आहे, त्या किशोर दिघे यांनी पक्षाच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे. दिघे यांच्या या राजीनाम्याचे कनेक्शन भारतीय पक्षाची सत्ता असलेल्या वर्धा जिल्हा परिषदेच्या गैरकारभाराशी असल्याचे जवळपास उघड झाले आहे.भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष दिवंगत भगवानजी आंबटकर यांनी किशोर दिघे यांना राजकारणात आणले होते. मागील २८ ते ३० वर्षांपासून दिघे हे भारतीय जनता पक्षात सक्रिय आहेत. एवढेच नव्हे, तर हिंगणघाट मतदारसंघाचा ते एक मोठा आधार राहिले आहेत. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी या भागात भारतीय जनता पक्ष वाढविण्याचा मोठा प्रयत्न केला. दिघे गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. जिल्हा परिषदेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून ‘विपुल’ प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा थेट आरोपच दिघे यांनी केला होता. या दृष्टिकोनातून त्यांनी पक्षाच्या व्यासपीठावर अनेकवेळा पुराव्यासह आपली बाजू मांडली. पक्षाचे नाव खराब करणाºया लोकांचे काही तरी करा, अशी त्यांची भूमिका होती. मात्र, याबाबत पक्षाच्या स्तरावरून प्रचंड उदासीनता बाळगण्यात आल्याने अखेर नाराजी असलेल्या दिघे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. उल्लेखनीय बाब म्हणजे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील असल्याने दिघे यांची मोठी अडचण झाली होती. सर्वसामान्य लोक जिल्हा परिषदेच्या भ्रष्टाचाराकडे बोट दाखवित होते. त्यामुळे अखेरीस पक्षाच्या पदाचा त्याग करण्याची भूमिका घेतली, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. यासंदर्भात आॅडिओ क्लिपही काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. त्यातील संभाषण हे दिघेंचे असल्याची या भागात चर्चा आहे. दिघे यांनी आपल्या राजीनामा जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे यांच्याकडे पाठविला आहे. यासोबतच पक्षाचे संघटन मंत्री विदर्भ डॉ. उपेंद्र कोठेकर, प्रदेश सरचिटणीस आमदार डॉ. रामदास आंबटकर यांच्याकडेही पाठविला आहे. पक्ष या प्रकरणात काय भूमिका घेतो, याकडे नागरिकांचे लक्ष आहे.