शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

गतिरोधकच ठरतेय डोकेदुखी

By admin | Updated: May 6, 2016 01:59 IST

शहरात काही दिवसांपासून नागरिकांनी स्वत:च्या मर्जीप्रमाणे आवश्यकता नसताना ठिकठिकाणी उंच गतिरोधक निर्माण केले आहेत.

अपघातास कारणीभूत : उंच गतिरोधक काढून टाकण्याची मागणीवर्धा : शहरात काही दिवसांपासून नागरिकांनी स्वत:च्या मर्जीप्रमाणे आवश्यकता नसताना ठिकठिकाणी उंच गतिरोधक निर्माण केले आहेत. सदर गतिरोधक सिमेंट काँक्रीटचे असल्याने वाहन चालकांना अधिकच त्रास सहन करावा लागतो. कुठल्याही मापदंडात न बसणारे हे गतिरोधक अनेक आजारांचे कारण ठरत आहे. बांधकाम विभाग व पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देत सदर गतिरोधक काढावे, अशी मागणी बापू युवा संघटनचे सुरेश पट्टेवार यांनी केली आहे. याबाबत न.प. मुख्याधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.शहरातील प्रत्येक मार्गावर नागरिकांनी कुणालाही न विचारता उंच गतिरोधकांची निर्मिती केली आहे. सिमेंट काँक्रीटपासून बनविलेले हे गतिरोधक शासनाच्या कुठल्याही मापदंडात बसत नाही. परिणामी, नागरिकांना शहरातील प्रत्येक रस्त्याने जाताना गतिरोधकांचा सामना करावा लागतो. गतिरोधक डांबराचे नसून सिमेंट काँक्रीटचे केल्याने त्याची उंचीही कमी होत नाही. वाजवीपेक्षा अधिक उंच गतिरोधक निर्माण केल्याने वृद्ध व महिलांना वाहने चालविणे कठीण झाले आहे. काही रस्त्यांवर तर असंख्य गतिरोधक निर्माण करण्यात आले आहेत. परिणामी, बहुतांश नागरिक तो रस्ताच नको, असे म्हणत दुसऱ्या रस्त्याचा अवलंब करीत असल्याचे दिसते. हा प्रकार विशेषत: अष्टभूजा चौकातून रामनगरकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत घडतो. उंच गतिरोधक व त्यावर पांढरे, पिवळे पट्टे नसल्याने ते दिसत नाही. परिणामी, नागरिकांना अपघातांना सामोरे जावे लागते. वंजारी चौक ते लेप्रेसी फाऊंडेशनपर्र्यंत तब्बल १६ गतिरोधक तयार करण्यात आले आहेत. ते फार जवळ जवळ असल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो. वास्तविक, इतक्या जवळ गतिरोधकाची गरज नाही. शहरातील बहुतांश वॉर्डात घरांचे बांधकाम सुरू असते. कुणाचीही पर्वा न करता घरासमोरून वाहने जातात म्हणून परवानगी न घेता स्वत:च्या घरासमोर गतिरोधक तयार केले जातात. हाच प्रकार या भागात घडल्याचे दिसते. पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देत गतिरोधक काढण्याची मागणी त्यांनी केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)