शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

गतिरोधकच ठरतेय डोकेदुखी

By admin | Updated: May 6, 2016 01:59 IST

शहरात काही दिवसांपासून नागरिकांनी स्वत:च्या मर्जीप्रमाणे आवश्यकता नसताना ठिकठिकाणी उंच गतिरोधक निर्माण केले आहेत.

अपघातास कारणीभूत : उंच गतिरोधक काढून टाकण्याची मागणीवर्धा : शहरात काही दिवसांपासून नागरिकांनी स्वत:च्या मर्जीप्रमाणे आवश्यकता नसताना ठिकठिकाणी उंच गतिरोधक निर्माण केले आहेत. सदर गतिरोधक सिमेंट काँक्रीटचे असल्याने वाहन चालकांना अधिकच त्रास सहन करावा लागतो. कुठल्याही मापदंडात न बसणारे हे गतिरोधक अनेक आजारांचे कारण ठरत आहे. बांधकाम विभाग व पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देत सदर गतिरोधक काढावे, अशी मागणी बापू युवा संघटनचे सुरेश पट्टेवार यांनी केली आहे. याबाबत न.प. मुख्याधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.शहरातील प्रत्येक मार्गावर नागरिकांनी कुणालाही न विचारता उंच गतिरोधकांची निर्मिती केली आहे. सिमेंट काँक्रीटपासून बनविलेले हे गतिरोधक शासनाच्या कुठल्याही मापदंडात बसत नाही. परिणामी, नागरिकांना शहरातील प्रत्येक रस्त्याने जाताना गतिरोधकांचा सामना करावा लागतो. गतिरोधक डांबराचे नसून सिमेंट काँक्रीटचे केल्याने त्याची उंचीही कमी होत नाही. वाजवीपेक्षा अधिक उंच गतिरोधक निर्माण केल्याने वृद्ध व महिलांना वाहने चालविणे कठीण झाले आहे. काही रस्त्यांवर तर असंख्य गतिरोधक निर्माण करण्यात आले आहेत. परिणामी, बहुतांश नागरिक तो रस्ताच नको, असे म्हणत दुसऱ्या रस्त्याचा अवलंब करीत असल्याचे दिसते. हा प्रकार विशेषत: अष्टभूजा चौकातून रामनगरकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत घडतो. उंच गतिरोधक व त्यावर पांढरे, पिवळे पट्टे नसल्याने ते दिसत नाही. परिणामी, नागरिकांना अपघातांना सामोरे जावे लागते. वंजारी चौक ते लेप्रेसी फाऊंडेशनपर्र्यंत तब्बल १६ गतिरोधक तयार करण्यात आले आहेत. ते फार जवळ जवळ असल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो. वास्तविक, इतक्या जवळ गतिरोधकाची गरज नाही. शहरातील बहुतांश वॉर्डात घरांचे बांधकाम सुरू असते. कुणाचीही पर्वा न करता घरासमोरून वाहने जातात म्हणून परवानगी न घेता स्वत:च्या घरासमोर गतिरोधक तयार केले जातात. हाच प्रकार या भागात घडल्याचे दिसते. पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देत गतिरोधक काढण्याची मागणी त्यांनी केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)