शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दैनंदिन व्यवहारात एटीएममुळे अडचणी

By admin | Updated: April 25, 2017 01:00 IST

नोटबंदीनंतर मोठा कालावधी लोटला असताना दैनंदिन व्यवहार सुरळीत झालेले नाहीत.

नागरिकांची भटकंती : ‘नो कॅश’ आणि ‘एटीएम बंद’च्या फलकांमुळे गोचीवर्धा : नोटबंदीनंतर मोठा कालावधी लोटला असताना दैनंदिन व्यवहार सुरळीत झालेले नाहीत. सर्वत्र ‘डिजिटल पेमेंट’वर भर दिला जात असला तरी शहरातील बहुतांश व्यवहार ‘कॅश’नेच करावे लागतात. यात नो कॅश व एटीएम बंद आहे, या फलकांनी नागरिकांची चांगलीच बोळवण केली आहे. परिणामी, दैनंदिन व्यवहारच अडचणीत आले आहेत.शहरातील बहुतांश एटीएम बंद असल्याने नागरिकांची रकमेकरिता भटंकती होत आहे. मागील दहा दिवसांपासून सर्वच राष्ट्रीयकृत बँकांची एटीएम सेवा बंद पडल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रोख रकमेकरिता भर उन्हात या एटीएमवरून त्या एटीएमवर भटकावे लागत असून निराश होऊनच परतावे लागत आहे. महाराष्ट्र बँकेचे बॅचलर रोडवरील एटीएम अनेक दिवसांपासून बंद आहे. नो कॅशचा फलक गळ्यात अडकलेला दिसतो. याबाबत नागरिकांनी व्यवस्थापनाला सूचित केले; पण दुर्लक्ष केले जात आहे. चलन तुटवडा असल्याचे कारण पुढे केले जात आहे. चलन तुटवडा आहे तर खासगी बँकांचे एटीएम कसे सुरू आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बँकेतील काउंटरवर गर्दी होऊ नये म्हणून ग्राहकांच्या सेवेकरिता एटीएम सेवा सुरू करण्यात आली; पण एटीएम सदैव बंदच असतात. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)बॅँकेतील नोटांच्या तुटवड्यामुळे ग्रामीण भागातील व्यवसाय ठप्परोहणा - नोटाबंदीच्या निर्णयापासून ग्रामीण भागातील बँकांना मागणीच्या प्रमाणात पतपुरवठा होत नाही. परिणामी, खातेधारकांना आवश्यक रक्कम देत नसल्याने ग्रामीण भागातील लहान-मोठ्या व्यवसायांवर विपरीत परिणाम होत आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकामधील रकमांची स्थिती अद्याप पूर्वस्थितीत आली नाही. शासन कितीही घोषणा करीत असले तरी ग्रामीण भागातील बँकांतून ग्राहकांना आपल्या खात्यातून आवश्यक तेवढी रक्कम मिळत नाही. यामुळे नागरिकांना आवश्यक वस्तुंची खरेदी करता येत नाही. दहा हजारांचे काम दोन हजारांत भागवावे लागत आहे. परिणामी, बाजारातील खरेदीवर विपरत परिणाम झाला असून ग्रामीण भागातील व्यावसायिक हातावर हात धरुन बसून आहेत. याउलट शेतकरी आपला शेतमाल शहराच्या बाजारपेठेत आणून विकतो. यामुळे आलेल्या रकमेतून शहरातूनच आवश्यक वस्तुंची खरेदी करतो. परिणामी, शहरी व्यावसायिकांना ग्राहक मिळतात तर ग्रामीण भागातील लहान-मोठ्या दुकानदारांची दररोजची आवक मंदावली आहे. यासाठी बँकेतून मिळणाऱ्या रकमेत सुधारणा होणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)