शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

दैनंदिन व्यवहारात एटीएममुळे अडचणी

By admin | Updated: April 25, 2017 01:00 IST

नोटबंदीनंतर मोठा कालावधी लोटला असताना दैनंदिन व्यवहार सुरळीत झालेले नाहीत.

नागरिकांची भटकंती : ‘नो कॅश’ आणि ‘एटीएम बंद’च्या फलकांमुळे गोचीवर्धा : नोटबंदीनंतर मोठा कालावधी लोटला असताना दैनंदिन व्यवहार सुरळीत झालेले नाहीत. सर्वत्र ‘डिजिटल पेमेंट’वर भर दिला जात असला तरी शहरातील बहुतांश व्यवहार ‘कॅश’नेच करावे लागतात. यात नो कॅश व एटीएम बंद आहे, या फलकांनी नागरिकांची चांगलीच बोळवण केली आहे. परिणामी, दैनंदिन व्यवहारच अडचणीत आले आहेत.शहरातील बहुतांश एटीएम बंद असल्याने नागरिकांची रकमेकरिता भटंकती होत आहे. मागील दहा दिवसांपासून सर्वच राष्ट्रीयकृत बँकांची एटीएम सेवा बंद पडल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रोख रकमेकरिता भर उन्हात या एटीएमवरून त्या एटीएमवर भटकावे लागत असून निराश होऊनच परतावे लागत आहे. महाराष्ट्र बँकेचे बॅचलर रोडवरील एटीएम अनेक दिवसांपासून बंद आहे. नो कॅशचा फलक गळ्यात अडकलेला दिसतो. याबाबत नागरिकांनी व्यवस्थापनाला सूचित केले; पण दुर्लक्ष केले जात आहे. चलन तुटवडा असल्याचे कारण पुढे केले जात आहे. चलन तुटवडा आहे तर खासगी बँकांचे एटीएम कसे सुरू आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बँकेतील काउंटरवर गर्दी होऊ नये म्हणून ग्राहकांच्या सेवेकरिता एटीएम सेवा सुरू करण्यात आली; पण एटीएम सदैव बंदच असतात. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)बॅँकेतील नोटांच्या तुटवड्यामुळे ग्रामीण भागातील व्यवसाय ठप्परोहणा - नोटाबंदीच्या निर्णयापासून ग्रामीण भागातील बँकांना मागणीच्या प्रमाणात पतपुरवठा होत नाही. परिणामी, खातेधारकांना आवश्यक रक्कम देत नसल्याने ग्रामीण भागातील लहान-मोठ्या व्यवसायांवर विपरीत परिणाम होत आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकामधील रकमांची स्थिती अद्याप पूर्वस्थितीत आली नाही. शासन कितीही घोषणा करीत असले तरी ग्रामीण भागातील बँकांतून ग्राहकांना आपल्या खात्यातून आवश्यक तेवढी रक्कम मिळत नाही. यामुळे नागरिकांना आवश्यक वस्तुंची खरेदी करता येत नाही. दहा हजारांचे काम दोन हजारांत भागवावे लागत आहे. परिणामी, बाजारातील खरेदीवर विपरत परिणाम झाला असून ग्रामीण भागातील व्यावसायिक हातावर हात धरुन बसून आहेत. याउलट शेतकरी आपला शेतमाल शहराच्या बाजारपेठेत आणून विकतो. यामुळे आलेल्या रकमेतून शहरातूनच आवश्यक वस्तुंची खरेदी करतो. परिणामी, शहरी व्यावसायिकांना ग्राहक मिळतात तर ग्रामीण भागातील लहान-मोठ्या दुकानदारांची दररोजची आवक मंदावली आहे. यासाठी बँकेतून मिळणाऱ्या रकमेत सुधारणा होणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)