शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
3
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
4
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
5
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
6
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
7
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
8
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
9
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
10
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
11
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
12
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
13
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
14
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
15
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
16
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
17
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
18
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार
19
स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा आणि द्या देशभक्तीच्या शुभेच्छा!
20
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...

दैनंदिन व्यवहारात एटीएममुळे अडचणी

By admin | Updated: April 25, 2017 01:00 IST

नोटबंदीनंतर मोठा कालावधी लोटला असताना दैनंदिन व्यवहार सुरळीत झालेले नाहीत.

नागरिकांची भटकंती : ‘नो कॅश’ आणि ‘एटीएम बंद’च्या फलकांमुळे गोचीवर्धा : नोटबंदीनंतर मोठा कालावधी लोटला असताना दैनंदिन व्यवहार सुरळीत झालेले नाहीत. सर्वत्र ‘डिजिटल पेमेंट’वर भर दिला जात असला तरी शहरातील बहुतांश व्यवहार ‘कॅश’नेच करावे लागतात. यात नो कॅश व एटीएम बंद आहे, या फलकांनी नागरिकांची चांगलीच बोळवण केली आहे. परिणामी, दैनंदिन व्यवहारच अडचणीत आले आहेत.शहरातील बहुतांश एटीएम बंद असल्याने नागरिकांची रकमेकरिता भटंकती होत आहे. मागील दहा दिवसांपासून सर्वच राष्ट्रीयकृत बँकांची एटीएम सेवा बंद पडल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रोख रकमेकरिता भर उन्हात या एटीएमवरून त्या एटीएमवर भटकावे लागत असून निराश होऊनच परतावे लागत आहे. महाराष्ट्र बँकेचे बॅचलर रोडवरील एटीएम अनेक दिवसांपासून बंद आहे. नो कॅशचा फलक गळ्यात अडकलेला दिसतो. याबाबत नागरिकांनी व्यवस्थापनाला सूचित केले; पण दुर्लक्ष केले जात आहे. चलन तुटवडा असल्याचे कारण पुढे केले जात आहे. चलन तुटवडा आहे तर खासगी बँकांचे एटीएम कसे सुरू आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बँकेतील काउंटरवर गर्दी होऊ नये म्हणून ग्राहकांच्या सेवेकरिता एटीएम सेवा सुरू करण्यात आली; पण एटीएम सदैव बंदच असतात. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)बॅँकेतील नोटांच्या तुटवड्यामुळे ग्रामीण भागातील व्यवसाय ठप्परोहणा - नोटाबंदीच्या निर्णयापासून ग्रामीण भागातील बँकांना मागणीच्या प्रमाणात पतपुरवठा होत नाही. परिणामी, खातेधारकांना आवश्यक रक्कम देत नसल्याने ग्रामीण भागातील लहान-मोठ्या व्यवसायांवर विपरीत परिणाम होत आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकामधील रकमांची स्थिती अद्याप पूर्वस्थितीत आली नाही. शासन कितीही घोषणा करीत असले तरी ग्रामीण भागातील बँकांतून ग्राहकांना आपल्या खात्यातून आवश्यक तेवढी रक्कम मिळत नाही. यामुळे नागरिकांना आवश्यक वस्तुंची खरेदी करता येत नाही. दहा हजारांचे काम दोन हजारांत भागवावे लागत आहे. परिणामी, बाजारातील खरेदीवर विपरत परिणाम झाला असून ग्रामीण भागातील व्यावसायिक हातावर हात धरुन बसून आहेत. याउलट शेतकरी आपला शेतमाल शहराच्या बाजारपेठेत आणून विकतो. यामुळे आलेल्या रकमेतून शहरातूनच आवश्यक वस्तुंची खरेदी करतो. परिणामी, शहरी व्यावसायिकांना ग्राहक मिळतात तर ग्रामीण भागातील लहान-मोठ्या दुकानदारांची दररोजची आवक मंदावली आहे. यासाठी बँकेतून मिळणाऱ्या रकमेत सुधारणा होणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)