शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

माणसामाणसांतील भेद, विश्वशांतीतील अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 21:33 IST

आपणास खऱ्या अर्थाने माणूसपण राखायचे असेल तर दुसऱ्यांच्या सुख-दु:खात समरस व्हावयास पाहिजे. आपण दुसऱ्यास समजून घ्यायला पाहिजे, तरच ते तुमची किंमत करेल. माणसाचे मोठेपण मर्यादित जीवनात नाही, ते सामूहिक जीवनात आहे. प्रार्थना ही आपल्यासाठी मांगल्य निर्माण करते.

ठळक मुद्देएस. एन. सुब्बाराव : आयटीआय टेकडी परिसरात ग्रामजयंती समारोप कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आपणास खऱ्या अर्थाने माणूसपण राखायचे असेल तर दुसऱ्यांच्या सुख-दु:खात समरस व्हावयास पाहिजे. आपण दुसऱ्यास समजून घ्यायला पाहिजे, तरच ते तुमची किंमत करेल. माणसाचे मोठेपण मर्यादित जीवनात नाही, ते सामूहिक जीवनात आहे. प्रार्थना ही आपल्यासाठी मांगल्य निर्माण करते. आज माणसामाणसात भेद हा विश्वशांतीत सर्वांत मोठी अडचण असून त्याकडे लक्ष देण्याची गरज आह, असे विचार ज्येष्ठ गांधी विचारक तथा राष्ट्रीय युवा योजना निदेशक डॉ. एस. एन. सुब्बाराव, नवी दिल्ली यांनी सामुदायिक प्रार्थनेविषयी व्यक्त केले.ज्येष्ठ नागरिक बचत गट, गुरुदेव सेवा मंडळ व निसर्ग सेवा समितीच्या वतीने संयुक्तरीत्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती ग्रामजयंती समारोपीय कार्यक्रमाचे आॅक्सिजन पार्क, निसर्ग हिल्स आयटीआय टेकडी परिसरात करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी इंजि. भाऊ थुटे, बाबाराव राऊत, मोहन अग्रवाल, प्रदीप दाते, डॉ. राम ठोंबरे, प्रकाश येंडे उपस्थित होते.१ एप्रिल ते २९ एप्रिल संपूर्ण महिन्यात घरोघरी सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले. ३० एप्रिलला सकाळी सामुदायिक ध्यान परिपाठ व प्रभातफेरी काढण्यात आली. दीपोरीचे हेमंत टाले यांनी ध्यानाचे महत्त्व विशद केले.प्रमोदिनी मनोहरराव कोरडे स्मृतिप्रीत्यर्थ, ग्रामजयंती महोत्सव निमित्ताने यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.डॉ. सुब्बाराव यांनी वयाच्या ८७ वर्षीही आपल्या भारदस्त आवाजात एक दुलारा देश हमारा प्यारा हिंदुस्तान गीत गाऊन उपस्थितांची मने जिंकली.ज्येष्ठ नागरिक बचत गटाचे अध्यक्ष बाबाराव राऊत, जेष्ठ समाजसेवक मोहन अग्रवाल, प्रदीप दाते, डॉ. राम ठोंबरे, प्रकाश येंडे, यांनी ग्रामजयंतीवर आपले अनुरूप असे विचार व्यक्त केले.प्रदीप दाते यांची अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यकारिणीत निवड झाली त्याबद्दल व वृक्षमित्र हेमंत टाले दिपोरी, देहदान संकल्प करणाºयाचा ग्रामगीता देऊन डॉ. सुब्बाराव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. निरंजनअप्पा एरकेवार, तर बा. दे. हांडे व डॉ. शोभा बेलखोडे यांनी संचालन केले.पतंजली योग प्रशिक्षण वर्धा जिल्हाध्यक्ष दामोदर राऊत व रवी खाडे यांनी वातावरण निर्मितीकरिता साधारण असेच गीत सादर केले. राष्ट्रवंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी शेख हाशम, चंद्र्रशेखर दंढारे, रामभाऊ सातव, शोभा लंगडे, बाबाराव सावरकर, रमेश खुरगे, अरविंद भोयर, विजय ढोकळा, सुरेशचंद्र मांढळे, नरेश, ज्योती, अशुभ अग्रवाल देवळी, प्रकाश कदम, अ‍ॅड. भोयर, अमृता मडावी उपस्थित होते. उपस्थितांनी आॅक्सिजन पार्क परिसरात वृक्षारोपण केले.कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता रितेश निमसडे, अविनाश भडे, विकास देशमुख, सागर मसराम, विठ्ठल गेडाम, डॉ. विक्रम बेलखोडे, शरयू आदींनी सहकार्य केले. निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला बचत गट, गुरूदेव सेवा मंडळाचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.