शहरं
Join us  
Trending Stories
1
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
2
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
3
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
4
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
5
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
6
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
7
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
8
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
9
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
10
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
11
धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट
12
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण
13
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर
14
गौतम अदानींच्या कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर, गुंतवणूकदारांसाठी 'चांदी'? तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?
15
या इमारतीत ठेवलाय ₹12000 कोटींचा खजिना; जगभरातील श्रीमंतांचा अडकलाय जीव
16
पिंपरी-चिंचवड पोलिसांना पाहताच उडाली भंबेरी; नीलेश चव्हाण म्हणाला,'साहेब मला अस्वस्थ वाटतंय...'
17
IPL 2025 : मुंबई इंडियन्सनं Qualifier 2 जिंकत दोन वेळा उंचावलीये ट्रॉफी! पंजाबला ते एकदाही नाही जमलं

दहेगाव (मु.) येथे डायरियाची साथ

By admin | Updated: February 15, 2015 01:43 IST

तालुक्यातील दहेगाव(मु.) येथे गत तीन चार दिवसांपासून १५ ते २० गावकऱ्यांना हगवण व उलट्यांसह मळमळ आधीने ग्रासले आहे.

आर्वी : तालुक्यातील दहेगाव(मु.) येथे गत तीन चार दिवसांपासून १५ ते २० गावकऱ्यांना हगवण व उलट्यांसह मळमळ आधीने ग्रासले आहे. या गावात दररोज तीन ते पाच जणांना या रोगाची लागण होत आहे. यावर येथील ग्रामीण आरोग्य पथकाकडून कुठलीही उपाय योजना करण्यात आली नसल्याने रुग्ण संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे.आरोग्य विभागाच्यावतीने गावात होत असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे नमूने तपासणीकरिता पाठविले असल्याचे सांगण्यात आले आहे.आर्वी तालुक्यातील दहेगाव(मु.) हे दीड हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावात असलेल्या नदीकाठावरील विहिरीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. या पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याची पाईलाईन कुठेतरी लिकेज असण्याची शक्यता आहे. हे दूषित पाणी गावकऱ्यांच्या पिण्यात येत असल्याने रोज दोन तीन जणांना या गावात हगवण, उलट्यांचा त्रास होत आहे. यावर ग्रामीण प्र्राथमिक आरोग्य केंद्रांना या गावातील वाढत्या लागणीवर तातडीने उपाय करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. गत महिन्यात याच गावात पिण्याच्या पाणी पुरवठ्याचे पाईप लिकेज झाल्याने गावकऱ्यांना डायरियाची लागण झाली होती. त्याचीच पुनरावृत्ती सध्या गावात सुरू असून गावकरी या रोगाने भयग्रस्त झाले आहेत. याकडे आरोग्य विभागाने लक्ष देत कारवाई करण्याची गरज आहे.(तालुका प्रतिनिधी)