शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जिल्ह्यात धुळपेरणीला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 22:19 IST

जिल्ह्यात उन्हाचा पारा चढत असताना तळेगाव परिसरात शेतकऱ्यांनी धुळपेरणीला सुरुवात केली आहे. या भागात शेतकऱ्याजवळ सिंचनाची सोय असल्याने दरवर्षी या भागातील शेतकरी धुळपेरणी करतो. यातील काही शेतकरी सिंचनाच्या पाण्यावर धुळपेरणी करतो तर काही शेतकरी निसर्ग राजाच्या भरोशावर पेरणी करतो.

ठळक मुद्देतळेगाव (टालाटुले), चिकणी (जामणी) येथे कपाशीची लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (टा.) : जिल्ह्यात उन्हाचा पारा चढत असताना तळेगाव परिसरात शेतकऱ्यांनी धुळपेरणीला सुरुवात केली आहे. या भागात शेतकऱ्याजवळ सिंचनाची सोय असल्याने दरवर्षी या भागातील शेतकरी धुळपेरणी करतो. यातील काही शेतकरी सिंचनाच्या पाण्यावर धुळपेरणी करतो तर काही शेतकरी निसर्ग राजाच्या भरोशावर पेरणी करतो. गेल्या चार पाच वर्षापासून शेतकरी धुळपेरणी करीत असल्याने धुळपेरणी शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरत आहे. मागील वर्षी या भागात ८० टक्के शेतकऱ्याने मृग नक्षत्रात म्हणजे ७ ते १० जूनपर्यंत पेरणी केली व सतत चार दिवस वरूणराजा बरसल्याने या भागातील ८० टक्के पेरण्या साधल्या. ११ व १२ जून रोजी लागवड केलेल्या शेतकऱ्याला पावसाने एक महिन्याची दडी मारल्याने दुबार पेरणी करावी लागली. त्यामुळे मागावून झालेल्या पेरणीने मोठ्या प्रमाणात उत्पन्नात घट आली. त्यामुळे दरवर्षी येथील शेतकरी धुळपेरणीला जास्त महत्व देताना दिसत आहे.उन्हाची पर्वा न करता शेतकऱ्यांनी बैलाच्या व ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागतीची कामे केली. काही मशागतीची कामे अंतिम टप्प्यात येत आहेत. शेतकरी मान्सूनपूर्व शेतीची कामे आटोपत आहे. यावर्षी हवामान विभागाने १३ जुननंतर मुंबईत पावसाचे संकेत दिल्याने पेरणी १५ जून नंतर होईल असे दिसत आहे. शेतीच्या कामाबरोबर शेतकरी बियाणाच्या दुकानात गर्दी करीत असल्याचे दिसत आहे. अजूनही शेतकऱ्यांना बॅँकेतून कर्ज मिळायचे असल्याने शेतकरी बियाणे खरेदीसाठी सावकाराचे दार ठोठावत आहे. कारण पेरणीचा हंगाम येवूनही बॅँकेतून कर्ज मिळाले नसल्याने शेतकरी बियाणे खरेदीसाठी दारोदार फिरताना दिसत आहे.ज्या शेतकऱ्याजवळ पैशाची सोय आहे ते नगदी पैशाने बियाणे खरेदी करीत आहे व ज्याच्याजवळ पैशाची सोय नाही ते शेतकरी पैसे जुळवण्यासाठी धावपळ करीत आहे. तळेगाव येथील रामुजी बोरीकर या शेतकऱ्याने सहा एकर जागेत ५ जूनला कपाशी पेरणी केली आहे. तर एकुर्ली येथील शेतकरी प्रमोद काटकर यांनी १ जूनला एक एकर जागेत लागवड केली व त्यांची कपाशीही उगवली. दीड एकर चवºया पिकामध्ये मलचींग पेपरवर चवरा असून त्यामध्ये कपाशी लावली व दीड एकर जागेत ६ जूनला धुळपेरणी केली आहे. त्या शेतकऱ्याजवळ सिंचनाची सोय आहे. या शेतकऱ्यांनी लागवड करण्यास सुरुवात केली असून शेतकरी धुळपेरणीसाठी मान्सूनच्या प्रतिक्षेत आहे. शेतकरी बियाणे जुळवा जुळव करण्याच्या स्थितीत असून मशागतीचीही कामे आटोपत आहे.दरवषीप्रमाणे यावर्षीही आपण १ एकरात धुळ लागवड केलेली आहे. १ जूनला लागवड करण्यात आली. कपासी उगवली आहे. त्याला पाणी देण्याचे काम सुरू आहे.प्रमोद काटकर, शेतकरी, एकुर्ली

टॅग्स :agricultureशेती