शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

जिल्ह्यात धुळपेरणीला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 22:19 IST

जिल्ह्यात उन्हाचा पारा चढत असताना तळेगाव परिसरात शेतकऱ्यांनी धुळपेरणीला सुरुवात केली आहे. या भागात शेतकऱ्याजवळ सिंचनाची सोय असल्याने दरवर्षी या भागातील शेतकरी धुळपेरणी करतो. यातील काही शेतकरी सिंचनाच्या पाण्यावर धुळपेरणी करतो तर काही शेतकरी निसर्ग राजाच्या भरोशावर पेरणी करतो.

ठळक मुद्देतळेगाव (टालाटुले), चिकणी (जामणी) येथे कपाशीची लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (टा.) : जिल्ह्यात उन्हाचा पारा चढत असताना तळेगाव परिसरात शेतकऱ्यांनी धुळपेरणीला सुरुवात केली आहे. या भागात शेतकऱ्याजवळ सिंचनाची सोय असल्याने दरवर्षी या भागातील शेतकरी धुळपेरणी करतो. यातील काही शेतकरी सिंचनाच्या पाण्यावर धुळपेरणी करतो तर काही शेतकरी निसर्ग राजाच्या भरोशावर पेरणी करतो. गेल्या चार पाच वर्षापासून शेतकरी धुळपेरणी करीत असल्याने धुळपेरणी शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरत आहे. मागील वर्षी या भागात ८० टक्के शेतकऱ्याने मृग नक्षत्रात म्हणजे ७ ते १० जूनपर्यंत पेरणी केली व सतत चार दिवस वरूणराजा बरसल्याने या भागातील ८० टक्के पेरण्या साधल्या. ११ व १२ जून रोजी लागवड केलेल्या शेतकऱ्याला पावसाने एक महिन्याची दडी मारल्याने दुबार पेरणी करावी लागली. त्यामुळे मागावून झालेल्या पेरणीने मोठ्या प्रमाणात उत्पन्नात घट आली. त्यामुळे दरवर्षी येथील शेतकरी धुळपेरणीला जास्त महत्व देताना दिसत आहे.उन्हाची पर्वा न करता शेतकऱ्यांनी बैलाच्या व ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागतीची कामे केली. काही मशागतीची कामे अंतिम टप्प्यात येत आहेत. शेतकरी मान्सूनपूर्व शेतीची कामे आटोपत आहे. यावर्षी हवामान विभागाने १३ जुननंतर मुंबईत पावसाचे संकेत दिल्याने पेरणी १५ जून नंतर होईल असे दिसत आहे. शेतीच्या कामाबरोबर शेतकरी बियाणाच्या दुकानात गर्दी करीत असल्याचे दिसत आहे. अजूनही शेतकऱ्यांना बॅँकेतून कर्ज मिळायचे असल्याने शेतकरी बियाणे खरेदीसाठी सावकाराचे दार ठोठावत आहे. कारण पेरणीचा हंगाम येवूनही बॅँकेतून कर्ज मिळाले नसल्याने शेतकरी बियाणे खरेदीसाठी दारोदार फिरताना दिसत आहे.ज्या शेतकऱ्याजवळ पैशाची सोय आहे ते नगदी पैशाने बियाणे खरेदी करीत आहे व ज्याच्याजवळ पैशाची सोय नाही ते शेतकरी पैसे जुळवण्यासाठी धावपळ करीत आहे. तळेगाव येथील रामुजी बोरीकर या शेतकऱ्याने सहा एकर जागेत ५ जूनला कपाशी पेरणी केली आहे. तर एकुर्ली येथील शेतकरी प्रमोद काटकर यांनी १ जूनला एक एकर जागेत लागवड केली व त्यांची कपाशीही उगवली. दीड एकर चवºया पिकामध्ये मलचींग पेपरवर चवरा असून त्यामध्ये कपाशी लावली व दीड एकर जागेत ६ जूनला धुळपेरणी केली आहे. त्या शेतकऱ्याजवळ सिंचनाची सोय आहे. या शेतकऱ्यांनी लागवड करण्यास सुरुवात केली असून शेतकरी धुळपेरणीसाठी मान्सूनच्या प्रतिक्षेत आहे. शेतकरी बियाणे जुळवा जुळव करण्याच्या स्थितीत असून मशागतीचीही कामे आटोपत आहे.दरवषीप्रमाणे यावर्षीही आपण १ एकरात धुळ लागवड केलेली आहे. १ जूनला लागवड करण्यात आली. कपासी उगवली आहे. त्याला पाणी देण्याचे काम सुरू आहे.प्रमोद काटकर, शेतकरी, एकुर्ली

टॅग्स :agricultureशेती