शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘धरती बाटी, सागर बाटा मत बाटो इन्सान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 06:00 IST

केंद्र सरकारने एनआरसी आणि सीएए विधेयक पास केले आहे. शिवाय सदर विधेयकाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पाऊले टाकली जात आहे. परंतु, सदर विधेयक धर्मनिरपेक्ष राष्ट्र असलेल्या भारतातील नागरिकांना धर्माच्या आधारावर वाटणारे ठरू पाहत आहे. शिवाय ते भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १४ व १५ चे उल्लंघन करणारे आहे.

ठळक मुद्देविविध सामाजिक संघटनांसह सर्वपक्षीयांचे धरणे आंदोलन : राष्ट्रपतींना पाठविले मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एनआरसी आणि सीएएच्या विरोधात शुक्रवारी स्थानिक सिव्हील लाईन भागातील डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात विविध सामाजिक संघटना तसेच विविध पक्षांच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठविण्यात आले. ‘धरती बाटी, सागर बाटा मत बाटो इन्सान को’ अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांनी यावेळी रेटली.केंद्र सरकारने एनआरसी आणि सीएए विधेयक पास केले आहे. शिवाय सदर विधेयकाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पाऊले टाकली जात आहे. परंतु, सदर विधेयक धर्मनिरपेक्ष राष्ट्र असलेल्या भारतातील नागरिकांना धर्माच्या आधारावर वाटणारे ठरू पाहत आहे. शिवाय ते भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १४ व १५ चे उल्लंघन करणारे आहे. सदर विधेयकामुळे देशातील नागरिकांमध्ये तेढ निर्माण होत असून ते तातडीने रद्द करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दुपारी १ वाजतापासून सदर धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी नागरिक एकत्र येण्यास सुरूवात झाली. दुपारी ३.३० वाजेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात धरणे दिल्यानंतर ४ वाजताच्या सुमारास विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठविण्यात आले. या आंदोलनात आम्ही वर्धेकरचे संजय इंगळे तिगावकर, किसान अधिकार अभियानचे अविनाश काकडे, नाट्यकर्मी हरिष इथापे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, इक्राम हुसेन, श्रेया गोडे, महेंद्र मुनेश्वर, अमीर अली अजानी, सुधीर पांगुळ, मनोज चांदूरकर, ज्ञानेश्वर मडावी, तानबा उईके, संजय कावळे, सुनील ढोले, रामकृष्ण मिरगे, सिराज कुरेशी यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.गोडसे नको, गांधी पाहिजेदेशाची एकता आणि अखंडता कायम रहावी या आशयाचे एकापेक्षा एक गीत यावेळी आंदोलनकर्त्यांनी सादर केले. तर काहींनी धर्मभेद नको-जातीभेद नको, भारतात जन्मलेला प्रत्येक व्यक्ती हा भारतीय नागरिक आहे, पुलिस की लाठी योगी-मोदी-शाह की गुंडागर्दी नहीं चलेगी, धर्म भले अनेक है-हम सब एक है, गोडसे नका गांधी पाहिजे आदी मजकूर लिहून असलेले फलक दाखवून एनआरसी व सीएए विधेयकाबाबत रोष व्यक्त केला. 

टॅग्स :National Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी