शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
7
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
8
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
9
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
10
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
11
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
12
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
13
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
14
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
15
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
16
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
17
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
18
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
19
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
20
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...

‘धरती बाटी, सागर बाटा मत बाटो इन्सान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 06:00 IST

केंद्र सरकारने एनआरसी आणि सीएए विधेयक पास केले आहे. शिवाय सदर विधेयकाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पाऊले टाकली जात आहे. परंतु, सदर विधेयक धर्मनिरपेक्ष राष्ट्र असलेल्या भारतातील नागरिकांना धर्माच्या आधारावर वाटणारे ठरू पाहत आहे. शिवाय ते भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १४ व १५ चे उल्लंघन करणारे आहे.

ठळक मुद्देविविध सामाजिक संघटनांसह सर्वपक्षीयांचे धरणे आंदोलन : राष्ट्रपतींना पाठविले मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एनआरसी आणि सीएएच्या विरोधात शुक्रवारी स्थानिक सिव्हील लाईन भागातील डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात विविध सामाजिक संघटना तसेच विविध पक्षांच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठविण्यात आले. ‘धरती बाटी, सागर बाटा मत बाटो इन्सान को’ अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांनी यावेळी रेटली.केंद्र सरकारने एनआरसी आणि सीएए विधेयक पास केले आहे. शिवाय सदर विधेयकाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पाऊले टाकली जात आहे. परंतु, सदर विधेयक धर्मनिरपेक्ष राष्ट्र असलेल्या भारतातील नागरिकांना धर्माच्या आधारावर वाटणारे ठरू पाहत आहे. शिवाय ते भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १४ व १५ चे उल्लंघन करणारे आहे. सदर विधेयकामुळे देशातील नागरिकांमध्ये तेढ निर्माण होत असून ते तातडीने रद्द करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दुपारी १ वाजतापासून सदर धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी नागरिक एकत्र येण्यास सुरूवात झाली. दुपारी ३.३० वाजेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात धरणे दिल्यानंतर ४ वाजताच्या सुमारास विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठविण्यात आले. या आंदोलनात आम्ही वर्धेकरचे संजय इंगळे तिगावकर, किसान अधिकार अभियानचे अविनाश काकडे, नाट्यकर्मी हरिष इथापे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, इक्राम हुसेन, श्रेया गोडे, महेंद्र मुनेश्वर, अमीर अली अजानी, सुधीर पांगुळ, मनोज चांदूरकर, ज्ञानेश्वर मडावी, तानबा उईके, संजय कावळे, सुनील ढोले, रामकृष्ण मिरगे, सिराज कुरेशी यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.गोडसे नको, गांधी पाहिजेदेशाची एकता आणि अखंडता कायम रहावी या आशयाचे एकापेक्षा एक गीत यावेळी आंदोलनकर्त्यांनी सादर केले. तर काहींनी धर्मभेद नको-जातीभेद नको, भारतात जन्मलेला प्रत्येक व्यक्ती हा भारतीय नागरिक आहे, पुलिस की लाठी योगी-मोदी-शाह की गुंडागर्दी नहीं चलेगी, धर्म भले अनेक है-हम सब एक है, गोडसे नका गांधी पाहिजे आदी मजकूर लिहून असलेले फलक दाखवून एनआरसी व सीएए विधेयकाबाबत रोष व्यक्त केला. 

टॅग्स :National Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी