शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

‘नको सोन्या-चांदीचे दान; फक्त भिजव तहानलेले रान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 13:11 IST

देवशयनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून शुक्रवारी अनेक भाविक विठ्ठल चरणी नतमस्तक झाले. ‘नको सोन्या-चांदीचे दान; फक्त भिजव तहानलेले रान’ असे म्हणत जिल्ह्यातून दुष्काळाला हद्दपार कर माऊली असेच साकडेच भाविकांनी  विठ्ठल चरणी घातले.

ठळक मुद्देअनेक भाविक झाले नतमस्तकभाविकांचे विठ्ठलाला साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देवशयनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून शुक्रवारी अनेक भाविक विठ्ठल चरणी नतमस्तक झाले. ‘नको सोन्या-चांदीचे दान; फक्त भिजव तहानलेले रान’ असे म्हणत जिल्ह्यातून दुष्काळाला हद्दपार कर माऊली असेच साकडेच भाविकांनी  विठ्ठल चरणी घातले.मागील काही दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने अंकुरलेले पीकही माना टाकत आहेत. शिवाय दमदार पावसाअभावी जलाशयातही ठणठणाट आहे. यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील नागरिकांना भीषण जलसंकटालाच सामोरे जावे लागले आहे. अशातच जून महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनीही तूर, सोयाबीन, कपाशी आदी पिकांची लागवड केली. जमिनीत ओलावा कायम राहिल्याने बियाणेही अंकुरले. परंतु, मागील काही दिवसांपासून पाऊसच बेपत्ता झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.अशीच परिस्थिती पुढेही राहिल्यास पाणीबाणीच उद््भवेल. पाणीबाणीसह कोरड्या दुष्काळावर मात करण्यासाठी आणि जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी वरुणराजाला वर्धा जिल्ह्यात बरसण्याची आज्ञा दे असे साकडेच शुक्रवारी भाविकांनी विठ्ठलाला घातले. वर्धा शहरातील मालगुजारीपूरा भागातील विठ्ठल मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या मंदिरात शुक्रवारी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.

५१ फूट उंच विठ्ठलाच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळीआभाळागत माया, तुझी आम्हावर राहू दे... सुख, समृद्धीचा पाट, साऱ्या विश्वामध्ये वाहू दे... अशी मनोमन प्रार्थना विठ्ठला चरणी करीत येथील वणेच्या तिरावर ५१ फुट उंच विठ्ठल मूर्तीचे दर्शन करण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. आषाढी एकादशीचे औचित्य साधून वणा नदीच्या पैलतिरावर असंख्य भाविकांनी माऊलीचे दर्शन घेतले. जवळपास ५ फूट वणेच्या पात्रातून चालत जात महिला, पुरुष भाविकांनी पैलतिर गाठला. माऊलीच्या दर्शनाने अवघे दु:ख दूर झाल्याची भावनाच यावेळी भक्त व्यक्त करीत होते. टाळ, मृदंगाच्या निनादात भक्तीरंगात रंगलेल्या भाविकांनी जय जय रामकृष्ण हरी आणि ज्ञानबा तुकाराम नामाचा जयघोष केला. सकाळी ब्रह्म मुहूर्तावर विठ्ठलाची पूजा करण्यात आली. याप्रसंगी रामाजी फाले, नगरसेवक धनंजय बकाने, प्रमोद गोहणे, राजू सेनाड, प्रवीण बोकडे, सुरेश वाटकर, भेंडे, आशीष इरखेडे आदींची उपस्थिती होती.

प्रतिपंढरीत फुलला भाविकांचा मेळा आषाढी एकादर्शीच्या निमित्ताने प्रतिपंढरी अशी ओळख असलेल्या श्री क्षेत्र घोराड येथे भाविकांचा मेळाच फुलला होता. येथील विठ्ठल-रुखमाई मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी सकाळपासूनच एकच गर्दी केली होती. एकादर्शीच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमही पार पडले.

भक्तिसागरात विद्यार्थीही तल्लीनवर्धा शहरातील केळकरवाडी भागातील सरस्वती विद्या मंदिरम् येथील विद्यार्थ्यांनी विठ्ठल मंदिरापर्यंत पायी दिंडी काढली. विठ्ठल नामाचा जयघोष करीत अनवाणी पायानेच विद्यार्र्थी या दिंडीत सहभागी झाले होते. पालखी पुजन परसोडकर यांनी केले. यावेळी देशपांडे, पांडे, जलताडे, वाघ, शेंडे, ढुमणे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. या दिंडीत विद्यार्थी कुर्ता-पायजामा तर विद्यार्थिनी नववारी परिधानकरून सहभागी झाले होते, हे विशेष.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारी