शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

विकास कामांमध्ये हयगय खपवून घेणार नाही

By admin | Updated: June 19, 2016 01:55 IST

लोकसभा मतदार संघातील विविध विमकासात्मक प्रश्न जलदगतीने मार्गी लावण्याकरिता गुरुवारी विश्रामगृह येथे अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

रामदास तडस : आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचनावर्धा : लोकसभा मतदार संघातील विविध विमकासात्मक प्रश्न जलदगतीने मार्गी लावण्याकरिता गुरुवारी विश्रामगृह येथे अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विकास कामांत हयगय सहन करणार नसल्याचे खडेबोल खासदार रामदास तडस यांनी सुनावले. सर्व विकासकामे विहित वेळेत पूर्ण करून दर १५ दिवसांनी कामाचा प्रगती अहवाल सादर करावा, तसेच वर्धा लोकसभा क्षेत्रातील विकास कामामध्ये यापुढे कुठलाही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसून अधिकाऱ्यांच्या उदासिन धोरणामुळे कामे खोळबंल्यास संबंधित अधिकाऱ्यावर स्वत: कारवाई करणार असल्याचे खा. तडस यावेळी म्हणाले. सदर बैठकीमध्ये प्रामुख्याने खासदार विकास निधी, राज्य सरकारकडून मंजूर असलेली अर्थसंकल्पीय कामे, केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत असलेली कामे, सांसद आदर्श ग्राम तरोडा, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत येणारी कामे आदी कामांचा आढावा त्यांनी घेतला. शासकीय यंत्रणांनीही योग्य वेळेत व विहित मुदतीमध्ये विकासनिधी खर्च करावा व आलेले प्रस्ताव त्वरित मार्गी लावाव्या, अशा सूचना खा. तडस यांनी केल्या. यावेळी प्रामुख्याने प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी गजभिये, मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, सा.बां. विभागाचे कार्यकारी अभियंता चौधरी, आर्वी सा. बां. वि. भाष्करवार, शाखा अभियंता येळणे, जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी शाखा अभियंता निखार, नियोजन विभागाचे धोटे, चकाटे, शाखा अभियंता न.प.चे फरसोले तसेच तांदळे, जोशी उपस्थित होते.‘सांसद आदर्श ग्राम योजना’ अंतर्गत कारंजा तालुक्यातील नव्याने दत्तक घेतलेले गाव ‘पार्डी’ या गावाचा सविस्तर आराखडा सादर करण्यात आला. पार्डी गावाचा नियोजनबद्ध विकास करावा व जनजागृतीच्या माध्यमातून आदर्श गावाची चळवळ उभी राहावी याकरिता खा. तडस यांच्या सूचनेनुसार येत्या काही दिवसात जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार्डी गावामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून सर्व लोकामध्ये नुकतीच जनजागृती होईल व आदर्श गाव संकल्पनेचा शुभारंभ या माध्यमातून होईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.केंद्र व राज्य शासनाच्या सर्व लोकोउपयोगी योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याकरिता अधिकाऱ्यांनी युद्धस्तरावर प्रयत्न करण्याचे गरजेचे आहे व गरजू लोकांपर्यंत अधिकारी व कर्मचारी यांनी केंद्र व राज्यशासनाला योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याकरिता सहकार्य करावे, अश्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.(शहर प्रतिनिधी)