शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

विकास कामांमध्ये हयगय खपवून घेणार नाही

By admin | Updated: June 19, 2016 01:55 IST

लोकसभा मतदार संघातील विविध विमकासात्मक प्रश्न जलदगतीने मार्गी लावण्याकरिता गुरुवारी विश्रामगृह येथे अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

रामदास तडस : आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचनावर्धा : लोकसभा मतदार संघातील विविध विमकासात्मक प्रश्न जलदगतीने मार्गी लावण्याकरिता गुरुवारी विश्रामगृह येथे अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विकास कामांत हयगय सहन करणार नसल्याचे खडेबोल खासदार रामदास तडस यांनी सुनावले. सर्व विकासकामे विहित वेळेत पूर्ण करून दर १५ दिवसांनी कामाचा प्रगती अहवाल सादर करावा, तसेच वर्धा लोकसभा क्षेत्रातील विकास कामामध्ये यापुढे कुठलाही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसून अधिकाऱ्यांच्या उदासिन धोरणामुळे कामे खोळबंल्यास संबंधित अधिकाऱ्यावर स्वत: कारवाई करणार असल्याचे खा. तडस यावेळी म्हणाले. सदर बैठकीमध्ये प्रामुख्याने खासदार विकास निधी, राज्य सरकारकडून मंजूर असलेली अर्थसंकल्पीय कामे, केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत असलेली कामे, सांसद आदर्श ग्राम तरोडा, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत येणारी कामे आदी कामांचा आढावा त्यांनी घेतला. शासकीय यंत्रणांनीही योग्य वेळेत व विहित मुदतीमध्ये विकासनिधी खर्च करावा व आलेले प्रस्ताव त्वरित मार्गी लावाव्या, अशा सूचना खा. तडस यांनी केल्या. यावेळी प्रामुख्याने प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी गजभिये, मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, सा.बां. विभागाचे कार्यकारी अभियंता चौधरी, आर्वी सा. बां. वि. भाष्करवार, शाखा अभियंता येळणे, जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी शाखा अभियंता निखार, नियोजन विभागाचे धोटे, चकाटे, शाखा अभियंता न.प.चे फरसोले तसेच तांदळे, जोशी उपस्थित होते.‘सांसद आदर्श ग्राम योजना’ अंतर्गत कारंजा तालुक्यातील नव्याने दत्तक घेतलेले गाव ‘पार्डी’ या गावाचा सविस्तर आराखडा सादर करण्यात आला. पार्डी गावाचा नियोजनबद्ध विकास करावा व जनजागृतीच्या माध्यमातून आदर्श गावाची चळवळ उभी राहावी याकरिता खा. तडस यांच्या सूचनेनुसार येत्या काही दिवसात जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार्डी गावामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून सर्व लोकामध्ये नुकतीच जनजागृती होईल व आदर्श गाव संकल्पनेचा शुभारंभ या माध्यमातून होईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.केंद्र व राज्य शासनाच्या सर्व लोकोउपयोगी योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याकरिता अधिकाऱ्यांनी युद्धस्तरावर प्रयत्न करण्याचे गरजेचे आहे व गरजू लोकांपर्यंत अधिकारी व कर्मचारी यांनी केंद्र व राज्यशासनाला योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याकरिता सहकार्य करावे, अश्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.(शहर प्रतिनिधी)