शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

समृद्धी महामार्गामुळे शेतकºयांचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 23:23 IST

कॉँग्रेसच्या ६० वर्षांच्या काळात देशाने प्रगती केली नाही, तेवढी प्रगती मतदारांनी भाजपावर विश्वास टाकून निवडून दिलेल्या भाजपा सरकारने केली आहे.

ठळक मुद्देशिवराय कुळकर्णी : पुलगाव तथा आर्वीत पत्रकार परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : कॉँग्रेसच्या ६० वर्षांच्या काळात देशाने प्रगती केली नाही, तेवढी प्रगती मतदारांनी भाजपावर विश्वास टाकून निवडून दिलेल्या भाजपा सरकारने केली आहे. राज्य सरकारने शेतकºयांच्या व प्रामुख्याने विदर्भाच्या विकासाकडे लक्ष देत समृद्धी मार्ग व जलयुक्त शिवार योजना राबविली. या समृद्धी महामार्गामुळे विदर्भ व पर्यायाने विदर्भातील शेतकºयांचा विकास होणार आहे, असे मत भाजपाचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांनी व्यक्त केले.विश्राम गृहातील पत्रपरिषदेत ते बोलत होते. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या शासनाने उल्लेखनीय कामगिरी केली. तीन वर्षांपूर्वी कॉँग्रेस व राष्टÑवादीचे सरकार होते. त्यांनी जे खड्डे करून ठेवले, ते बुजविण्याचे काम भाजपा शासन करीत आहे. भाजपा सत्तेत आल्यावर ३ वर्षांत शासनाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची त्यांनी माहिती दिली. पत्रपरिषदेला भाजप जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, माजी खासदार सुरेश वाघमारे, न.प. अध्यक्ष शीतल गाते, शहराध्यक्ष मंगेश झाडे, जिल्हा चिटणीस नितीन बडगे, ओबीसी मंडळाचे प्रदेश सरचिटणीस संजय गाते उपस्थित होते. प्रास्ताविक राहुल चोपडा यांनी केले.होय, हे जनतेचे सरकार आहेआर्वी - फडणवीस सरकार काँगे्रस-राष्ट्रवादीच्या काळात डबघाईला आलेली अर्थव्यवस्था रूळावर आणण्यात यशस्वी झाले. शेतकरी हा केंद्रबिंदू असून शिवाजी महाराज कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत राज्यातील शेतकºयांना ऐतिहासिक कर्जमाफी देऊन तसेच शेतकरी कर्जमुक्त करण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे, असे शिवराय कुळकर्णी यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात तीन वर्षांच्या वचनपूर्ती केल्याच्या निमित्ताने येथील विश्रामगृहात पत्रपरिषद पार पडली.आॅनलाईन अर्ज दाखल केल्याने, कर्जमाफीचे लाभार्थी आधार कार्ड सोबत जोडल्याने शेतकºयांनाच लाभ मिळणार आहे. कॉंग्रेसच्या काळात झालेली धनाढ्य, बोगस शेतकºयांना ही कर्जमाफी मिळणार नाही. फडणवीस यांच्या कल्पनेतून साकारलेल्या जलयुक्त शिवार योजनेद्वारे राज्यातील २६४ गावांतील ४१,९९० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. २०१८ मध्ये १३८ गावांत ही योजना राबविली जाणार आहे. या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळावर कायम मात करणार आहे, असे सांगितले. पत्रपरिषदेला माजी आमदार दादाराव केचे, माजी खासदार विजय मुडे, अनिल जोशी, नीता गजाम, धर्मेंद्र राऊत, विजय बाजपेयी, मिलिंद हिवाळे, विनय डोळे, राजू राठी, नंदू थोरात, राजा गिरीधर, हिवसे आदी उपस्थित होते.