शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

समृद्धी महामार्गामुळे शेतकºयांचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 23:23 IST

कॉँग्रेसच्या ६० वर्षांच्या काळात देशाने प्रगती केली नाही, तेवढी प्रगती मतदारांनी भाजपावर विश्वास टाकून निवडून दिलेल्या भाजपा सरकारने केली आहे.

ठळक मुद्देशिवराय कुळकर्णी : पुलगाव तथा आर्वीत पत्रकार परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : कॉँग्रेसच्या ६० वर्षांच्या काळात देशाने प्रगती केली नाही, तेवढी प्रगती मतदारांनी भाजपावर विश्वास टाकून निवडून दिलेल्या भाजपा सरकारने केली आहे. राज्य सरकारने शेतकºयांच्या व प्रामुख्याने विदर्भाच्या विकासाकडे लक्ष देत समृद्धी मार्ग व जलयुक्त शिवार योजना राबविली. या समृद्धी महामार्गामुळे विदर्भ व पर्यायाने विदर्भातील शेतकºयांचा विकास होणार आहे, असे मत भाजपाचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांनी व्यक्त केले.विश्राम गृहातील पत्रपरिषदेत ते बोलत होते. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या शासनाने उल्लेखनीय कामगिरी केली. तीन वर्षांपूर्वी कॉँग्रेस व राष्टÑवादीचे सरकार होते. त्यांनी जे खड्डे करून ठेवले, ते बुजविण्याचे काम भाजपा शासन करीत आहे. भाजपा सत्तेत आल्यावर ३ वर्षांत शासनाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची त्यांनी माहिती दिली. पत्रपरिषदेला भाजप जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, माजी खासदार सुरेश वाघमारे, न.प. अध्यक्ष शीतल गाते, शहराध्यक्ष मंगेश झाडे, जिल्हा चिटणीस नितीन बडगे, ओबीसी मंडळाचे प्रदेश सरचिटणीस संजय गाते उपस्थित होते. प्रास्ताविक राहुल चोपडा यांनी केले.होय, हे जनतेचे सरकार आहेआर्वी - फडणवीस सरकार काँगे्रस-राष्ट्रवादीच्या काळात डबघाईला आलेली अर्थव्यवस्था रूळावर आणण्यात यशस्वी झाले. शेतकरी हा केंद्रबिंदू असून शिवाजी महाराज कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत राज्यातील शेतकºयांना ऐतिहासिक कर्जमाफी देऊन तसेच शेतकरी कर्जमुक्त करण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे, असे शिवराय कुळकर्णी यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात तीन वर्षांच्या वचनपूर्ती केल्याच्या निमित्ताने येथील विश्रामगृहात पत्रपरिषद पार पडली.आॅनलाईन अर्ज दाखल केल्याने, कर्जमाफीचे लाभार्थी आधार कार्ड सोबत जोडल्याने शेतकºयांनाच लाभ मिळणार आहे. कॉंग्रेसच्या काळात झालेली धनाढ्य, बोगस शेतकºयांना ही कर्जमाफी मिळणार नाही. फडणवीस यांच्या कल्पनेतून साकारलेल्या जलयुक्त शिवार योजनेद्वारे राज्यातील २६४ गावांतील ४१,९९० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. २०१८ मध्ये १३८ गावांत ही योजना राबविली जाणार आहे. या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळावर कायम मात करणार आहे, असे सांगितले. पत्रपरिषदेला माजी आमदार दादाराव केचे, माजी खासदार विजय मुडे, अनिल जोशी, नीता गजाम, धर्मेंद्र राऊत, विजय बाजपेयी, मिलिंद हिवाळे, विनय डोळे, राजू राठी, नंदू थोरात, राजा गिरीधर, हिवसे आदी उपस्थित होते.