शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच विकास शक्य

By admin | Updated: February 27, 2015 00:06 IST

विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासामुळेच मानवाला आजचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मानवी विकासात तंत्रविज्ञान व संचार माध्यमांचे महत्त्व अन्यन्य साधारण आहे.

वर्धा : विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासामुळेच मानवाला आजचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मानवी विकासात तंत्रविज्ञान व संचार माध्यमांचे महत्त्व अन्यन्य साधारण आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन मानवी जीवनातील प्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण साधन मानले जाते. म्हणूनच शिक्षण प्रक्रियेत विज्ञान, तंत्रज्ञान व वैज्ञानिक दृष्टीकोन याचा अंतर्भाव करण्यात आला आहे. शिक्षण पध्दतीतील कृती, अनुभवजन्यता, प्रयोगशीलतेतून शिकण्याची सहज प्रवृत्ती विकसित होण्याकरिता शालेय जीवनापासून याचा प्रारंभ झाला पाहिजे, असे प्रतिपादन नई तालीम समितीचे अध्यक्ष सुगन बरंठ यांनी केले. सेवाग्राम येथील नई तालीम प्रेरित आनंद निकेतन येथे आधुनिक तंत्रज्ञानानेयुक्त असलेल्या विज्ञान भवनात आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. येथील बजाज सायन्स सेंटरच्या मार्गदर्शनात कार्यशाळेचे उद्घाटन सी.वाय. देशपांडे संचालक बजाज सायन्स सेंटर, जि.प. सदस्य सुनिता ढवळे, सेवाग्राम वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. उल्हास जाजू यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी चिमुकल्यांनी देह मंदिर, चित्त मंदिर.. व धैर्य दे! हे गीत सादर केले. यानंतर बोलताना डॉ. जाजू यांनी विज्ञान आणि अध्यात्माची जोड आवश्यक असून नई तालीम याचे आदर्श आहे. आव्हान स्वीकारून नवीन विज्ञानाकडे वाटचाल करावी, असे आवाहन केले. तसेच देशपांडे यांनी विज्ञान म्हणजे काय? पर्यावरण व शाश्वत विकासाच्या संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी हेमंत मोहरीर, रवींद्र कडू, सुनील फरसोले यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर बाल वैज्ञानिकांनी सादर केलेल्या जलसंग्रहण, पुनर्भरण, उपयोगिता व व्यवस्थापनावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन करताना या प्रतिकृतीची गरज स्पष्ट केली.यानंतर बोलताना मान्यवरांनी गांधीजींच्या बुनियादी शिक्षणाच्या तत्त्वावर शिक्षणाचे प्रयोगशील कार्य चालु आहे. गुणवत्ता, दर्जेदार व कृतीतून रचनावादी शिक्षणाची गरज व्यक्त केली. यावेळी गावकरी, प्रतिष्ठित नागरिक, गांधी-विनोबा संस्थाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सुषमा शर्मा यांनी केले. संचालन जया गावंडे यांनी केले तर आभार शीवचरण ठाकूर यांनी मानले. कार्यक्रमाला प्रभाकर पुसदकर, गजानन अंबुलकर, योगीता गावंडे, जयश्री कामडे, शरद ताकसांडे, किशोर अमृतकर, उगले आदींनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)