शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून उजळणार दोन रस्त्यांचे भाग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 00:38 IST

स्वातंत्र्य प्राप्तीपासून आजपर्यंत गोदावरी रस्ता डांबरीकरण केला नव्हता. तीन किमी अंतर मातीतून पार करावे लागत होते. टेकोडा रस्ताही रेतीघाटांमुळे दबला होता.

ठळक मुद्देगोदावरी व टेकोडा या दोन्ही रस्त्यांना मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : स्वातंत्र्य प्राप्तीपासून आजपर्यंत गोदावरी रस्ता डांबरीकरण केला नव्हता. तीन किमी अंतर मातीतून पार करावे लागत होते. टेकोडा रस्ताही रेतीघाटांमुळे दबला होता. याबाबत अनेक वर्षांपासून पाठपुरावा केल्यानंतर दोन्ही रस्त्यांसाठी निधी मंजूर झाल्याची माहिती माजी आमदार दादाराव केचे यांनी दिली.गोदावरी पोच रस्ता तीन किमी लांबीचा आहे. वर्धा नदीच्या काठी वसलेल्या या गावात जायला रस्ता नव्हता. दरवर्षी पावसाळ्यात पाणी आल्यावर चिखल तुडवीत मार्ग काढावा लागत होता. प्रकृती बिघडल्यावर रुग्णांना खाटेवर टाकून चार-पाच लोकांमिळून मुख्य मार्गावर आणावे लागत होते. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. सदर रस्ता जि.प. बांधकाम विभागाकडे होता; पण निधी नसल्याने रस्त्याच्या कामाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले होते. यासाठी माजी आमदार केचे यांनी २००९ पासून शासनदरबारी सतत पाठपुरावा केला. शेवटी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून या रस्त्याला मंजुरी मिळाली आहे.टेकोडा अ‍ॅप्रोच रस्ता दीड किमी लांब आहे. या रस्त्याचे १९९८ मध्ये डांबरीकरण झाले होते; पण रेतीची अवजड वाहतूक झाल्याने पूर्ण रस्ता मातीत दबला. यामुळे बैलबंडी चालविणे तारेवरची कसरत होती. दोन्ही रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणाची मागणी ग्रामस्थ केचे यांच्याकडे करीत होते. शेवटी गोदावरी व टेकोडा रस्त्याचे भाग्य उजळणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या २०१७-१८ च्या बजेटमध्ये या रस्त्यांना प्राधान्य देऊन मंजुरी देण्यात आली. वर्षभरात दोन्ही रस्ते पूर्ण होईल, असेही केचे यांनी सांगितले. यावेळी जि.प. सदस्य अंकिता होेले, पं.स. सभापती नीता होले, राहुल बुले, शहराध्यक्ष अ‍ॅड. मनीष ठोंबरे, भाजप तालुकाध्यक्ष कमलाकर निंभोरकर, नगरसेवक अजय लेकुरवाळे, सुरेश काळबांडे, गजानन भोरे व कार्यकर्ते उपस्थित होते.अवजड वाहतूक अधिकगोदावरी आणि टेकोडा ही दोन्ही गावे रेतीघाटांची आहेत. यामुळे अवजड वाहनांची वाहतूक अधिक असते. परिणामी, रस्ते लवकर खराब होतात. यामुळे दोन्ही गावांत दर्जेदार रस्त्यांची निर्मिती गरजेची आहे.