शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून उजळणार दोन रस्त्यांचे भाग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 00:38 IST

स्वातंत्र्य प्राप्तीपासून आजपर्यंत गोदावरी रस्ता डांबरीकरण केला नव्हता. तीन किमी अंतर मातीतून पार करावे लागत होते. टेकोडा रस्ताही रेतीघाटांमुळे दबला होता.

ठळक मुद्देगोदावरी व टेकोडा या दोन्ही रस्त्यांना मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : स्वातंत्र्य प्राप्तीपासून आजपर्यंत गोदावरी रस्ता डांबरीकरण केला नव्हता. तीन किमी अंतर मातीतून पार करावे लागत होते. टेकोडा रस्ताही रेतीघाटांमुळे दबला होता. याबाबत अनेक वर्षांपासून पाठपुरावा केल्यानंतर दोन्ही रस्त्यांसाठी निधी मंजूर झाल्याची माहिती माजी आमदार दादाराव केचे यांनी दिली.गोदावरी पोच रस्ता तीन किमी लांबीचा आहे. वर्धा नदीच्या काठी वसलेल्या या गावात जायला रस्ता नव्हता. दरवर्षी पावसाळ्यात पाणी आल्यावर चिखल तुडवीत मार्ग काढावा लागत होता. प्रकृती बिघडल्यावर रुग्णांना खाटेवर टाकून चार-पाच लोकांमिळून मुख्य मार्गावर आणावे लागत होते. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. सदर रस्ता जि.प. बांधकाम विभागाकडे होता; पण निधी नसल्याने रस्त्याच्या कामाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले होते. यासाठी माजी आमदार केचे यांनी २००९ पासून शासनदरबारी सतत पाठपुरावा केला. शेवटी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून या रस्त्याला मंजुरी मिळाली आहे.टेकोडा अ‍ॅप्रोच रस्ता दीड किमी लांब आहे. या रस्त्याचे १९९८ मध्ये डांबरीकरण झाले होते; पण रेतीची अवजड वाहतूक झाल्याने पूर्ण रस्ता मातीत दबला. यामुळे बैलबंडी चालविणे तारेवरची कसरत होती. दोन्ही रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणाची मागणी ग्रामस्थ केचे यांच्याकडे करीत होते. शेवटी गोदावरी व टेकोडा रस्त्याचे भाग्य उजळणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या २०१७-१८ च्या बजेटमध्ये या रस्त्यांना प्राधान्य देऊन मंजुरी देण्यात आली. वर्षभरात दोन्ही रस्ते पूर्ण होईल, असेही केचे यांनी सांगितले. यावेळी जि.प. सदस्य अंकिता होेले, पं.स. सभापती नीता होले, राहुल बुले, शहराध्यक्ष अ‍ॅड. मनीष ठोंबरे, भाजप तालुकाध्यक्ष कमलाकर निंभोरकर, नगरसेवक अजय लेकुरवाळे, सुरेश काळबांडे, गजानन भोरे व कार्यकर्ते उपस्थित होते.अवजड वाहतूक अधिकगोदावरी आणि टेकोडा ही दोन्ही गावे रेतीघाटांची आहेत. यामुळे अवजड वाहनांची वाहतूक अधिक असते. परिणामी, रस्ते लवकर खराब होतात. यामुळे दोन्ही गावांत दर्जेदार रस्त्यांची निर्मिती गरजेची आहे.