शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

संसदेचे कामकाज खोळंबणे निंदनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 23:28 IST

संसदेमध्ये चर्चा न करता काँग्रेससह विरोधी पक्षातील सदस्य अधिवेशन काळात कामकाज सुरळीत चालू देत नाहीत. विरोधकांनी तब्बल २३ दिवस संसद बंद पाडली. हा प्रकार लोकशाहीला मारक असून निंदनीय आहे, असे मत खा. रामदास तडस यांनी उपोषण मंडपात व्यक्त केले.

ठळक मुद्देखासदारांचे लाक्षणिक उपोषण : जिल्हाध्यक्षासह भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : संसदेमध्ये चर्चा न करता काँग्रेससह विरोधी पक्षातील सदस्य अधिवेशन काळात कामकाज सुरळीत चालू देत नाहीत. विरोधकांनी तब्बल २३ दिवस संसद बंद पाडली. हा प्रकार लोकशाहीला मारक असून निंदनीय आहे, असे मत खा. रामदास तडस यांनी उपोषण मंडपात व्यक्त केले.विरोधकांच्या निषेधार्थ खा. रामदास तडस यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक -दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. या आंदोलनादरम्यान खा. तडस यांनी विरोधकांच्या जनसामान्य विरोधी धोरणांचा निषेध केला. आंदोलनात माजी खासदारांसह भाजप जिल्हाध्यक्ष सहभागी झाले होते. लोकसभा व राज्यसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सलग चार आठवडे बंद पाडून कुठलीही चर्चा न करता विरोधकांनी लोकशाहीची विटंबना केली. याचा निषेध आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आला. अपूर्ण माहितीच्या आधारे माध्यमांमार्फत खोटे आरोप करणाºया विरोधी पक्षांनी सभागृहात चर्चेची तयारी दर्शविली नाही. चार आठवडे सभागृह बंद पडल्याने संसद काळातील मानधन भाजप खासदारांनी परत केले. सभागृहात मुद्देसुद चर्चा केल्यास पितळ उघडे पडणार, या भीतीने विरोधकांनी सभागृह बंद पाडल्याचा आरोप खासदारांनी केला.दुपारी ३ वाजताच्या सुमारास उपोषण मंडपाला राज्याचे वित्तमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट देत आंदोलनात सहभागी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी आ.डॉ. पंकज भोयर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष अतुल तराळे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, शोभा तडस, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, माजी खासदार विजय मुडे, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, महिला आघाडीच्या अर्चना वानखेडे, जि.प. सदस्य पंकज सायंकार, मिलिंद भेंडे, प्रणव जोशी, माधव कोटस्थाने यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.सर्व भ्रष्टाचार काँगे्रसच्याच कार्यकाळातील - रामदास तडसनिरव मोदी, मीहूल चोकसी, विजय माल्या, रोटामॅक, व्हीडीयोकॉन बँक लोन, तनिष्क गोल्ड लोन यासह अनेक भ्रष्टाचार काँग्रेस सरकारच्या काळात झाले आहेत. यातील एकही गैरप्रकार भाजप काळातील नसून २००८-०९ मधील आहेत. असे असताना भ्रामक माहिती पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचे काम काँगे्रस करीत आहे. एका दिवसात संसदेत २० प्रश्न घेतले जातात. यात आपला क्रमांक लावावा लागतो; पण विरोधक संसदेचे कामकाज रोखून धरत असल्याने २३ दिवसांत एकाही प्रश्नावर चर्चा झाली नाही, असे खा. तडस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी आ.डॉ. पंकज भोयर, रामदास आंबटकर, अरुण अडसड, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, नगराध्यक्ष अतुल तराळे आदी उपस्थित होते.मुनगंटीवारांची राहुल गांधी, शरद पवारांवर टीकाकुठलीही चर्चा न करता विरोधक संसदेतील कामकाम बंद पाडत आहेत. ही बाब निंदनीयच आहे. ज्या काँग्रेस व राकाँच्या पुढाºयांनी इतकी वर्षे सत्ता भोगली त्यांना भाजपची सत्ता पोटात दुखणारीच ठरत आहे. काँग्रेस व राकाँच्या सरकारला इतक्या वर्षात सामान्य माणसांच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व शिक्षण हे प्रश्न सोडविता आले नाही. ते आता तीन वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजप सरकारवर बिनबुडाचे आरोप करीत ताशेरे ओढत आहे. तीन वर्षांत सर्व प्रश्न सुटतील, असा विरोधकांचा प्रश्न आठवे आश्चर्यच मानावे लागेल. एकीकडे नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून विचार करावा की देश कुठे जाईल आणि दुसरीकडे राकाँचे शरद पवार आणि राहूल गांधी यांचा चेहरा पंतप्रधान म्हणून डोळ्यासमोर ठेवून विचार केल्यास चित्र स्पष्ट होईल, अशी गुगली उपोषण मंडपात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शक करताना ना. सुधीर मुनगंटीवार यांनी टाकली. इतकेच नव्हे तर ना. मुनगंटीवार यांनी याप्रसंगी भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने काँग्रेस व राकाँचा खरा चेहरा जनसामान्यांसमोर आणण्याचे आवाहन केले.