शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

११ ग्रा.पं.तील बांधकाम गैरप्रकाराची विभागीय आयुक्तांकडून दखल

By admin | Updated: December 4, 2015 02:14 IST

शहरालगत असलेल्या ११ ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम करण्यात आल्याची तक्रार नागपूर येथील आयुक्त कार्यालयाकडे करण्यात आली होती.

प्रमोद मुरारका यांची पत्रपरिषदेत माहिती वर्धा: शहरालगत असलेल्या ११ ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम करण्यात आल्याची तक्रार नागपूर येथील आयुक्त कार्यालयाकडे करण्यात आली होती. यात ग्रामपंचायतीचा बराचसा भाग रिकामा दावून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप मुरारका यांनी केला होता. त्यांच्या या तक्रारीची दखल घेत नागपूर येथील विकास विभागाच्या उपायुक्तांनी या संदर्भात चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती प्रमोद मुरारका यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली.यावेळी वर्धा शहरालगत असलेल्या ११ ग्रामपंचायतीत बांधकाम परवानगी बाबत असलेल्या विविध घोळांची माहितीही त्यांनी दिली. शिवाय या संदर्भात वर्धा पंचायत समितीत माहिती अधिकारात माहिती मागविली असता त्यांच्याकडून अर्धवट माहिती दिली. यात मुरारका यांनी मागविलेल्या एकाही विषयाची माहिती त्यांनी पूर्ण दिली नसल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. या ११ ग्रामपंचायतीच्या भागात किती बांधकाम झाले या संदर्भात माहिती विचारली असता सहा हजार असे कळविण्यात आले; मात्र ते कोणत्या गावात झाले याची माहिती देण्यात आली नाही. यामुळे तक्रार कर्त्याने अपील केली असता नागपूर खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त वसंत पाटील यांनी वर्धा पंचायत समितीच्या कारभारावर ताशेरे ओढत त्यांना दंड व शास्ती करण्यासंदर्भात खुलासा मागविला असल्याची माहिती यावेळी मुरारका यांनी दिली. शिवाय खंडपीठाणे या संदर्भात जि.प. मुख्यकार्यपालन अधिकाऱ्याने या संदर्भात चौकशी करण्याच्या सूचना केल्याची माहिती दिली.(प्रतिनिधी)