शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कृषी विभाग कोमात; कोविडला आवतन मिळतेय जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 05:00 IST

जिल्ह्यात एकूण १ हजार २१५ कृषी केंद्र आहेत. याच कृषी केंद्रांमध्ये सध्या शेतकरी सोयाबीन, कपाशी, तूर आदींचे बियाणे खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी केंद्रांमध्ये कुठल्याही परिस्थितीत गर्दी होऊ नये, या ठिकाणी प्रत्येक ग्राहकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून घ्यावे, येणाऱ्या ग्राहकांना हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देफिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा : अधीक्षक करताहेत जिल्ह्याबाहेरून अप-डाऊन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना संकटातही शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली असून सध्या बियाणे खरेदीसाठी शेतकरी कृषी केंद्रांमध्ये गर्दी करीत आहेत. बियाणे आणि खत खरेदीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहे. शिवाय त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी कृषी विभागाकडे दिली आहे; पण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जिल्ह्याबाहेरून अप-डाऊन करीत आहे. शिवाय प्रत्यक्षात फिल्डवर जाण्याचे टाळत असल्याने कोरोनासाठी खबरदारीचा उपाय असलेल्या सोशल डिस्टन्सिंगचा कृषी केंद्रांमध्ये फज्जा उडत आहे.जिल्ह्यात एकूण १ हजार २१५ कृषी केंद्र आहेत. याच कृषी केंद्रांमध्ये सध्या शेतकरी सोयाबीन, कपाशी, तूर आदींचे बियाणे खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी केंद्रांमध्ये कुठल्याही परिस्थितीत गर्दी होऊ नये, या ठिकाणी प्रत्येक ग्राहकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून घ्यावे, येणाऱ्या ग्राहकांना हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. परंतु, वर्धा शहरातील मुख्य बाजारपेठेतील कृषी केंद्रांमध्ये बियाणे खरेदीसाठी तोबा गर्दी होत असल्याने तेथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. इतकेच नव्हे तर काही कृषी केंद्रांमध्ये ग्राहकांना हात धुण्यासाठी सुविधाही नसल्याचे बघावयास मिळते. सोशल डिस्टन्सिंगकडे पाठ दाखवत कृषी केंद्रांमध्ये होणारी गर्दी कोविड-१९ या विषाणूच्या झपाट्याने प्रसार होण्यास कारणीभूत ठरत आहे. तर कृषी केंद्र व्यावसायिकांना वटणीवर आणण्याची जबाबदारी असलेला कृषी विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने जिल्हा प्रशासनाने योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.भरारी पथक नावालाच?बोगस बियाण्यांना अटकाव घालण्यासाठी कृषी विभागाकडून एकूण नऊ भरारी पथक तयार करण्यात आली आहे. शिवाय कृषी केंद्रांची तपासणीही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. परंतु, या भरारी पथकातील काही अधिकारी कार्यालयात बसून कागदी घोडे नाचवत असल्याने सदर भरारी पथक नावालाच काय, असा प्रश्न कृषी तज्ज्ञांकडून उपस्थित केला जात आहे.अधीक्षक कार्यालयातून हाकताहेत गाडाजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून वर्धा जिल्ह्यात अनिल इंगळे हे काम पाहत आहे. परंतु, ते सध्या प्रत्यक्ष फिल्ड करीत नसल्याचे आणि कार्यालयात बसूनच कामकाजाचा गाडा हाकत आहेत. या बाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल ‘स्विच आॅफ’ होता.अर्धेअधिक साहित्य दुकानाबाहेरचअनेक कृषी केंद्र चालकांकडून त्यांच्या दुकानातील साहित्य दुकानांबाहेर ठेवले जात आहे. इतकेच नव्हे तर दुकानांसमोर मनमर्जीनेच वाहने उभी केली जात असल्याने त्या परिसरात बहूदा वाहतुकीची कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीचा इतर वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कृषी केंद्र व्यावसायिकांकडून करून घ्यावे. शिवाय जो कुणी कृषी केंद्र व्यावसायिक जिल्हा प्रशासनाकडून दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत असेल त्याच्यावर दंडात्मकसह फौजदारी कृषी विभागाने करावी. कृषी विभागाचे अधिकारी हयगय करताना निदर्शनास आल्यास जिल्हा प्रशासन त्यांच्यावर कारवाई करेल.- सुनील कोरडे, निवासी उपजिल्हाधिकारी, वर्धा.

टॅग्स :agricultureशेती