शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

देवळी बसस्थानकाचा होणार कायापालट

By admin | Updated: January 7, 2017 00:50 IST

महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन बसस्थानक सुधारणा करण्याबाबत अर्थमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्या

रामदास तडस : २ कोटी ७६ लाखांच्या प्रस्तावाला मंजुरी देवळी : महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन बसस्थानक सुधारणा करण्याबाबत अर्थमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत वर्धा जिल्ह्यातील देवळी येथील बस स्थानक सर्व सोईयुक्त व सुसज्ज उभारण्याकरिता २ कोटी ७६ लाखांच्या प्रस्तावाला मंजुरी प्रदान करण्यात आली. तसेच अंदाजपत्रक प्राप्त होताच प्रशासकीय मंजुरी घेवून निविदा मागविण्याची कार्यवाही होणार असल्याची माहिती खासदार रामदास तडस यांनी एका प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे. गत अनेक वर्षांपासून देवळी येथील रापमचे बसस्थानक विकासाच्या प्रतीक्षेत होते. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या या स्थानकावरून आवागमन करतात. सुविधाच्या अभावी प्रवाशांची गैरसोय होत होती. प्रवाशी व नागरिकांची समस्या लक्षात घेता खा. रामदास तडस यांनी देवळी बसस्थानकाचा कायापालट व्हावा, यासाठी शासनदरबारी वेळावेळी पाठपुरावा केला. त्यांनी सदर समस्या राज्याचे अर्थमंत्री व वर्धा तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मांडली. त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांच्या पुढाकाराने देवळी बसस्थानकाकरिता २ कोटी ७६ लाखांच्या प्रस्तावाला मंजूरी प्रदान करण्यात आली असून लवकरच निधीही उपलब्ध होणार असल्याचे खा. तडस यांनी कळविले आहे. देवळी बसस्थानकाचे नुतनीकरण चांगल्या दर्जाचे व उच्च तंत्रज्ञानयुक्त होण्याकरिता पुणे येथील वास्तुविशारदाची नेमणूक राज्य परिवहन महामंडळातर्फे करण्यात आली आहे. सदर कार्यामध्ये प्रामुख्याने प्रतिक्षालय (आठ फलाट), वाहतूक नियंत्रण कक्ष, पार्सल कक्ष, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृह, खुली विहीर, वाहतनतळ, उपहार गृह, चालक-वाहक विश्रांतीगृह, बैठक सभागृह, अधिकारी विश्रांतीगृह, हिरकणी कक्ष, पोलीस चौकी व संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे या बाबीचा प्रामुख्याने समावेश असणार आहे. प्रस्तावित बांधकामध्ये तळमजला व पहिला मजला असून दोन टप्प्यात कार्य पूर्ण होणार आहे. यामुळे प्रवाश्यांना मोठी सूविधा मिळणार आहे. लवकरच देवळी बसस्थान महाराष्ट्रातील आदर्श बसस्थानक होईल, असा विश्वास खा. तडस यांनी व्यक्त केला आहे. सदर बसस्थानकाच्या कायापालटासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खा. तडस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. सुधीर मुनगंटीवार, ना. दिवाकर रावते यांचे आभार मानले आहे.(प्रतिनिधी)