शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

साईनगरात डेंग्यूने घेतला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 06:00 IST

शहरातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सामान्य रुग्णालयासह खासगी रुग्णालयेही हाऊसफुल्ल झाले आहे. परतीच्या पावसानेही पुन्हा हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणात शहरातील काही परिसरात पाण्याचे डबके साचलेले आहेत. तसेच ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारेही दिसून येत आहे. मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणात गवतही वाढलेले असल्याने डासांची निर्मिती होण्यास सर्वत्र पोषक वातावरण आहे.

ठळक मुद्देपालिका प्रशासनाह आरोग्य विभाग सुस्त : नागरिकांचा रोष, मृत बँक व्यवस्थापक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बदलत्या वातावरणामुळे आणि शहरात ठिकठिकाणी असलेल्या अस्वच्छतेमुळे आजारांनी डोके वर काढले आहे. अशातच डेंग्यूचा आजारही पाय पसरत असताना उपाययोजनांचा अभाव दिसून येत आहे. शहरातील विविध भागातील डेंग्यूचे रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असतानाच साईनगरातील अतुल जिन्नेवार यांचा डेंग्यूने उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे साईनगरातील नागरिकांमध्ये आरोग्य यंत्रणेसह नगरपालिका प्रशासनाविरुद्ध तीव्र रोष व्यक्त करण्यात आला.शहरातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सामान्य रुग्णालयासह खासगी रुग्णालयेही हाऊसफुल्ल झाले आहे. परतीच्या पावसानेही पुन्हा हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणात शहरातील काही परिसरात पाण्याचे डबके साचलेले आहेत. तसेच ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारेही दिसून येत आहे. मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणात गवतही वाढलेले असल्याने डासांची निर्मिती होण्यास सर्वत्र पोषक वातावरण आहे. अशा स्थितीत नगर पालिकेने शहरातील प्रत्येक प्रभागात धुरळणी करणे आवश्यक आहे.मात्र नगरपालिकेतील अधिकारी वर्ग रजेवर असून पदाधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष असल्याने शहरात आजाराचे प्रमाण वाढत आहे. आरोग्य यंत्रणाही कागदोपत्री आकडेमोड करण्यात व्यस्त असून घटना घडल्यावर किंवा ओरड झाल्यावरच घटनास्थळी पोहोचून वरातीमागून घोडे दामटवित आहे. आरोग्य यंत्रणा व नगरपालिकेच्या या निष्क्रीयतेमुळे साईनगरातील अतुल जिन्नेवार यांना जीव गमवावा लागल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मृत अतुल जिन्नेवार हे वर्धा नागरी बँकेच्या गांधीनगर शाखेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. दिवाळीपूर्वी ते आजारी पडल्याने त्यांना शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी डेंग्यूचे निदान करुन त्यांच्यावर उपचार सुरु केले. पण, तरीही आराम पडला नाही. यातच काविळनेही जोर केल्यामुळे त्यांना सावंगी आणि तेथून नागपुरला हलविण्यात आले. गुरुवारी उपचारादरम्यान रात्री ९ वाजता त्यांचा मृत्यू झाला. कार्यतत्परता आणि सुस्वभावीवृत्तीमुळे सर्वपरिचित असल्याने ही दु:खद बातमी कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.डेंग्यूसदृश आजाराचीच नोंदतापाने फणफणत रुग्णालयात दाखल झाल्यानंतर खासगी रुग्णायलातील तपासणीअंती डेंग्यू झाल्याचे निदान करुन डॉक्टर उपचार सुरु करतात.पण; आरोग्य विभागाकडे डेंग्यू नाही तर डेंग्यू सदृश्य आजाराचीच नोंद होत असल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. मागिल महिन्यापर्यंत जिल्ह्यात ४० डेंग्यू सदृश्य रुग्ण असल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना कोणावर विश्वास ठेवावा असा प्रश्न निर्माण झाला आहे.साईनगर परिसरातील घटना कळल्याबरोबर आरोग्य विभागाची चमू त्या परिसरात पोहोचली. तेथील पाहणी केल्यानंतर नगरपालिकेला प्रतिबंधात्मक सूचना देण्यात आल्या. तसेच आरोग्य यंत्रणाही लक्ष ठेऊन आहे. कुणालाही ताप आल्यास त्यांनी त्याकडे दुर्लक्ष न करता तत्काळ जवळच्या रुग्णालयात जाऊन वेळीच उपचार घ्यावा.- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी.साईनगरातील अतुल जिन्नेवार यांचा आकस्मिक मृत्यू मनाला चटका लावून गेला. आरोग्य यंत्रणा आणि पालिका प्रशासनाचे दुर्लक्षच याला कारणीभूत आहे. हा प्रभाग मोठा असून या ठिकाणी मोकळ्या जागाही भरपूर आहे. त्यामुळे या परिसरात धुरळणी करणे आवश्यक असल्याने तशी मागणी पालिकेकडे करण्यात आली.परंतु कर्मचाºयांची कमतरता आणि अधिकाºयांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आम्हालाही काम करताना अडचणीचे जात आहे.- प्रदीप ठाकरे, नगरसेवक, साईनगर.