शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
3
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
4
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
5
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
6
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
7
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
8
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
9
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
10
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
11
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
12
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ठेवलेल्या नैवेद्याला कावळा शिवत नाही? नक्कीच हातून घडत असणार 'या' ५ चुका!
14
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
15
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
16
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
17
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
18
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
19
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
20
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!

साईनगरात डेंग्यूने घेतला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 06:00 IST

शहरातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सामान्य रुग्णालयासह खासगी रुग्णालयेही हाऊसफुल्ल झाले आहे. परतीच्या पावसानेही पुन्हा हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणात शहरातील काही परिसरात पाण्याचे डबके साचलेले आहेत. तसेच ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारेही दिसून येत आहे. मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणात गवतही वाढलेले असल्याने डासांची निर्मिती होण्यास सर्वत्र पोषक वातावरण आहे.

ठळक मुद्देपालिका प्रशासनाह आरोग्य विभाग सुस्त : नागरिकांचा रोष, मृत बँक व्यवस्थापक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बदलत्या वातावरणामुळे आणि शहरात ठिकठिकाणी असलेल्या अस्वच्छतेमुळे आजारांनी डोके वर काढले आहे. अशातच डेंग्यूचा आजारही पाय पसरत असताना उपाययोजनांचा अभाव दिसून येत आहे. शहरातील विविध भागातील डेंग्यूचे रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असतानाच साईनगरातील अतुल जिन्नेवार यांचा डेंग्यूने उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे साईनगरातील नागरिकांमध्ये आरोग्य यंत्रणेसह नगरपालिका प्रशासनाविरुद्ध तीव्र रोष व्यक्त करण्यात आला.शहरातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सामान्य रुग्णालयासह खासगी रुग्णालयेही हाऊसफुल्ल झाले आहे. परतीच्या पावसानेही पुन्हा हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणात शहरातील काही परिसरात पाण्याचे डबके साचलेले आहेत. तसेच ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारेही दिसून येत आहे. मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणात गवतही वाढलेले असल्याने डासांची निर्मिती होण्यास सर्वत्र पोषक वातावरण आहे. अशा स्थितीत नगर पालिकेने शहरातील प्रत्येक प्रभागात धुरळणी करणे आवश्यक आहे.मात्र नगरपालिकेतील अधिकारी वर्ग रजेवर असून पदाधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष असल्याने शहरात आजाराचे प्रमाण वाढत आहे. आरोग्य यंत्रणाही कागदोपत्री आकडेमोड करण्यात व्यस्त असून घटना घडल्यावर किंवा ओरड झाल्यावरच घटनास्थळी पोहोचून वरातीमागून घोडे दामटवित आहे. आरोग्य यंत्रणा व नगरपालिकेच्या या निष्क्रीयतेमुळे साईनगरातील अतुल जिन्नेवार यांना जीव गमवावा लागल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मृत अतुल जिन्नेवार हे वर्धा नागरी बँकेच्या गांधीनगर शाखेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. दिवाळीपूर्वी ते आजारी पडल्याने त्यांना शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी डेंग्यूचे निदान करुन त्यांच्यावर उपचार सुरु केले. पण, तरीही आराम पडला नाही. यातच काविळनेही जोर केल्यामुळे त्यांना सावंगी आणि तेथून नागपुरला हलविण्यात आले. गुरुवारी उपचारादरम्यान रात्री ९ वाजता त्यांचा मृत्यू झाला. कार्यतत्परता आणि सुस्वभावीवृत्तीमुळे सर्वपरिचित असल्याने ही दु:खद बातमी कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.डेंग्यूसदृश आजाराचीच नोंदतापाने फणफणत रुग्णालयात दाखल झाल्यानंतर खासगी रुग्णायलातील तपासणीअंती डेंग्यू झाल्याचे निदान करुन डॉक्टर उपचार सुरु करतात.पण; आरोग्य विभागाकडे डेंग्यू नाही तर डेंग्यू सदृश्य आजाराचीच नोंद होत असल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. मागिल महिन्यापर्यंत जिल्ह्यात ४० डेंग्यू सदृश्य रुग्ण असल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना कोणावर विश्वास ठेवावा असा प्रश्न निर्माण झाला आहे.साईनगर परिसरातील घटना कळल्याबरोबर आरोग्य विभागाची चमू त्या परिसरात पोहोचली. तेथील पाहणी केल्यानंतर नगरपालिकेला प्रतिबंधात्मक सूचना देण्यात आल्या. तसेच आरोग्य यंत्रणाही लक्ष ठेऊन आहे. कुणालाही ताप आल्यास त्यांनी त्याकडे दुर्लक्ष न करता तत्काळ जवळच्या रुग्णालयात जाऊन वेळीच उपचार घ्यावा.- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी.साईनगरातील अतुल जिन्नेवार यांचा आकस्मिक मृत्यू मनाला चटका लावून गेला. आरोग्य यंत्रणा आणि पालिका प्रशासनाचे दुर्लक्षच याला कारणीभूत आहे. हा प्रभाग मोठा असून या ठिकाणी मोकळ्या जागाही भरपूर आहे. त्यामुळे या परिसरात धुरळणी करणे आवश्यक असल्याने तशी मागणी पालिकेकडे करण्यात आली.परंतु कर्मचाºयांची कमतरता आणि अधिकाºयांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आम्हालाही काम करताना अडचणीचे जात आहे.- प्रदीप ठाकरे, नगरसेवक, साईनगर.