शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
2
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
3
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
4
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
5
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
6
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
7
Women Health: मासिक पाळी येण्यापूर्वी मूड का बिघडतो? शरीरातील 'हे' ५ बदल वेळीच ओळखा!
8
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
9
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
10
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
11
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
12
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
13
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
14
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
15
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
16
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
17
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
18
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
19
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
20
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलने व मोर्चापेक्षा मतपेटीतून शक्ती दाखवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:02 IST

राज्यात सत्तेवर आलेल्या आतापर्यंतच्या सर्वच सरकारने ओबीसींच्या मुळावर येणारे धोरण अंगिकारले. फक्त व्ही.पी.सिंग यांचे सरकार याला अपवाद ठरले. १९३१ च्या जनगणनेनुसार ५२ टक्के ओबीसी असतानाही कुठे ६ टक्के तर कुठे १६ टक्के आरक्षण आहे.

ठळक मुद्देज्ञानेश वाकुडकर : पत्र परिषदेत उपस्थित केला आरक्षणाबाबत प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यात सत्तेवर आलेल्या आतापर्यंतच्या सर्वच सरकारने ओबीसींच्या मुळावर येणारे धोरण अंगिकारले. फक्त व्ही.पी.सिंग यांचे सरकार याला अपवाद ठरले. १९३१ च्या जनगणनेनुसार ५२ टक्के ओबीसी असतानाही कुठे ६ टक्के तर कुठे १६ टक्के आरक्षण आहे. त्यामुळे आता बहूजन व ओबीसी स्वस्थ बसणार नाहीत. आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलने व मोर्चा काढून शक्ती खर्च करण्यापेक्षा मतपेटीतून शक्ती दाखविली जाईल, असे मत लोकजागरचे अध्यक्ष ज्ञानेश वाकुडकर यांनी पत्र परिषदेतून व्यक्त केले.स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्र परिषदेला लोकजागरचे महाराष्ट्र सचिव डी.व्ही.पडोळे, संयोजक बाबाराव भोयर व जिल्हाध्यक्ष मनीष नांदे उपस्थित होते. पुढे बोलतांना वाकुडकर म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीवर डोळा ठेवून मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला असून तो गोंधळ निर्माण करणारा आहे. आमचा कोणत्याही जातीच्या आरक्षणाला विरोध नाही, पण १६ टक्के आरक्षण कोणत्या आधारे जाहीर केले हा प्रश्नच आहे. आतपर्यंत एससी, एसटी व एनटी यांना संख्येप्रमाणे आरक्षण दिले.परंतू ओबीसींची संख्या जास्त असतानाही त्यांना सावत्रपणाची वागणूक मिळाली आहे. त्यामुळे ५२ टक्के लोकसंख्या असतांनाही आरक्षणात ओबीसींचा टक्का किती?असा प्रश्नही यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच शासनाने सर्व प्रवर्गाची जनगणना करावी, असेही ते म्हणाले.नव्या दमाचं नव नेतृत्वया दोन्ही पक्षांच्या सरकारला जनता आता कंटाळली आहे. त्यामुळे सर्व ओबीसी आणि बहूजनांनी एकत्र येऊन नव्या दमाचं नव नेतृत्व देण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. सुरुवातील वर्ध्यातच लोकसभा निवडणूक लढविण्याचे निश्चित केले होते. परंतू आता वाढता प्रतिसाद व नागरिकांच्या आग्रहास्तव सध्या पाच लोकसभा निवडणूकीसाठी नेतृत्व तयार केले जाणार असल्याचेही यावेळी ज्ञानेश वाकु डकर यांनी सांगितले.वर्ध्यात यात्रेचा होणार समारोपविदर्भात ‘ओबीसी मुख्यमंत्री, बहुजन सरकार’ हे ब्रीद घेऊन निघालेल्या लोकजागर यात्रेचा समारोप ५ डिसेंबरला दुपारी १२ वाजता होणार आहे. सर्कस मैदानावर होणाऱ्या सभेला प्रमुख पाहूणे म्हणून बीआरएसपीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश माने, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे,ओबीसी सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप ढोबळे व पॉलिटिकल युनिटी कॅम्पेनचे संयोजक इस्माईल बाटलीवाला यांची उपस्थिती राहणार आहे. या सभेला ओबीसी व बहुजन समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन लोकजागर अभियानच्यावतीने करण्यात आले आहे.