शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
5
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
6
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
7
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
8
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
9
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
10
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
11
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
12
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
13
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
14
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
15
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
16
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
17
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
18
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
19
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
20
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...

आंदोलने व मोर्चापेक्षा मतपेटीतून शक्ती दाखवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:02 IST

राज्यात सत्तेवर आलेल्या आतापर्यंतच्या सर्वच सरकारने ओबीसींच्या मुळावर येणारे धोरण अंगिकारले. फक्त व्ही.पी.सिंग यांचे सरकार याला अपवाद ठरले. १९३१ च्या जनगणनेनुसार ५२ टक्के ओबीसी असतानाही कुठे ६ टक्के तर कुठे १६ टक्के आरक्षण आहे.

ठळक मुद्देज्ञानेश वाकुडकर : पत्र परिषदेत उपस्थित केला आरक्षणाबाबत प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यात सत्तेवर आलेल्या आतापर्यंतच्या सर्वच सरकारने ओबीसींच्या मुळावर येणारे धोरण अंगिकारले. फक्त व्ही.पी.सिंग यांचे सरकार याला अपवाद ठरले. १९३१ च्या जनगणनेनुसार ५२ टक्के ओबीसी असतानाही कुठे ६ टक्के तर कुठे १६ टक्के आरक्षण आहे. त्यामुळे आता बहूजन व ओबीसी स्वस्थ बसणार नाहीत. आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलने व मोर्चा काढून शक्ती खर्च करण्यापेक्षा मतपेटीतून शक्ती दाखविली जाईल, असे मत लोकजागरचे अध्यक्ष ज्ञानेश वाकुडकर यांनी पत्र परिषदेतून व्यक्त केले.स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्र परिषदेला लोकजागरचे महाराष्ट्र सचिव डी.व्ही.पडोळे, संयोजक बाबाराव भोयर व जिल्हाध्यक्ष मनीष नांदे उपस्थित होते. पुढे बोलतांना वाकुडकर म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीवर डोळा ठेवून मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला असून तो गोंधळ निर्माण करणारा आहे. आमचा कोणत्याही जातीच्या आरक्षणाला विरोध नाही, पण १६ टक्के आरक्षण कोणत्या आधारे जाहीर केले हा प्रश्नच आहे. आतपर्यंत एससी, एसटी व एनटी यांना संख्येप्रमाणे आरक्षण दिले.परंतू ओबीसींची संख्या जास्त असतानाही त्यांना सावत्रपणाची वागणूक मिळाली आहे. त्यामुळे ५२ टक्के लोकसंख्या असतांनाही आरक्षणात ओबीसींचा टक्का किती?असा प्रश्नही यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच शासनाने सर्व प्रवर्गाची जनगणना करावी, असेही ते म्हणाले.नव्या दमाचं नव नेतृत्वया दोन्ही पक्षांच्या सरकारला जनता आता कंटाळली आहे. त्यामुळे सर्व ओबीसी आणि बहूजनांनी एकत्र येऊन नव्या दमाचं नव नेतृत्व देण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. सुरुवातील वर्ध्यातच लोकसभा निवडणूक लढविण्याचे निश्चित केले होते. परंतू आता वाढता प्रतिसाद व नागरिकांच्या आग्रहास्तव सध्या पाच लोकसभा निवडणूकीसाठी नेतृत्व तयार केले जाणार असल्याचेही यावेळी ज्ञानेश वाकु डकर यांनी सांगितले.वर्ध्यात यात्रेचा होणार समारोपविदर्भात ‘ओबीसी मुख्यमंत्री, बहुजन सरकार’ हे ब्रीद घेऊन निघालेल्या लोकजागर यात्रेचा समारोप ५ डिसेंबरला दुपारी १२ वाजता होणार आहे. सर्कस मैदानावर होणाऱ्या सभेला प्रमुख पाहूणे म्हणून बीआरएसपीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश माने, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे,ओबीसी सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप ढोबळे व पॉलिटिकल युनिटी कॅम्पेनचे संयोजक इस्माईल बाटलीवाला यांची उपस्थिती राहणार आहे. या सभेला ओबीसी व बहुजन समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन लोकजागर अभियानच्यावतीने करण्यात आले आहे.