शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

गारपीटग्रस्तांच्या पीक कर्जाच्या पुनर्गठनाची मागणी

By admin | Updated: June 23, 2014 00:15 IST

फेबु्रवारी व मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अशा शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याच्या सूचना शासनाने केल्या आहेत.

वर्धा : फेबु्रवारी व मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अशा शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याच्या सूचना शासनाने केल्या आहेत. असे असले तरी बँकांकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. बँकांना या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याच्या सूचना देण्याच्या मागणीकरिता राष्ट्रवादी युवक काँगे्रसच्या कार्यकर्त्यांनी निवेदन सादर केले आहे. कर्जाचे पुनर्गठन करण्याच्या शासनाच्या सूचना असताना बँकेकडून शेतकरऱ्यांची पिळवणूक करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना इंगाामाची जुळवाजुळव करण्याकरिता खासगी सावकाराच्या दारी जाण्याची वेळ आली आहे. या बाबीची दखल शासनाने घ्यावी व त्वरित पीक कर्जाचे पुनर्गठन करावे, अशा स्वरूपाचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप किटे यांच्या नेतृत्वात देण्यात आले.रायुकाँने दिलेल्या निवदेनानुसार, ज्या शेतकऱ्यांचे गारपिटीमुळे नुकसान झाले आहे आणि ज्यांना शासनाने आर्थिक मदत दिली आहे. अशा शेतकऱ्यांनी २०१३-१४ मध्ये घेतलेल्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश नुकतेच शासनाच्या सहकार विभागाने दिले आहेत. शिवाय या शेतकऱ्यांना थकीत कर्ज २०१४-१५, १५-१६ व १६-१७ या वार्षिक तीन हप्त्यात भरण्याची सवलत दिली आहे. सोबतच २०१४-१५ करिता पिककर्ज देण्याच्या सूचना शासनाने बँकांना केल्या आहेत. यासाठी २०१३-१४ या हंगामातील पीक कर्जाचे उपर्जित व्याज शासनामार्फत संबंधीत बँकाना अदा करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे पुनर्गठन झाले, अशा शेतकरऱ्यांना २०१४-१५ या हंगामातील पीक कर्जाचे उपर्जित व्याज शासनामार्फत बँकांना अदा करण्यात येणार आहे. शासनाच्या या आदेशाला राष्ट्रीयकृत बँका अनभिज्ञता दाखवीत असून कर्जाचे पुर्नगठन व नवीन पीक कर्जाबाबत कुठलेही आदेश नसल्याचे राष्ट्रीयकृत बँका भासवित आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. या गंभीर बाबीची शासनाने त्वरित दखल घेऊन राष्ट्रीयकृत बँकांना कर्जाचे पुर्नगठन करण्याचे आदेश द्यावेत शिवाय या हंगामाकरिता पिककर्ज द्यावे, अशा सूचना द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेप्रसंगी पं.स. उपसभापती संदेश किटे, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष संजय काकडे, पिपरी मेघे ग्रा.पं.सदस्य अजय गौळकार, राविकॉ जिल्हाध्यक्ष राहुल घोडे, नरेश खोबे, प्रशांत ढगे, विशाल लोखंडे, अमिताभ अंसारी, परवेश शेख, दीपक चव्हाण, संयज कुनघटकर, संदीप दरणे, संदीप भांडवलकर, राजू बुधबावरे, विजय सावकर, अवधूत उडाण, रवी संगताणी, गजानन वानखेडे, पंकज कडू, राहुल तेलरांधे यांची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)