शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

नाफेडच्या तूर खरेदी केंद्राची मागणी

By admin | Updated: February 16, 2017 01:26 IST

तालुक्याचे ठिकाण असलेल्या देवळी शहराशी मोठा ग्रामीण भाग जुळलेला आहे.

व्यापाऱ्यांकडून लूट : अल्प भावात होते तुरीची खरेदी देवळी/कोळोणा (चोरे) : तालुक्याचे ठिकाण असलेल्या देवळी शहराशी मोठा ग्रामीण भाग जुळलेला आहे. परिसरातील शेतकरीही येथे शेतमाल विक्रीसाठी आणतात. व्यापारी तुरीची अल्प भावात खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. यामुळे देवळी येथे नाफेडमार्फत तूर खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी कोळोणा व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. तूर काढणीला प्रारंभ झाला आहे. शेतकरी तूर विक्रीला आणत आहे. देवळीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडचे खरेदी केंद्र नाही. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. देवळी शहर ग्रामीण भागाशी जुळलेले असल्याने या भागातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल माल येथे विक्रीला आणणे परवडतो; पण नाफेडची खरेदी नसल्याने या भागातील शेतकऱ्यांना शेतमाल वर्धा, हिंगणघाट, यवतमाळ वा कळंब या ठिकाणी घेवून जावे लागते. या दूरच्या ठिकाणी माल घेऊन जाताना वाहतुकीचा दामदुप्पट खर्च करावा लागतो. पहिल्या दिवशी लिलाव न मिळाल्यास मुक्काम करावा लागतो. परिणामी, शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. देवळी शहरात व्यापाऱ्यांना तुरी विकल्यास अल्प भाव मिळतो. शेतकऱ्यांची आर्थिकता सावरायची असेल तर शासनाने तूर खरेदीसाठी नाफेडचे केंद्र सुरू करणे गरजेचे आहे. यातून शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक लाभ मिळू शकतो. शिवाय व्यापाऱ्यांकडून होत असलेल्या भाव पाडण्याच्या प्रक्रियेलाही लगाम बसेल. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे शासनाने त्वरित लक्ष देत नाफेडची तूर खरेदी सुरू करावी, अशी मागणी या भागातील शेतकरी नरेश ओंकार, नंदू भस्मे, प्रशांत मुनेश्वर, रवींद्र उपाशे, नितीन मानकर, गजानन मोडक, पद्माकर कांबळे, धम्मा कांबळे आदींनी केली.(प्रतिनिधी/वार्ताहर)