शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मृगधारांनी शेतकऱ्यांच्या आशेला पालवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील आठही तालुक्यात चार लाख २८ हजार २१५ हेक्टरवर खरिपाच्या लागवडीचे नियोजन आहे. यामध्ये प्रामुख्याने कपाशी, सोयाबीन, तूर, ज्वारी या पिकांचा समावेश आहे. गेल्यावर्षी शेतकऱ्यांना सोयाबीनने चांगलाच दगा दिल्याने यावर्षी शेतकऱ्यांना सोयाबीनच्या पेऱ्यामध्ये कपात केली आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांनी एक लाख ३७ हजार २६६ हेक्टरवर सोयाबीनची, तर दोन लाख १८ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड केली होती.

ठळक मुद्देजिल्ह्यात पेरणीला आला वेग कपाशीची २७.६४ टक्के टोबणसोयाबीनची २.४५ टक्के पेरणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा  : यावर्षी पावसाने लवकरच दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची पेरणीकरिता लगबग सुरू झाली. मृग नक्षत्राच्या जिल्ह्यात सर्वदूर सरी कोसळल्याने शेतकऱ्यांनी कपाशीच्या लागवडीवर भर दिला आहे. ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका, असे आवाहन कृषी विभागाकडून केले जात असले तरीही शेतकऱ्यांनी आपापल्या भागातील पावसाचा अंदाज घेऊन पेरणीला गती दिली आहे. जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यापासून कपाशीची २७.६४, सोयाबीनची २.४५ तर तुरीची ९.५८ टक्के लागवड पूर्ण झाली आहे.जिल्ह्यातील आठही तालुक्यात चार लाख २८ हजार २१५ हेक्टरवर खरिपाच्या लागवडीचे नियोजन आहे. यामध्ये प्रामुख्याने कपाशी, सोयाबीन, तूर, ज्वारी या पिकांचा समावेश आहे. गेल्यावर्षी शेतकऱ्यांना सोयाबीनने चांगलाच दगा दिल्याने यावर्षी शेतकऱ्यांना सोयाबीनच्या पेऱ्यामध्ये कपात केली आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांनी एक लाख ३७ हजार २६६ हेक्टरवर सोयाबीनची, तर दोन लाख १८ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड केली होती. परंतु यावर्षी कपाशीचा पेरा वाढविला असून, दोन लाख २७ हजार २५० हेक्टरवर कपाशीची लागवड होणार आहे. एक लाख २३ हजार ५०० हेक्टरवर सोयाबीनच्या लागवडीचे नियोजन आहे. सध्या शेतकऱ्यांनी कपाशीच्या लागवडीवर जोर दिलेला दिसून येत आहे. आतापर्यंत ५६ हजार ५३८ हेक्टरवर कपाशी, सात हजार १४४ तूर, तर तीन हजार ८३५ हेक्टरवर सोयाबीनची लागवड केली आहे. काही शेतातमध्ये कपाशीचे पीक जमिनीबाहेर आले असून, डोलताना दिसत आहे. काळ्या जमिनीवर हिरवळ दाटायला लागली आहे. मृगधारांनी शेतशिवार हिरवेगार होत आहे.

पावसाची सुरु होताच जिल्ह्यात लागवडीला वेग आला आहे. आतापर्यंत कपाशीची २७.६४ तर सोयाबीनची २.४५ टक्के पेरणी आटोपली आहे. अजुनही पेरणीची लगबग सुरु असून शेतकऱ्यांनी कमीत-कमी १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय बियाणांची लागवड करू नये. हवामान खात्यानेही आता पावसात खंड पडणार असल्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी, टोबणी करावी अन्यथा नुकसानीचा सामना करावा लागू शकतो.अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी