शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

मृगधारांनी शेतकऱ्यांच्या आशेला पालवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील आठही तालुक्यात चार लाख २८ हजार २१५ हेक्टरवर खरिपाच्या लागवडीचे नियोजन आहे. यामध्ये प्रामुख्याने कपाशी, सोयाबीन, तूर, ज्वारी या पिकांचा समावेश आहे. गेल्यावर्षी शेतकऱ्यांना सोयाबीनने चांगलाच दगा दिल्याने यावर्षी शेतकऱ्यांना सोयाबीनच्या पेऱ्यामध्ये कपात केली आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांनी एक लाख ३७ हजार २६६ हेक्टरवर सोयाबीनची, तर दोन लाख १८ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड केली होती.

ठळक मुद्देजिल्ह्यात पेरणीला आला वेग कपाशीची २७.६४ टक्के टोबणसोयाबीनची २.४५ टक्के पेरणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा  : यावर्षी पावसाने लवकरच दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची पेरणीकरिता लगबग सुरू झाली. मृग नक्षत्राच्या जिल्ह्यात सर्वदूर सरी कोसळल्याने शेतकऱ्यांनी कपाशीच्या लागवडीवर भर दिला आहे. ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका, असे आवाहन कृषी विभागाकडून केले जात असले तरीही शेतकऱ्यांनी आपापल्या भागातील पावसाचा अंदाज घेऊन पेरणीला गती दिली आहे. जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यापासून कपाशीची २७.६४, सोयाबीनची २.४५ तर तुरीची ९.५८ टक्के लागवड पूर्ण झाली आहे.जिल्ह्यातील आठही तालुक्यात चार लाख २८ हजार २१५ हेक्टरवर खरिपाच्या लागवडीचे नियोजन आहे. यामध्ये प्रामुख्याने कपाशी, सोयाबीन, तूर, ज्वारी या पिकांचा समावेश आहे. गेल्यावर्षी शेतकऱ्यांना सोयाबीनने चांगलाच दगा दिल्याने यावर्षी शेतकऱ्यांना सोयाबीनच्या पेऱ्यामध्ये कपात केली आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांनी एक लाख ३७ हजार २६६ हेक्टरवर सोयाबीनची, तर दोन लाख १८ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड केली होती. परंतु यावर्षी कपाशीचा पेरा वाढविला असून, दोन लाख २७ हजार २५० हेक्टरवर कपाशीची लागवड होणार आहे. एक लाख २३ हजार ५०० हेक्टरवर सोयाबीनच्या लागवडीचे नियोजन आहे. सध्या शेतकऱ्यांनी कपाशीच्या लागवडीवर जोर दिलेला दिसून येत आहे. आतापर्यंत ५६ हजार ५३८ हेक्टरवर कपाशी, सात हजार १४४ तूर, तर तीन हजार ८३५ हेक्टरवर सोयाबीनची लागवड केली आहे. काही शेतातमध्ये कपाशीचे पीक जमिनीबाहेर आले असून, डोलताना दिसत आहे. काळ्या जमिनीवर हिरवळ दाटायला लागली आहे. मृगधारांनी शेतशिवार हिरवेगार होत आहे.

पावसाची सुरु होताच जिल्ह्यात लागवडीला वेग आला आहे. आतापर्यंत कपाशीची २७.६४ तर सोयाबीनची २.४५ टक्के पेरणी आटोपली आहे. अजुनही पेरणीची लगबग सुरु असून शेतकऱ्यांनी कमीत-कमी १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय बियाणांची लागवड करू नये. हवामान खात्यानेही आता पावसात खंड पडणार असल्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी, टोबणी करावी अन्यथा नुकसानीचा सामना करावा लागू शकतो.अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी