शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मृग कोरडाच, बळीराजाची आर्द्रावर भिस्त

By admin | Updated: June 23, 2014 00:13 IST

रोहिणीपाठोपाठ मृगही कोरडा जात आहे. रोहिणीत पाऊस आला नसल्याने शेतकऱ्यांना मृगसरींची प्रतीक्षा होती. मात्र मृगात पाहिजे तशा सरी कोसळल्या नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.

पावसाची हुलकावणी : शेतकरी चिंतातुर; सोयाबीनचा पेरा नाही, केवळ कपाशीची लागवड वर्धा : रोहिणीपाठोपाठ मृगही कोरडा जात आहे. रोहिणीत पाऊस आला नसल्याने शेतकऱ्यांना मृगसरींची प्रतीक्षा होती. मात्र मृगात पाहिजे तशा सरी कोसळल्या नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. आता त्याची आशा रविवारपासून सुरू झालेल्या आद्रावर आली आहे. आद्राचा पहिला दिवस कोरडाच जाण्याची चिन्हे दिवसभर होती. येथेही पावसाने जर डोळे वटारले तर यंदा जिल्ह्यात कोरड्या दुष्काळाचे संकट आहे.गत हंगामात जून महिन्यापासूनच पावसाची हजेरी लागली होती. यामुळे जून महिन्याच्या अखेरीपर्यंत जिल्ह्यात ८० टक्के पेरा आटोपला होता. गत वर्षी चांगले उत्पन्न होईल अशी आशा असताना प्रारंभीपासून आलेला पाऊस अखेरीस अतिवृष्टी ठरला. यामुळे हातचे उत्पन्न गेले. यंदा मात्र या उलट परिस्थिती आहे. जून महिना संपण्याच्या मार्गावर असून पावसाची प्रतीक्षा कायम आहे. यामुळे यंदा कोरडा दुष्काळ तर पडणार नाही ना अशी शंका वर्तविली जात आहे. मृगाच्या सुरुवातील पावसाच्या थोड्या सरी पडल्याने शेतकऱ्याने त्याच्या कामाला गती दिली. आज चांगला पाऊस येईल, उद्या येईल या आशेत बळीराज असताना रोज आकाशात ढग दाटून येतात व सायंकाळी निघून जातात. पाऊस मात्र येत नाही. यामुळे त्याची चिंता आणखीच वाढली आहे.मृग नक्षत्रात खरीपाची बऱ्यापैकी पेरणी ओटोपते. यंदा मात्र तसे चित्र नाही. मृगाच्या प्रारंभी आलेल्या पावसामुळे काही शेतकऱ्यांनी कपाशी लागवड केली. तर काहींनी पावसाच्या प्रतीक्षेत शेतात कपाशीची बियाणे टाकून ठेवली आहेत. ज्यांनी पहिल्या पावसात कपाशीची लागवड केली त्यांची कपाशी उगविली असून पावसाअभावी ती करपण्याच्या मार्गावर आली आहे. जिल्ह्यात सोयाबीनच्या पेऱ्याला अद्याप सुरुवात झाली नाही. मृगात पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सावधानी बाळगत अद्याप सोयाबीनचा पेरा टाळला. यामुळे सोयाबीनची पेरणी आद्रा नक्षत्रातच होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यातही आद्रा कोरडा गेला तर खरीप शेतकऱ्यांच्या हातचा गेल्यातच आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)