शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

बोर नदीचे खोलीकरण व सरळीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 23:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू/घोराड : पावसाळ्याचे दिवस संपायला आले तरी तालुक्यातील विहिरींच्या पाणी पातळीत समाधानकारक वाढ झालेली नाही. सेलू तालुक्यातील शेतकºयांना शाश्वत शेती करण्यासाठी व बागायती तालुक्याचे गतवैभव पुन्हा प्राप्त होण्यासाठी बोर नदीच्या पात्राचे खोलीकरण व सरळीकरण करण्याची मागणी शेतकºयांची आहे.तालुक्यात ६६ हजार ३४० हेक्टर मध्ये असलेले कृषी क्षेत्र असून पैकी ...

ठळक मुद्देशेतकºयांची मागणी : विहिरींच्या पाणी पातळीत घट

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू/घोराड : पावसाळ्याचे दिवस संपायला आले तरी तालुक्यातील विहिरींच्या पाणी पातळीत समाधानकारक वाढ झालेली नाही. सेलू तालुक्यातील शेतकºयांना शाश्वत शेती करण्यासाठी व बागायती तालुक्याचे गतवैभव पुन्हा प्राप्त होण्यासाठी बोर नदीच्या पात्राचे खोलीकरण व सरळीकरण करण्याची मागणी शेतकºयांची आहे.तालुक्यात ६६ हजार ३४० हेक्टर मध्ये असलेले कृषी क्षेत्र असून पैकी ४ हजार ९२१ हेक्टर क्षेत्र बागायती आहे. या तालुक्यात १५ ते २० वर्षांपूर्वी २०० ते ३०० हेक्टरमध्ये असणाºया केळीच्या बागा सध्या केवळ २५ ते ३० हेक्टरमध्ये शिल्लक राहिल्या आहेत. ४० ते ४२ हजार हेक्टर कृषीे क्षेत्रात खरीप हंगामातील सोयाबीन व कापसाचे पीक विहिरीच्या पाण्याच्या पातळीचा अंदाज घेत घेतले जात आहे. रबी हंगाम हा बोरधरणाच्या पाण्याच्या साठ्यावर अवलंबून असतो. ५० वर्षांपूर्वी बोर नदीवर धरण बांधण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी या धरणाचे उद्घाटन केले. तेव्हापासून या धरणाला यशवंत धरण म्हणून ओळखले जाते. ५० वर्षांच्या कालखंडात उद्दिष्टपूर्ती झाली नसून तेव्हाच्या वितरिका व पाटचºया दुर्लक्षित आहेत. शेतांपर्यंत पाणी पोहोचविताना अर्ध्याधिक पाण्याचा अपव्यय होत आहे. सरकार शेतकºयांचे जीवनमान उंचविण्यासाठी सिंचन विहीर, फळबाग लागवड, ठिबक व तुषार सिंचन आदीसाठी अर्थसहाय्य करीत आहे; पण विहिरीच्या पाण्याची पातळी वाढविण्यासाठी या परिसरात असलेल्या बोर नदीच्या पात्राचे खोलीकरण व सरळीकरण करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. सदर कामे वेळेत झाल्यास शेतकºयांना सिंचनासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होऊ शकेल. शिवाय विहिरीच्या पाणीपातळीही वाढ होईल. यामुळे या मागणीकडे लक्ष देण्याची गरज आहे.बागायती तालुक्याला हवे गतवैभवकेळीची बाजारपेठ म्हणून विदर्भात सेलूची ओळख होती. घोराड, सेलू, वडगाव, रेहकी, सुरगाव येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेत होते. येथील केळी नागपुर, अमरावती, यवतमाळसह मध्यप्रदेशात दुर्ग, मय्यर, कटनी, बिलासपुर, रायपुर येथे विकल्या जात होती; पण १५ वर्षांत विहिरीच्या पाण्याच्या पातळीत आलेली घट व भारनियमन यामुळे केळीच्या बागा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. सेलू तालुक्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सरकारने योग्य पावले उचलण्याची मागणी आहे.बंधारे बनले शोभेचेबोर नदीवर असणारे बंधारे शोभेचे बनले आहे. बंधाºयाची डागडुजी व दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याने बंधाºयात पाणी अडत नाही. अन् पाणी जमिनीतही जिरत नाही.