शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बोर नदीचे खोलीकरण व सरळीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 23:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू/घोराड : पावसाळ्याचे दिवस संपायला आले तरी तालुक्यातील विहिरींच्या पाणी पातळीत समाधानकारक वाढ झालेली नाही. सेलू तालुक्यातील शेतकºयांना शाश्वत शेती करण्यासाठी व बागायती तालुक्याचे गतवैभव पुन्हा प्राप्त होण्यासाठी बोर नदीच्या पात्राचे खोलीकरण व सरळीकरण करण्याची मागणी शेतकºयांची आहे.तालुक्यात ६६ हजार ३४० हेक्टर मध्ये असलेले कृषी क्षेत्र असून पैकी ...

ठळक मुद्देशेतकºयांची मागणी : विहिरींच्या पाणी पातळीत घट

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू/घोराड : पावसाळ्याचे दिवस संपायला आले तरी तालुक्यातील विहिरींच्या पाणी पातळीत समाधानकारक वाढ झालेली नाही. सेलू तालुक्यातील शेतकºयांना शाश्वत शेती करण्यासाठी व बागायती तालुक्याचे गतवैभव पुन्हा प्राप्त होण्यासाठी बोर नदीच्या पात्राचे खोलीकरण व सरळीकरण करण्याची मागणी शेतकºयांची आहे.तालुक्यात ६६ हजार ३४० हेक्टर मध्ये असलेले कृषी क्षेत्र असून पैकी ४ हजार ९२१ हेक्टर क्षेत्र बागायती आहे. या तालुक्यात १५ ते २० वर्षांपूर्वी २०० ते ३०० हेक्टरमध्ये असणाºया केळीच्या बागा सध्या केवळ २५ ते ३० हेक्टरमध्ये शिल्लक राहिल्या आहेत. ४० ते ४२ हजार हेक्टर कृषीे क्षेत्रात खरीप हंगामातील सोयाबीन व कापसाचे पीक विहिरीच्या पाण्याच्या पातळीचा अंदाज घेत घेतले जात आहे. रबी हंगाम हा बोरधरणाच्या पाण्याच्या साठ्यावर अवलंबून असतो. ५० वर्षांपूर्वी बोर नदीवर धरण बांधण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी या धरणाचे उद्घाटन केले. तेव्हापासून या धरणाला यशवंत धरण म्हणून ओळखले जाते. ५० वर्षांच्या कालखंडात उद्दिष्टपूर्ती झाली नसून तेव्हाच्या वितरिका व पाटचºया दुर्लक्षित आहेत. शेतांपर्यंत पाणी पोहोचविताना अर्ध्याधिक पाण्याचा अपव्यय होत आहे. सरकार शेतकºयांचे जीवनमान उंचविण्यासाठी सिंचन विहीर, फळबाग लागवड, ठिबक व तुषार सिंचन आदीसाठी अर्थसहाय्य करीत आहे; पण विहिरीच्या पाण्याची पातळी वाढविण्यासाठी या परिसरात असलेल्या बोर नदीच्या पात्राचे खोलीकरण व सरळीकरण करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. सदर कामे वेळेत झाल्यास शेतकºयांना सिंचनासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होऊ शकेल. शिवाय विहिरीच्या पाणीपातळीही वाढ होईल. यामुळे या मागणीकडे लक्ष देण्याची गरज आहे.बागायती तालुक्याला हवे गतवैभवकेळीची बाजारपेठ म्हणून विदर्भात सेलूची ओळख होती. घोराड, सेलू, वडगाव, रेहकी, सुरगाव येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेत होते. येथील केळी नागपुर, अमरावती, यवतमाळसह मध्यप्रदेशात दुर्ग, मय्यर, कटनी, बिलासपुर, रायपुर येथे विकल्या जात होती; पण १५ वर्षांत विहिरीच्या पाण्याच्या पातळीत आलेली घट व भारनियमन यामुळे केळीच्या बागा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. सेलू तालुक्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सरकारने योग्य पावले उचलण्याची मागणी आहे.बंधारे बनले शोभेचेबोर नदीवर असणारे बंधारे शोभेचे बनले आहे. बंधाºयाची डागडुजी व दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याने बंधाºयात पाणी अडत नाही. अन् पाणी जमिनीतही जिरत नाही.