शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
3
बलुचिस्तानात मोठा खेला...! सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग; भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला
4
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
5
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
6
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
7
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
8
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
9
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
10
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
11
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
12
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
13
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
14
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
15
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
16
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
18
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
19
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
20
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?

बोर नदीचे खोलीकरण व सरळीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 23:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू/घोराड : पावसाळ्याचे दिवस संपायला आले तरी तालुक्यातील विहिरींच्या पाणी पातळीत समाधानकारक वाढ झालेली नाही. सेलू तालुक्यातील शेतकºयांना शाश्वत शेती करण्यासाठी व बागायती तालुक्याचे गतवैभव पुन्हा प्राप्त होण्यासाठी बोर नदीच्या पात्राचे खोलीकरण व सरळीकरण करण्याची मागणी शेतकºयांची आहे.तालुक्यात ६६ हजार ३४० हेक्टर मध्ये असलेले कृषी क्षेत्र असून पैकी ...

ठळक मुद्देशेतकºयांची मागणी : विहिरींच्या पाणी पातळीत घट

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू/घोराड : पावसाळ्याचे दिवस संपायला आले तरी तालुक्यातील विहिरींच्या पाणी पातळीत समाधानकारक वाढ झालेली नाही. सेलू तालुक्यातील शेतकºयांना शाश्वत शेती करण्यासाठी व बागायती तालुक्याचे गतवैभव पुन्हा प्राप्त होण्यासाठी बोर नदीच्या पात्राचे खोलीकरण व सरळीकरण करण्याची मागणी शेतकºयांची आहे.तालुक्यात ६६ हजार ३४० हेक्टर मध्ये असलेले कृषी क्षेत्र असून पैकी ४ हजार ९२१ हेक्टर क्षेत्र बागायती आहे. या तालुक्यात १५ ते २० वर्षांपूर्वी २०० ते ३०० हेक्टरमध्ये असणाºया केळीच्या बागा सध्या केवळ २५ ते ३० हेक्टरमध्ये शिल्लक राहिल्या आहेत. ४० ते ४२ हजार हेक्टर कृषीे क्षेत्रात खरीप हंगामातील सोयाबीन व कापसाचे पीक विहिरीच्या पाण्याच्या पातळीचा अंदाज घेत घेतले जात आहे. रबी हंगाम हा बोरधरणाच्या पाण्याच्या साठ्यावर अवलंबून असतो. ५० वर्षांपूर्वी बोर नदीवर धरण बांधण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी या धरणाचे उद्घाटन केले. तेव्हापासून या धरणाला यशवंत धरण म्हणून ओळखले जाते. ५० वर्षांच्या कालखंडात उद्दिष्टपूर्ती झाली नसून तेव्हाच्या वितरिका व पाटचºया दुर्लक्षित आहेत. शेतांपर्यंत पाणी पोहोचविताना अर्ध्याधिक पाण्याचा अपव्यय होत आहे. सरकार शेतकºयांचे जीवनमान उंचविण्यासाठी सिंचन विहीर, फळबाग लागवड, ठिबक व तुषार सिंचन आदीसाठी अर्थसहाय्य करीत आहे; पण विहिरीच्या पाण्याची पातळी वाढविण्यासाठी या परिसरात असलेल्या बोर नदीच्या पात्राचे खोलीकरण व सरळीकरण करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. सदर कामे वेळेत झाल्यास शेतकºयांना सिंचनासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होऊ शकेल. शिवाय विहिरीच्या पाणीपातळीही वाढ होईल. यामुळे या मागणीकडे लक्ष देण्याची गरज आहे.बागायती तालुक्याला हवे गतवैभवकेळीची बाजारपेठ म्हणून विदर्भात सेलूची ओळख होती. घोराड, सेलू, वडगाव, रेहकी, सुरगाव येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेत होते. येथील केळी नागपुर, अमरावती, यवतमाळसह मध्यप्रदेशात दुर्ग, मय्यर, कटनी, बिलासपुर, रायपुर येथे विकल्या जात होती; पण १५ वर्षांत विहिरीच्या पाण्याच्या पातळीत आलेली घट व भारनियमन यामुळे केळीच्या बागा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. सेलू तालुक्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सरकारने योग्य पावले उचलण्याची मागणी आहे.बंधारे बनले शोभेचेबोर नदीवर असणारे बंधारे शोभेचे बनले आहे. बंधाºयाची डागडुजी व दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याने बंधाºयात पाणी अडत नाही. अन् पाणी जमिनीतही जिरत नाही.