शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

सातबारा कोरा करुन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा

By admin | Updated: June 7, 2015 02:30 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्यातील शेतकरी दुष्काळ, नापिकी या संकटाचा सामना करीत आहे.

वर्धा : निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्यातील शेतकरी दुष्काळ, नापिकी या संकटाचा सामना करीत आहे. या परिस्थितीचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांना यातून दिलासा देण्यासाठी सत्तेवर येण्यापूर्वी भाजपाने सातबारा कोरा करुन कर्जमुक्त करण्याचे सूतोवाच केले होते. मात्र सत्तेवर येऊन एक वर्षाचा कालावधी लोटला तरी शेतकरी कर्जमुक्त झाला नसल्याने याकडे लक्ष वेधण्यासाठी माजी आमदार राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पत्र दिले आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी अंधकारमय स्थितीतून वाटचाल करीत आहे. दिवसेंदिवस यात भर पडत आहे. भारतासारख्या कृषीप्रधान देशातील शेतकरी हा देशोधडीला चालला असून शेती हा व्यवसाय धोक्यात आला आहे. ‘जय जवान जय किसान’ चा नारा देवुन ज्या देशातील शेतकऱ्यांनी हरितक्रांती पाहिली त्याच शेतकऱ्यावर आता आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.सरकारच्या दुर्लक्षामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. गत सरकारने ७२ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. केंद्र व राज्य सरकारने याची पुनरावृत्ती करण्याची वेळ आली आहे, असे पत्रात नमुद केले आहे. राज्यात तीन वर्षापासून दुष्काळी स्थिती आहे, दुसरीकडे शेतमालाला उत्पादन खर्चानुसार भाव आहे. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागते. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित शेतीमालाला भाव देवुन ५० टक्के नफा देण्याचे आश्वासन सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी दिले होते. मात्र शेतीमालाला भाव न देता शेतकऱ्यांची दिशाभुल केली जात आहे, असा अरोप करण्यात आला. शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी कर्जबाजारीपणाकडे वाटचाल करीत आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याची आशा आहे. सरकारने परिस्थिती लक्षात घेऊन दिलासा देण्याची मागणी आहे.शासनाने रद्द केलेल्या कोळसा खाणीच्या लिलावामधून दोन लाख कोटी रुपये केंद्र सरकारला मिळाले. याचा फायदा शेतकऱ्यांना देण्याची गरज आहे. देशातील शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहीत करुन कोळसा खाणी निर्माण केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा या कोळसा खाणीच्या पैशावर अधिकार आहे. दुष्काळाचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करण्याच्याकरिता उपाययोजना करण्याची मागणी या पत्रातून मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्याकडे करण्यात आली आहे. याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे यातून लक्ष वेधले आहे.(स्थानिक प्रतिनिधी)