शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 21:53 IST

राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात अनेक सरकारी मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय मागील महिन्यात राज्यातील जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. ज्या शाळांना इमारती नाहीत आणि तेथील पटसंख्या कमी आहे, अशा शाळा बंद करून त्यांचे समायोजन शेजारच्या शाळेत केले जाईल. तसेच त्या विद्यार्थ्यांच्या प्रवासाची जबाबदारी प्रशासन घेईल, असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. त्यामुळे शासनाने हा निर्णय त्वरीत रद्द करावा, अशी मागणी स्टुडंट फेडरेशनच्यावतीने करण्यात आली.

ठळक मुद्देस्टुडंट फेडरेशनची मागणी : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात अनेक सरकारी मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय मागील महिन्यात राज्यातील जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. ज्या शाळांना इमारती नाहीत आणि तेथील पटसंख्या कमी आहे, अशा शाळा बंद करून त्यांचे समायोजन शेजारच्या शाळेत केले जाईल. तसेच त्या विद्यार्थ्यांच्या प्रवासाची जबाबदारी प्रशासन घेईल, असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. त्यामुळे शासनाने हा निर्णय त्वरीत रद्द करावा, अशी मागणी स्टुडंट फेडरेशनच्यावतीने करण्यात आली.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले. त्यांच्या मार्फत हे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. सन २००९ च्या शिक्षण हक्क कायद्यानुसार ६ ते १४ या वयोगटातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. तसेच हे शिक्षण सक्तीचेही करण्यात आले आहे. पण, शासनाने आता शाळा बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्याने अनेकांच्या अडचणी वाढल्या आहे. शाळा बंद केल्यानंतर त्याचे समायोजन करणे शक्य आहे का? हा प्रश्न निर्माण होत आहे.कारण विशेषत: ग्रामीण भागात शाळा असलेल्या दोन गावामध्ये भौगोलिक अंतर जास्त आहे. एकीकडे सरकार खाजगी शाळांना परवानगी देत आहे. त्यामुळे पालकांच्या खिशाला चांगलाच चुना लागत आहे. खाजगीकरणाचे निर्णय घेवून सरकार आपल्या जबाबदारीपासून पळ काढत असल्याचे दिसत आहे. सरकारी मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय हा ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचीत ठेवणारा आहे. तसेच बालभारतीने संख्यावाचन पध्दतीत केलेला बदलही अवास्तव आहे. सोपा करण्याच्या नावावर असे बदल करणे चूक आहे. यापासून विद्यार्थी, शिक्षक व पालक अनभिज्ञ आहेत. यातून बालभारतीला काय साध्य करायचे आहे. शाळांमध्ये अनेक मुलभूत सुविधांचा अभाव असतांना सरकार दुर्लक्ष करून असे निर्णय माथी मारण्याचे काम करीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांच्याही अडचणी वाढल्याने असे निर्णय त्वरीत रद्द करण्याची मागणी स्टुडंन्टस् फेडरेशन आॅफ इंडियाच्यावतीने मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना फेडरेशनचे राज्य सचिव राहुल खंडाळकर, जिल्हा सचिव मोनाली मेश्राम, हिमांशु राऊत, प्रियंका मेश्राम, प्राची राऊत, प्रतिज्ञा राऊत, पल्लवी नैताम, अनुज येलुरे, विनोद अवथळे, प्रकाश भगत, लोकेश येवले आदी उपस्थित होते.