शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 22:34 IST

शासनाने जिल्ह्यातील कारंजा (घाडगे), समुद्रपूर व आष्टी तालुक्यांमध्ये दुष्काळ केला आहे. परंतु यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ सदृष्य स्थिती आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा,.....

ठळक मुद्देसेवाग्रामला निधी द्या : खासदारांची मुख्यमंत्र्यासोबत चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाने जिल्ह्यातील कारंजा (घाडगे), समुद्रपूर व आष्टी तालुक्यांमध्ये दुष्काळ केला आहे. परंतु यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ सदृष्य स्थिती आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. हिंगणघाट येथे मुख्यमंत्री दौऱ्यावर असताना खासदारांनी त्यांच्याशी या प्रश्नावर दीर्घ चर्चा केली. व संपूर्ण परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली.मुख्यमंत्र्याशी चर्चा करताना खासदार रामदास तडस म्हणाले की, कमी झालेले पर्जन्यमान यामुळे वर्धा जिल्हयामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यापैकी वर्धा हा एक जिल्हा असून पाणी टंचाईमुळे परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते परिणामी सामान्य नागरिक व शेतकरी संकटात सापडलेला आहे. वर्धा जिल्हयातील शेतकºयांची बिकट परिस्थिती पाहता ट्रिगर २ लागू केलेल्या राज्यातील तालुक्यांच्या यादीमध्ये वर्धा जिल्हयातील वर्धा, सेलू, देवळी, हिंगणघाट व आर्वी तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यामध्ये समावेश करावा, सोबतच संपुर्ण वर्धा जिल्हयात दुष्काळ जाहीर करावा अशी विनंती खासदार रामदास तडस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागामार्फत सेवाग्राम विकास आराखडा प्रकल्पाची कामे वर्धा जिल्हयात प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पामध्ये सेवाग्राम ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकासकामांकरिता मुबलक निधी उपलब्ध देण्याकरिता स्थानिक लोकप्रतिनीधी व जनतेनी आपणाकडे विनंती केली आहे. सेवाग्राम महात्मा गांधीजींची कर्मभूमी असून जागतीक दर्जाचे पर्यटन केंद्र्र आहे. सेवाग्राम विकास आराखडाच्या माध्यमातून सेवाग्राम सभोवताल अनेक विकास कामे प्रगती पथावर असून या विकासकामांमध्ये सेवाग्राम ग्रामपंचायत गावांतर्गत विकासकामांचा समावेश आराखडयात केल्यास सेवाग्राम ग्रामपंचायतीला एक आदर्श गांव म्हणून विकसीत करण्यास हातभार लागेल. यापूर्वी पवनार व वरुड या ग्रामपंचायती करिता सेवाग्राम विकास आराखडयातून गावांतर्गत विकास कामांकरिता निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. याच धर्तीवर सेवाग्राम विकास आराखडयातून सेवाग्राम ग्रामपंचायत मधील गावांतर्गत विकास कामे पुर्ण करण्याकरिता रुपये १० कोटीची कामे सुचविण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सेवाग्राम विकास आराखडा प्रकल्पाचे आकीर्टेक्ट, सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायत सेवाग्राम यांना लेखी स्वरुपात कळविले आहे. या सर्व प्रस्तावास शिखर समितीचे अध्यक्ष म्हणून शासन स्तरावरुन त्वरीत प्रशासकीय मान्यता द्यावी व जिल्हाधिकारी यांना आदेशीत करावे अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी मुख्यमंत्र्याकडे केली. केंद्र सरकारच्या चमुकडून दुष्काळी भागाची पाहणी लवकर होणार आहे, याविषयी राज्यसरकार आपल्या मागणीवर नक्कीच सकारात्मक विचार करेल व सोबतच सेवाग्राम विकास आराखडयातून सेवाग्राम ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामाकरिता निधी उपलब्ध करुन दिला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.सेवाग्राम ग्रा.पं.ला १० कोटी द्याविकास आराखड्यात वरूड, पवनार यासह अनेक ग्रामपंचायतला निधी दिला आहे. मात्र सेवाग्राम गावात अंतर्गत विकास कामांसाठी १० कोटी रूपये देण्यात यावे अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRamdas Tadasरामदास तडस