शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 22:34 IST

शासनाने जिल्ह्यातील कारंजा (घाडगे), समुद्रपूर व आष्टी तालुक्यांमध्ये दुष्काळ केला आहे. परंतु यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ सदृष्य स्थिती आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा,.....

ठळक मुद्देसेवाग्रामला निधी द्या : खासदारांची मुख्यमंत्र्यासोबत चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाने जिल्ह्यातील कारंजा (घाडगे), समुद्रपूर व आष्टी तालुक्यांमध्ये दुष्काळ केला आहे. परंतु यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ सदृष्य स्थिती आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. हिंगणघाट येथे मुख्यमंत्री दौऱ्यावर असताना खासदारांनी त्यांच्याशी या प्रश्नावर दीर्घ चर्चा केली. व संपूर्ण परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली.मुख्यमंत्र्याशी चर्चा करताना खासदार रामदास तडस म्हणाले की, कमी झालेले पर्जन्यमान यामुळे वर्धा जिल्हयामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यापैकी वर्धा हा एक जिल्हा असून पाणी टंचाईमुळे परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते परिणामी सामान्य नागरिक व शेतकरी संकटात सापडलेला आहे. वर्धा जिल्हयातील शेतकºयांची बिकट परिस्थिती पाहता ट्रिगर २ लागू केलेल्या राज्यातील तालुक्यांच्या यादीमध्ये वर्धा जिल्हयातील वर्धा, सेलू, देवळी, हिंगणघाट व आर्वी तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यामध्ये समावेश करावा, सोबतच संपुर्ण वर्धा जिल्हयात दुष्काळ जाहीर करावा अशी विनंती खासदार रामदास तडस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागामार्फत सेवाग्राम विकास आराखडा प्रकल्पाची कामे वर्धा जिल्हयात प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पामध्ये सेवाग्राम ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकासकामांकरिता मुबलक निधी उपलब्ध देण्याकरिता स्थानिक लोकप्रतिनीधी व जनतेनी आपणाकडे विनंती केली आहे. सेवाग्राम महात्मा गांधीजींची कर्मभूमी असून जागतीक दर्जाचे पर्यटन केंद्र्र आहे. सेवाग्राम विकास आराखडाच्या माध्यमातून सेवाग्राम सभोवताल अनेक विकास कामे प्रगती पथावर असून या विकासकामांमध्ये सेवाग्राम ग्रामपंचायत गावांतर्गत विकासकामांचा समावेश आराखडयात केल्यास सेवाग्राम ग्रामपंचायतीला एक आदर्श गांव म्हणून विकसीत करण्यास हातभार लागेल. यापूर्वी पवनार व वरुड या ग्रामपंचायती करिता सेवाग्राम विकास आराखडयातून गावांतर्गत विकास कामांकरिता निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. याच धर्तीवर सेवाग्राम विकास आराखडयातून सेवाग्राम ग्रामपंचायत मधील गावांतर्गत विकास कामे पुर्ण करण्याकरिता रुपये १० कोटीची कामे सुचविण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सेवाग्राम विकास आराखडा प्रकल्पाचे आकीर्टेक्ट, सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायत सेवाग्राम यांना लेखी स्वरुपात कळविले आहे. या सर्व प्रस्तावास शिखर समितीचे अध्यक्ष म्हणून शासन स्तरावरुन त्वरीत प्रशासकीय मान्यता द्यावी व जिल्हाधिकारी यांना आदेशीत करावे अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी मुख्यमंत्र्याकडे केली. केंद्र सरकारच्या चमुकडून दुष्काळी भागाची पाहणी लवकर होणार आहे, याविषयी राज्यसरकार आपल्या मागणीवर नक्कीच सकारात्मक विचार करेल व सोबतच सेवाग्राम विकास आराखडयातून सेवाग्राम ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामाकरिता निधी उपलब्ध करुन दिला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.सेवाग्राम ग्रा.पं.ला १० कोटी द्याविकास आराखड्यात वरूड, पवनार यासह अनेक ग्रामपंचायतला निधी दिला आहे. मात्र सेवाग्राम गावात अंतर्गत विकास कामांसाठी १० कोटी रूपये देण्यात यावे अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRamdas Tadasरामदास तडस