शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
3
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
5
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
8
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
9
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
10
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
11
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
12
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
13
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
14
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
15
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
16
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
17
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
18
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
20
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल

आष्टी, आर्वी, कारंजा तालुक्यात दुष्काळ घोषित करा

By admin | Updated: December 4, 2014 23:14 IST

उपविभागातील आर्वी, आष्टी, कारंजा या विधानसभा क्षेत्रात गत तीन वर्षांपासून नापिकीचे सत्र सुरू आहे. या नैसर्गिक आपत्ती, नापिकी व उत्पादनाच्या तुलनेत शेतमालाला मिळणारा भाव अत्यल्प आहे़

आर्वी : उपविभागातील आर्वी, आष्टी, कारंजा या विधानसभा क्षेत्रात गत तीन वर्षांपासून नापिकीचे सत्र सुरू आहे. या नैसर्गिक आपत्ती, नापिकी व उत्पादनाच्या तुलनेत शेतमालाला मिळणारा भाव अत्यल्प आहे़ यामुळे आर्वी, आष्टी व कारंजा हे तीनही तालुके दृष्काळग्रस्त घोषित करा, अशी मागणी आमदार अमर काळे यांनी केली आहे़ शेतपिकांची आणेवारी ५० पैशांच्या आत दाखवावी, कापसाचे भाव वाढवून देण्यात यावे, सोयाबीन उत्पादकांना योग्य भाव मिळावा, उपविभागात वाढता वन्य प्राण्यांचा त्रास दूर करण्यासाठी कायम उपाययोजना करावी, प्रकल्पग्रस्त बेरोजगारांना व्यवसायासाठी एक रकमी मोबदला द्यावा, सिंचन विहिरीचे अनुदान त्वरित द्यावे आदी मागण्या आमदार अमर काळे यांनी केल्या आहेत़ निसर्गाच्या अवकृपेने आर्वी, आष्टी, कारंजा या तीनही तालुक्यांत दृष्काळाने थैमान घातले. सोयाबीन पीक हातचे गेले तर कपाशी पिकावर लाल्या रोगाचे अतिक्रमण होऊन खरीप व रब्बी हे दोन्ही हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेले़ त्यातही कमी भावात सोयाबीन खरेदी, कापसाला योग्य भाव नाही, अशी स्थिती आहे़ राज्य सरकारने अद्याप कापूस खरेदी केंद्र सुरू केली नाही़ खासगी व सीसीआयची खरेदी ४०५० पर्यंत सुरू आहे; पण हा भाव शेतकऱ्यांना खर्च बघता परवडणारा नाही़ शेतकरी दुष्काळात होरपळत आहे. आर्वी तालुका व उपविभागातील आष्टी व कारंजा तालुक्यातील नापिकी व उत्पादन झाले नसताना महसूल विभागाच्या सर्व्हेमध्ये अनेक गावांची आणेवारी ५० पैशांच्या वर दाखविण्यात आली आहे़ हा प्रकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे़ या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे़ खरीप हंगामातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची कापणी न करता ते शेतातच जनावरांसाठी सोडून दिले. एकरी एक ते दोन पोते उत्पादन झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे. कपाशी पीक आणेवारी अद्याप निश्चित व्हायची असल्याने आर्वी उपविभागातील सर्वच गावांचा ५० पैशाच्या आतील आणेवारीत समावेश करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गत तीन वर्षांत आर्वी उपविभागात नापिकी व निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी बेजार झाला आहे. शेतपिकांना वन्य प्राण्यांचा अतोनात त्रास आहे़ या समस्या सोडविण्याची मागणी त्यांनी केली आहे़(तालुका प्रतिनिधी)