शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

आष्टी, आर्वी, कारंजा तालुक्यात दुष्काळ घोषित करा

By admin | Updated: December 4, 2014 23:14 IST

उपविभागातील आर्वी, आष्टी, कारंजा या विधानसभा क्षेत्रात गत तीन वर्षांपासून नापिकीचे सत्र सुरू आहे. या नैसर्गिक आपत्ती, नापिकी व उत्पादनाच्या तुलनेत शेतमालाला मिळणारा भाव अत्यल्प आहे़

आर्वी : उपविभागातील आर्वी, आष्टी, कारंजा या विधानसभा क्षेत्रात गत तीन वर्षांपासून नापिकीचे सत्र सुरू आहे. या नैसर्गिक आपत्ती, नापिकी व उत्पादनाच्या तुलनेत शेतमालाला मिळणारा भाव अत्यल्प आहे़ यामुळे आर्वी, आष्टी व कारंजा हे तीनही तालुके दृष्काळग्रस्त घोषित करा, अशी मागणी आमदार अमर काळे यांनी केली आहे़ शेतपिकांची आणेवारी ५० पैशांच्या आत दाखवावी, कापसाचे भाव वाढवून देण्यात यावे, सोयाबीन उत्पादकांना योग्य भाव मिळावा, उपविभागात वाढता वन्य प्राण्यांचा त्रास दूर करण्यासाठी कायम उपाययोजना करावी, प्रकल्पग्रस्त बेरोजगारांना व्यवसायासाठी एक रकमी मोबदला द्यावा, सिंचन विहिरीचे अनुदान त्वरित द्यावे आदी मागण्या आमदार अमर काळे यांनी केल्या आहेत़ निसर्गाच्या अवकृपेने आर्वी, आष्टी, कारंजा या तीनही तालुक्यांत दृष्काळाने थैमान घातले. सोयाबीन पीक हातचे गेले तर कपाशी पिकावर लाल्या रोगाचे अतिक्रमण होऊन खरीप व रब्बी हे दोन्ही हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेले़ त्यातही कमी भावात सोयाबीन खरेदी, कापसाला योग्य भाव नाही, अशी स्थिती आहे़ राज्य सरकारने अद्याप कापूस खरेदी केंद्र सुरू केली नाही़ खासगी व सीसीआयची खरेदी ४०५० पर्यंत सुरू आहे; पण हा भाव शेतकऱ्यांना खर्च बघता परवडणारा नाही़ शेतकरी दुष्काळात होरपळत आहे. आर्वी तालुका व उपविभागातील आष्टी व कारंजा तालुक्यातील नापिकी व उत्पादन झाले नसताना महसूल विभागाच्या सर्व्हेमध्ये अनेक गावांची आणेवारी ५० पैशांच्या वर दाखविण्यात आली आहे़ हा प्रकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे़ या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे़ खरीप हंगामातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची कापणी न करता ते शेतातच जनावरांसाठी सोडून दिले. एकरी एक ते दोन पोते उत्पादन झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे. कपाशी पीक आणेवारी अद्याप निश्चित व्हायची असल्याने आर्वी उपविभागातील सर्वच गावांचा ५० पैशाच्या आतील आणेवारीत समावेश करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गत तीन वर्षांत आर्वी उपविभागात नापिकी व निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी बेजार झाला आहे. शेतपिकांना वन्य प्राण्यांचा अतोनात त्रास आहे़ या समस्या सोडविण्याची मागणी त्यांनी केली आहे़(तालुका प्रतिनिधी)