शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

कारंजा तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 22:52 IST

शेतकऱ्याच्या शेतात गुडघ्यापर्यंत चिखल झाला आहे. त्यामुळे कारंजा व तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे. अतिपावसामुळे सोयाबीन पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव झालेला असून फुलावर असलेले पीक हातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी: संततधारेने अनेकांच्या शेतात साचले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : तालुक्यात एखाद्या दररोज पाऊस कोसळत असल्याने डवरण, वखरण, निंदन ही कामे कशी करावी या चिंतेत शेतकरी सापडला आहे. शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात तण वाढत आहे. अनेक शेतकऱ्यांनी त्यासाठी ग्लायसिल, तणनाशक औषधांचासुद्धा वापर केला; मात्र गवत नष्ट झाले नाही. परिसरात मजुरांचासुद्धा मोठा तुटवडा आहे. त्यामुळे रोजंदारीच्या भावातही वाढ झाली आहे. तालुक्यात संत्रा बागा मोठ्या प्रमाणावर आहेत. या बागांमध्येही तण वाढल्याने संत्री गळत आहेत. अशा अनेक समस्यांनी शेतकऱ्याला वेढले आहे. अनेक शेतकऱ्याच्या शेतात गुडघ्यापर्यंत चिखल झाला आहे. त्यामुळे कारंजा व तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.अतिपावसामुळे सोयाबीन पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव झालेला असून फुलावर असलेले पीक हातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. जोरदार पाऊस आला तर अळ्यांसह इतर रोगांचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो; परंतु पाण्याचा वेग कमी असल्याने शेतकऱ्यांच्या संकटात वाढ झाली आहे. एवढी बिकट परिस्थिती असताना शासकीय यंत्रणेकडून कुठलीही पाहणी झाली नाही. कृषी विभाग पांढरा हत्ती ठरत आहे. तालुका कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना दर्शन दुर्लभ झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभाग व महसूल विभागाला शेतकऱ्याच्या नुकसानाची चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शेतकºयांतून होत आहे.महिनाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदीकाठावरील निम्म्या शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून तलावाचे स्वरूप आले आहे. यामुळे शेतातून चालणेसुद्धा कठीण झाले आहे. पीक अतिपावसाने पिवळे पडले आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. कृषी विभागाने पाहणी करणे गरजेचे आहे.- सुनील चौधरी, माजी सरपंच, बोंदरठाणा.

टॅग्स :agricultureशेती