शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

विकासाबाबत जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

By admin | Updated: July 7, 2016 02:18 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची स्थिती हलाखीची आहे यात शंकाच नाही. त्यातच येथील बेरोजगारांसाठी फारसे रोजगारही उपलब्ध नाही.

शिवरूद्र प्रतिष्ठानची मागणी : निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादरवर्धा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांची स्थिती हलाखीची आहे यात शंकाच नाही. त्यातच येथील बेरोजगारांसाठी फारसे रोजगारही उपलब्ध नाही. त्यामुळे बेरोजगारी आणि विकासाच्या बाबतीत जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, अशी मागणी जिल्हाधिकारी यांना शिवरूद्र प्रतिष्ठानच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. जिल्ह्यात उच्च व तांत्रिक शिक्षणाचा पूर आला आहे. त्यामुळे सुशिक्षतांची मोठी फौज दरवर्षी जिल्ह्यातून बाहेर पडते. पण तांत्रिक रोजागाराच्या नावावर बोटावर मोजण्याइतपत कंपन्या आहेत. यामुळे शिक्षण घेताच रोजगारासाठी जिल्ह्यातील युवकांना नागपूर, पुणे आणि मुंबई ही महानगरे गाठावी लागतात. पण या शहरांमध्येही नोकरी करणे, तेथे वास्तव्य करणे सोपे नसते. त्यामुळे अनेक युवक काही वर्षांनंतर स्वजिल्ह्याची वाट धरतात. पण येथे आल्यावरही रोजगार मिळणे कठीण जात असल्याने युवकांमध्ये नैराश्याची भावना वाढत आहे. ऐतिहासिकदृष्ट्या वर्धा शहराला सर्व जगात ओळखले जाते. विनोबा भावे, महात्मा गांधी या दोन महापुरूषांचा हा जिल्हा आहे. पण ही बाब सोडली तर जिल्ह्यात काय असा प्रश्न आता युवक विचारू लागले आहे. जिल्ह्यातील शेतकरी वर्गाची स्थितीही वाईट आहे. त्यामुळे ते आपल्या मुलांना शेती करू द्यायला तयार नाही. त्यामुळे विचित्र मानसिकतेत येथील युवक भरडले जात आहे. जिल्ह्यातील युवकांपुढे काय रोजगार करावा हा प्रश्न आहे. जे युवक रोजगारासाठी बँकांमध्ये लोन घेण्यासाठी जातात त्यांनाही सहजासहजी कर्ज मिळत नाही. त्यामुळे रोजगार मार्गदर्शन शिबिराचाही युवकांना कंटाळा आला आहे. मुद्रा लोन ही योजना तर केवळ फसवी ठरत आहे. बँका या लोनसाठी नकारघंटा वाजवित आहेत. त्यामुळे जिल्ह्यात रोजगार उपलब्ध करा अन्यथा जिल्हा रोजगार व विकासाच्या बाबतीत दुष्काळग्रस्त घोषित करा कशी मागणी निवेदनात करण्यात आली. शिष्टमंडळात युवा सोशल फोरम, समता सामाजिक युवा संघटना आदी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्तेही सहभागी झाले होते.(शहर प्रतिनिधी) सुशिक्षित बेरोजगारांमध्ये नैराश्याची भावनाशिक्षणाच्या दृष्टीने जिल्हा पुढारलेला आहे. सर्व प्रकारचे शिक्षण येथे उपलब्ध आहे. पण शिक्षण घेतल्यानंतर रोजगार मात्र तितक्या प्रमाणात उपलब्ध नाही. त्यामुळे मोठ्या शहराकडे युवकांना धाव घावी लागत आहे. त्यामुळे येथील युवकांमध्ये नैराश्याची भावना बळावली आहे. शिक्षणाचा उपयोग कुठे करावा हा प्रश्न त्यांना पडत आहे. शेतीही परवडत नसल्याने काय करावे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.