शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

विकासाबाबत जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

By admin | Updated: July 7, 2016 02:18 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची स्थिती हलाखीची आहे यात शंकाच नाही. त्यातच येथील बेरोजगारांसाठी फारसे रोजगारही उपलब्ध नाही.

शिवरूद्र प्रतिष्ठानची मागणी : निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादरवर्धा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांची स्थिती हलाखीची आहे यात शंकाच नाही. त्यातच येथील बेरोजगारांसाठी फारसे रोजगारही उपलब्ध नाही. त्यामुळे बेरोजगारी आणि विकासाच्या बाबतीत जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, अशी मागणी जिल्हाधिकारी यांना शिवरूद्र प्रतिष्ठानच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. जिल्ह्यात उच्च व तांत्रिक शिक्षणाचा पूर आला आहे. त्यामुळे सुशिक्षतांची मोठी फौज दरवर्षी जिल्ह्यातून बाहेर पडते. पण तांत्रिक रोजागाराच्या नावावर बोटावर मोजण्याइतपत कंपन्या आहेत. यामुळे शिक्षण घेताच रोजगारासाठी जिल्ह्यातील युवकांना नागपूर, पुणे आणि मुंबई ही महानगरे गाठावी लागतात. पण या शहरांमध्येही नोकरी करणे, तेथे वास्तव्य करणे सोपे नसते. त्यामुळे अनेक युवक काही वर्षांनंतर स्वजिल्ह्याची वाट धरतात. पण येथे आल्यावरही रोजगार मिळणे कठीण जात असल्याने युवकांमध्ये नैराश्याची भावना वाढत आहे. ऐतिहासिकदृष्ट्या वर्धा शहराला सर्व जगात ओळखले जाते. विनोबा भावे, महात्मा गांधी या दोन महापुरूषांचा हा जिल्हा आहे. पण ही बाब सोडली तर जिल्ह्यात काय असा प्रश्न आता युवक विचारू लागले आहे. जिल्ह्यातील शेतकरी वर्गाची स्थितीही वाईट आहे. त्यामुळे ते आपल्या मुलांना शेती करू द्यायला तयार नाही. त्यामुळे विचित्र मानसिकतेत येथील युवक भरडले जात आहे. जिल्ह्यातील युवकांपुढे काय रोजगार करावा हा प्रश्न आहे. जे युवक रोजगारासाठी बँकांमध्ये लोन घेण्यासाठी जातात त्यांनाही सहजासहजी कर्ज मिळत नाही. त्यामुळे रोजगार मार्गदर्शन शिबिराचाही युवकांना कंटाळा आला आहे. मुद्रा लोन ही योजना तर केवळ फसवी ठरत आहे. बँका या लोनसाठी नकारघंटा वाजवित आहेत. त्यामुळे जिल्ह्यात रोजगार उपलब्ध करा अन्यथा जिल्हा रोजगार व विकासाच्या बाबतीत दुष्काळग्रस्त घोषित करा कशी मागणी निवेदनात करण्यात आली. शिष्टमंडळात युवा सोशल फोरम, समता सामाजिक युवा संघटना आदी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्तेही सहभागी झाले होते.(शहर प्रतिनिधी) सुशिक्षित बेरोजगारांमध्ये नैराश्याची भावनाशिक्षणाच्या दृष्टीने जिल्हा पुढारलेला आहे. सर्व प्रकारचे शिक्षण येथे उपलब्ध आहे. पण शिक्षण घेतल्यानंतर रोजगार मात्र तितक्या प्रमाणात उपलब्ध नाही. त्यामुळे मोठ्या शहराकडे युवकांना धाव घावी लागत आहे. त्यामुळे येथील युवकांमध्ये नैराश्याची भावना बळावली आहे. शिक्षणाचा उपयोग कुठे करावा हा प्रश्न त्यांना पडत आहे. शेतीही परवडत नसल्याने काय करावे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.