शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

व्यवसायाचे विकेंद्रीकरण हाच सर्वोदयचा मूलमंत्र होय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 23:32 IST

महात्मा गांधी यांच्या विकास नितीला व खेड्यांकडे चला या भूमिकेला पंडीत नेहरूपासून सर्वांनीच हरताळ फासल्यामुळे फक्त एक टक्का व्यावसायिक घराण्याकडे सत्ता संपत्ती, अधिकार जमा आहे.

ठळक मुद्देआदित्य पटनायक : ‘महात्मा गांधी व विकासाची दिशा’ विषयावर व्याख्यान

ऑनलाईन लोकमतवर्धा : महात्मा गांधी यांच्या विकास नितीला व खेड्यांकडे चला या भूमिकेला पंडीत नेहरूपासून सर्वांनीच हरताळ फासल्यामुळे फक्त एक टक्का व्यावसायिक घराण्याकडे सत्ता संपत्ती, अधिकार जमा आहे. सर्वांना समान वाटा यानुसार व्यवसायाचे केंद्रीकरण नाहीतर विकेंद्रीकरण हाच महात्मा गांधी यांच्या सर्वोदयाचा मुलमंत्री होय, असे प्रतिपादन अखिल भारतीय सर्वोदय समाजाचे राष्ट्रीय संयोजक आदित्य पटनायक यांनी केले.स्थानिक अनेकान्त स्वाध्याय मंदिरात महाराष्ट्र अंनिस, राष्ट्रसेवा दल व अनेकान्त स्वाध्याय मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सर्व पुरोगामी, परिवर्तनवादी संस्था, संघटना समन्वय समिती यांच्या सहकार्याने ४५ व्या अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते ‘महात्मा गांधी व विकासाची दिशा’ या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर खादी व ग्रामीण व्यवसाय संस्थेचे लक्ष्मीभाई, सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष प्रशांत गुजर, महाराष्ट्र अंनिसचे राज्यसरचिटणीस गजेंद्र सुरकार, राष्ट्र सेवा दलाचे सचिव अविनाश सोमनाथे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.पटनायक पुढे म्हणाले, महात्मा गांधीच्या नावावर अनेक आक्षेप आहे. विशेषत: सेवाग्राम आश्रमामुळे वर्धा जिल्ह्याचा विकास थांबला, असे बोलल्या जाते. त्यामुळे महात्मा गांधी यांच्या विषयी क्लेषाची भावना तरूणांमध्ये निर्माण झाली. याला राजकारणी, राजकीय पक्ष, संघटना कारणीभूत आहे. महात्मा गांधी छोट्या-छोट्या उद्योग उभारणीच्या बाजूने होते. खेड्यातील उत्पादनावर कच्चा मालावर प्रक्रिया उद्योग गावातच उभे राहिल्यास ग्रामीण भागात रोजगार वाढून आर्थिक संपन्नता गावात येईल, सर्वांना काम मिळेल;पण ही दृष्टी स्वातंत्र्यनंतर अमलात आली नाही. आज मोठमोठ्या मशीनमुळे हातचा रोजगार गेला. संपत्तीचे केंद्रीकरण होवून मुठभर लोक श्रीमंत झाले. तर गरीब अधीक गरीब होवून तरूणांच्या हाताचे उद्योग जावून तरूण मोठ्या प्रमाणात बेरोजगार झाले. हे १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशाला परवडणारे नाही. आजही गांधीच्या सर्वोदय विचारांची गरज असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. खेड्यांमध्ये उद्योग उभारणे, गावातच रोजगार उपलब्ध करून दिले तरच शेतकरी आत्महत्या थांबून बेरोजगारीचा प्रश्न सुटू शकतो, असेही यावेळी त्यांनी सांगितले. प्रास्ताविक सुनील सावध यांनी केले तर उपस्थितांचे आभार सारिका डेहनकर यांनी मानले.गांधी विषयीच्या क्लेषाला संकुचित विचार जबाबदारमहात्मा गांधीच्या नावावर अनेक आक्षेप आहे. महात्मा गांधी यांच्यामुळे भारतात औद्योगिक प्रगती होवू शकली नाही. तर सेवाग्राम आश्रमामुळे वर्धा जिल्ह्याचा विकास थांबला, असे बोलल्या जात असून यामुळे महात्मा गांधी यांच्याविषयी क्लेषाची भावना तरूणांत निर्माण झाली. याला राजकारणी व राजकीय पक्ष जबाबदार कसे आहे हेही पटनायक यांनी स्पष्ट केले.