शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

एकाचा मृत्यू; सात रुग्णालयात

By admin | Updated: October 5, 2014 23:09 IST

तालुक्यातील नरसापूर येथे डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. या गावातील आठ जणांच्या रक्तनमुन्यांची तपासणी केली असता त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले. त्यांच्यावर अमरावती

नरसापूर येथे डेंग्यूचे थैमान : आरोग्य विभागाच्या चमूकडून पाहणी आष्टी (शहीद) : तालुक्यातील नरसापूर येथे डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. या गावातील आठ जणांच्या रक्तनमुन्यांची तपासणी केली असता त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले. त्यांच्यावर अमरावती येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. यात शनिवारी अजय विघ्ने (२२) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे आतापर्यंत झोपेत असलेल्या स्थानिक आरोग्य विभागाचे कर्मचारी खडबडून जागे झाले. त्यांच्याकडून परिस्थितीवर ताबा मिळविण्याचे प्रयत्न होत असल्याचे केवळ सांगण्यात येत आहे. नरसापूर गटग्रामपंचायतची लोकसंख्या २१० आहे. एकूण ४५ घरांच्या वस्तीमध्ये गत अनेक दिवसांपासून नाल्या उपसल्या नाही. घाणीमुळे डासांची पैदास वाढली. त्यातच दुषित पाणीपुरवठा झाल्यामुळे नागरिकांना ताप, उलट्यांचा त्रास सुरू झाला. एकापाठोपाठ आठ जणांची प्रकृती बिघडली. यामध्ये अजय विघ्ने (२२), ममता विघ्ने (१८), प्रतिभा गिराळे (१७), पुनम गिराळे (१८), राहुल गिराळे (२४), अर्पण विघ्ने (२२), पायल महल्ले (१४), पायल विघ्ने (१४) यांचा समावेश आहे. या सर्वांना अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले. तेथील डॉक्टरांच्या तपासणीत यांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले. दरम्यान, शनिवारी अजय विघ्ने याला दुपारी ३ वाजता पोटात दुखायला लागले. तो आधीच तापामुळे फणफणत होता. डॉक्टरांनी प्रयत्न करून अजयला उपचार दिले. मात्र त्याचा मृत्यू झाला. अजयचा मृत्यू गावात डेंग्यूची साथ परसरल्याचे सांगून गेला. यामुळे झोपेत असलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाला जाग आली. याची माहिती ग्रामसेवक आर.वाय. पठाण यांना मिळातच त्यांनी गावातील सबंध नाल्या उपसण्याची मोहीम राबविली. विहिरीत ब्लिचींग पावडर टाकले, फवारणी व धुरळणी करण्यासाठी औषध आणले. आरोग्य विभागाची चमू गावात आली. पाणी व रक्ताचे नमुने घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आले. अहवाल प्राप्त झाल्यावर आणखी उपाययोजना करणार असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. हिच मोहीम पहिले राबविली असती तर अजयचा मृत्यू झाला नसता असे गावात बोलले जात आहे. गावात डेंग्यूने थैमान घातल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण यांना मिळाल्यावर त्यांनी आठ कर्मचाऱ्यांची चमू गावात पाठविली. यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस.एस. रंगारी, वैद्यकीय अधिकारी डॉ. झरकर, आरोग्य सहायक वांगे, राठोड, सेविका भगत, कर्मचारी घारडे, दंडाळे, ढोले यांच्या पथकाने घरोघरी भांड्यामध्ये औषध टाकून पाणी स्वच्छ केले आहे. गावातील ही परिस्थिती आटोक्यात आणण्याची मागणी आहे. (प्रतिनिधी)