शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

एकाचा मृत्यू; सात रुग्णालयात

By admin | Updated: October 5, 2014 23:09 IST

तालुक्यातील नरसापूर येथे डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. या गावातील आठ जणांच्या रक्तनमुन्यांची तपासणी केली असता त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले. त्यांच्यावर अमरावती

नरसापूर येथे डेंग्यूचे थैमान : आरोग्य विभागाच्या चमूकडून पाहणी आष्टी (शहीद) : तालुक्यातील नरसापूर येथे डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. या गावातील आठ जणांच्या रक्तनमुन्यांची तपासणी केली असता त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले. त्यांच्यावर अमरावती येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. यात शनिवारी अजय विघ्ने (२२) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे आतापर्यंत झोपेत असलेल्या स्थानिक आरोग्य विभागाचे कर्मचारी खडबडून जागे झाले. त्यांच्याकडून परिस्थितीवर ताबा मिळविण्याचे प्रयत्न होत असल्याचे केवळ सांगण्यात येत आहे. नरसापूर गटग्रामपंचायतची लोकसंख्या २१० आहे. एकूण ४५ घरांच्या वस्तीमध्ये गत अनेक दिवसांपासून नाल्या उपसल्या नाही. घाणीमुळे डासांची पैदास वाढली. त्यातच दुषित पाणीपुरवठा झाल्यामुळे नागरिकांना ताप, उलट्यांचा त्रास सुरू झाला. एकापाठोपाठ आठ जणांची प्रकृती बिघडली. यामध्ये अजय विघ्ने (२२), ममता विघ्ने (१८), प्रतिभा गिराळे (१७), पुनम गिराळे (१८), राहुल गिराळे (२४), अर्पण विघ्ने (२२), पायल महल्ले (१४), पायल विघ्ने (१४) यांचा समावेश आहे. या सर्वांना अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले. तेथील डॉक्टरांच्या तपासणीत यांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले. दरम्यान, शनिवारी अजय विघ्ने याला दुपारी ३ वाजता पोटात दुखायला लागले. तो आधीच तापामुळे फणफणत होता. डॉक्टरांनी प्रयत्न करून अजयला उपचार दिले. मात्र त्याचा मृत्यू झाला. अजयचा मृत्यू गावात डेंग्यूची साथ परसरल्याचे सांगून गेला. यामुळे झोपेत असलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाला जाग आली. याची माहिती ग्रामसेवक आर.वाय. पठाण यांना मिळातच त्यांनी गावातील सबंध नाल्या उपसण्याची मोहीम राबविली. विहिरीत ब्लिचींग पावडर टाकले, फवारणी व धुरळणी करण्यासाठी औषध आणले. आरोग्य विभागाची चमू गावात आली. पाणी व रक्ताचे नमुने घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आले. अहवाल प्राप्त झाल्यावर आणखी उपाययोजना करणार असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. हिच मोहीम पहिले राबविली असती तर अजयचा मृत्यू झाला नसता असे गावात बोलले जात आहे. गावात डेंग्यूने थैमान घातल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण यांना मिळाल्यावर त्यांनी आठ कर्मचाऱ्यांची चमू गावात पाठविली. यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस.एस. रंगारी, वैद्यकीय अधिकारी डॉ. झरकर, आरोग्य सहायक वांगे, राठोड, सेविका भगत, कर्मचारी घारडे, दंडाळे, ढोले यांच्या पथकाने घरोघरी भांड्यामध्ये औषध टाकून पाणी स्वच्छ केले आहे. गावातील ही परिस्थिती आटोक्यात आणण्याची मागणी आहे. (प्रतिनिधी)